शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

राज्यातील ३० नागरी सहकारी बँका 'सलाइन'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अवसायक नियुक्तीची कायद्यातील १० वर्षांची मुदत १५ वर्षांपर्यंत वाढविण्याबाबतचा सहकार विभागाचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अवसायक नियुक्तीची कायद्यातील १० वर्षांची मुदत १५ वर्षांपर्यंत वाढविण्याबाबतचा सहकार विभागाचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याने राज्यातील अशा मुदत संपलेल्या ३० नागरी सहकारी बँका 'सलाइन'वर आहेत. त्यांचे नोंदणी रद्दचे प्रस्तावही अद्याप प्रलंबित असल्याने शासनाकडून या बँकांना व सहकार विभागास निर्णयाची प्रतीक्षा आहे.

राज्यातील ३० नागरी सहकारी बँका अडचणीत आल्यानंतर त्यांच्यावर अवसायक नियुक्ती करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यातील वसंतदादा, मिरज अर्बन, यशवंत सहकारी, कुपवाड अर्बन, लॉर्ड बालाजी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी पीपल्स, जिव्हेश्वर, रवी को-ऑपरेटिव्ह, एस.के. पाटील, साधना आदी बँकांवर नियुक्त करण्यात आलेल्या अवसायकांची मुदत संपली आहे. नजीकच्या काळात आणखी काही अवसायकांची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. संबंधित जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधकांकडून या सर्व बँकांच्या नोंदणी रद्दचे प्रस्ताव यापूर्वीच मागविले आहेत. हे प्रस्तावही आता शासनदरबारी कायद्यातील दुरुस्तीअभावी प्रलंबित आहेत.

राज्यातील ३० पैकी अनेक बँकांनी अवसायनाची मुदतवाढ मिळावी म्हणून यापूर्वीच सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यांचे हे प्रस्ताव न्यायालयीन आदेशानुसार फेटाळले होते. सहकार विभागाने सहकारी संस्था अधिनियमातील अवसायनासंदर्भातील १० वर्षांची तरतूद बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे.

यामध्ये ही मुदत १५ वर्षांची करावी, असे म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव एकदा चर्चेला आला होता. मात्र, अद्याप त्याविषयी निर्णय झाला नाही. हा निर्णय झाल्यास पुन्हा ३० बँकांच्या अवसायन मुदतवाढीचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.

चौकट

का मागविले होते प्रस्ताव...

एका प्रकरणावर निकाल देताना मे २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने सहकारी बँकांच्या अवसायक मुदतवाढीची प्रक्रिया चुकीची असल्याचे मत मांडत, यापुढे कोणत्याही संस्थांना सहकार कायद्यातील कलम १५७ अंतर्गत मुदतवाढ देता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यामुळे या ३० सहकारी बँकांना पत्र पाठविण्यात आले आहे.

चौकट

न्यायालयाने अवसायन मुदतवाढीस मज्जाव केला असला तरी, त्यांनी बँकांकडील वसुली, जप्ती व अन्य अनुषंगिक कामे करण्याचे अधिकार बँकेला राहतील, असे म्हटले आहे. त्यामुळे नोंदणी रद्द झाली तरीही थकबाकीवसुली व कारवाईची प्रक्रिया थांबणार नाही.