शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

लिंकिंगने कर्जवसुली न झाल्यास नव्या कर्जात ३० टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST

कडेगाव : शेतकऱ्यांनी घेतलेले ऊसकर्ज हे त्यांच्या ऊसबिलातून लिंकिंगने वसूल झाले नाही, तर नवीन कर्ज देताना ३० ...

कडेगाव : शेतकऱ्यांनी घेतलेले ऊसकर्ज हे त्यांच्या ऊसबिलातून लिंकिंगने वसूल झाले नाही, तर नवीन कर्ज देताना ३० टक्के कमी करून कर्ज द्यावे, अशाप्रकारचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने १५ डिसेंबर २०२० परिपत्रक काढले आहे. यामुळे रोख पैसे भरून प्रामाणिकपणे नियमित कर्जफेड करणाऱ्या कित्येक शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. यामुळे हे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आपण घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड व्हावी, शून्य टक्के व्याजदरामध्ये आपले कर्ज बसावे म्हणून कित्येक शेतकरी ऊस बिलाची वाट न पाहता रोख पैसे भरतात. शेतकऱ्यांनी १ एप्रिलपासून पुढील कालावधित कधीही कर्ज घेतले, तरी ३१ मार्चपर्यंत परतफेड झाली तरच केंद सरकारच्या २ टक्के व्याज सवलतीचा आणि ३० जूनपर्यंत परतफेड झाली, तर राज्य शासनाच्या ४ टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळतो. यामुळे बहुतांशी शेतकरी ऊस बिलाची वाट न पाहता ३१ मार्चपूर्वी रोख पैसे भरून कर्जफेड करतात. आडसाली लागण केलेला ऊस १५ ते १८ महिन्यांनी कारखान्याकडे गळपासाठी जातो, यासाठी घेतलेले कर्ज एक वर्षाच्या आत भरावे लागते.

बहुतांशी शेतकरी हे कर्ज रोख स्वरूपात बँकेत भरतात आणि केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ घेतात. अशा सर्वच रोख कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता नवीन परिपत्रकाप्रमाणे ३० टक्के कपात होऊन कर्ज मिळणार आहे. एकंदरीत बोगस कर्जाला आळा घालण्यासाठी जिल्हा बँकेने परिपत्रक काढले आहे. मात्र त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवरही अन्याय होत आहे.

चौकट

ते परिपत्रक रद्द करावे

कित्येक शेतकरी उसाचे बियाणे विक्री करतात किंवा गुऱ्हाळासाठी ऊस विक्री करतात. मिळणाऱ्या पैशातून प्रामाणिकपणे कर्जफेड करतात. दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा कारणाने काही शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात घट येते. हे शेतकरी ऊस बिलातून कपात होऊन उर्वरित कर्ज रक्कम रोख भरतात. अशा शेतकऱ्यांवर अन्याय करणारे परिपत्रक जिल्हा बँकेने रद्द करावे.

- विश्वास महाडिक

अध्यक्ष, हनुमान सोसायटी, चिंचणी (अंबक), ता. कडेगाव