शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

मिरज महापालिका कार्यालयावर दगडफेकप्रकरणी २८ जणांची निर्दोष मुक्तता - अकरा वर्षांनंतर निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:28 IST

मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने दोषी ठरविलेल्या

ठळक मुद्देआजी - माजी नगरसेवकांना निकालाने दिलासा

मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने दोषी ठरविलेल्या माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे यांच्यासह २८ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालाने या सर्वांना महापालिकेची निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेतील गैरकारभार, मिरज शहरातील रस्ते व पिण्याच्या पाणीप्रश्नावर २००७ मध्ये शहरातील नगरसेवक, रिक्षाचालक, शेतकरी संघटना व नागरिकांचा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चावेळी दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्यात मिरजेतील प्रथमवर्ग न्यायालयाने २०११ मध्ये आजी, माजी नगरसेवकांसह २८ जणांना दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालामुळे दोषी ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांना निवडणूक लढविण्यात अडचणी आल्याने त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली होती.

या निकालाविरोधात सांगलीच्या जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. २८ जणांच्यावतीने तीन अपील दाखल होते. या तीन याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत नरवाडकर, गिरीश तपकिरे, सी. डी. माने यांनी काम पाहिले. शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेले अपील बुधवारी जिल्हा न्यायालयाने मंजूर करून माजी महापौर मैनुद्दीन बागवान, इद्रिस नायकवडी, नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, आनंदा देवमाने व संभाजी मेंढे यांच्यासह २८ जणांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. जिल्हा न्यायालयाच्या या निकालाने सर्वांना दिलासा मिळाला आहे. या खटल्यातील दादासाहेब लांडगे, जयगोंड परगोंड, इब्राहिम चौधरी या तीन माजी नगरसेवकांचे निधन झाले आहेत. या खटल्याचा निकाल अकरा वर्षांनी लागला.न्यायालयाच्या निकालावर समाधानी - इद्रिस नायकवडीमहापालिका मिरज विभागीय कार्यालयावर नागरिकांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाबाहेरील काहींनी महापालिकेच्या मिरज कार्यालयावर दगडफेक केली होती. या दगडफेकीत बाराशे रुपयांचे किरकोळ नुकसान झाले होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकून २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी मिरज न्यायालयाने शिक्षा व दंड ठोठावला होता. याविरोधात जिल्हा न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने हे अपील मान्य केल्याने सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालावर समाधानी असल्याचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सांगितले.