शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लिंकिंगने कर्जवसुली न झाल्यास नव्या कर्जात ३० टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST

कडेगाव : शेतकऱ्यांनी घेतलेले ऊसकर्ज हे त्यांच्या ऊसबिलातून लिंकिंगने वसूल झाले नाही, तर नवीन कर्ज देताना ३० ...

कडेगाव : शेतकऱ्यांनी घेतलेले ऊसकर्ज हे त्यांच्या ऊसबिलातून लिंकिंगने वसूल झाले नाही, तर नवीन कर्ज देताना ३० टक्के कमी करून कर्ज द्यावे, अशाप्रकारचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने १५ डिसेंबर २०२० परिपत्रक काढले आहे. यामुळे रोख पैसे भरून प्रामाणिकपणे नियमित कर्जफेड करणाऱ्या कित्येक शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. यामुळे हे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आपण घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड व्हावी, शून्य टक्के व्याजदरामध्ये आपले कर्ज बसावे म्हणून कित्येक शेतकरी ऊस बिलाची वाट न पाहता रोख पैसे भरतात. शेतकऱ्यांनी १ एप्रिलपासून पुढील कालावधित कधीही कर्ज घेतले, तरी ३१ मार्चपर्यंत परतफेड झाली तरच केंद सरकारच्या २ टक्के व्याज सवलतीचा आणि ३० जूनपर्यंत परतफेड झाली, तर राज्य शासनाच्या ४ टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळतो. यामुळे बहुतांशी शेतकरी ऊस बिलाची वाट न पाहता ३१ मार्चपूर्वी रोख पैसे भरून कर्जफेड करतात. आडसाली लागण केलेला ऊस १५ ते १८ महिन्यांनी कारखान्याकडे गळपासाठी जातो, यासाठी घेतलेले कर्ज एक वर्षाच्या आत भरावे लागते.

बहुतांशी शेतकरी हे कर्ज रोख स्वरूपात बँकेत भरतात आणि केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ घेतात. अशा सर्वच रोख कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता नवीन परिपत्रकाप्रमाणे ३० टक्के कपात होऊन कर्ज मिळणार आहे. एकंदरीत बोगस कर्जाला आळा घालण्यासाठी जिल्हा बँकेने परिपत्रक काढले आहे. मात्र त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवरही अन्याय होत आहे.

चौकट

ते परिपत्रक रद्द करावे

कित्येक शेतकरी उसाचे बियाणे विक्री करतात किंवा गुऱ्हाळासाठी ऊस विक्री करतात. मिळणाऱ्या पैशातून प्रामाणिकपणे कर्जफेड करतात. दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा कारणाने काही शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात घट येते. हे शेतकरी ऊस बिलातून कपात होऊन उर्वरित कर्ज रक्कम रोख भरतात. अशा शेतकऱ्यांवर अन्याय करणारे परिपत्रक जिल्हा बँकेने रद्द करावे.

- विश्वास महाडिक

अध्यक्ष, हनुमान सोसायटी, चिंचणी (अंबक), ता. कडेगाव