शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मिरज महापालिका कार्यालयावर दगडफेकप्रकरणी २८ जणांची निर्दोष मुक्तता - अकरा वर्षांनंतर निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:28 IST

मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने दोषी ठरविलेल्या

ठळक मुद्देआजी - माजी नगरसेवकांना निकालाने दिलासा

मिरज : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने दोषी ठरविलेल्या माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे यांच्यासह २८ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालाने या सर्वांना महापालिकेची निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेतील गैरकारभार, मिरज शहरातील रस्ते व पिण्याच्या पाणीप्रश्नावर २००७ मध्ये शहरातील नगरसेवक, रिक्षाचालक, शेतकरी संघटना व नागरिकांचा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चावेळी दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्यात मिरजेतील प्रथमवर्ग न्यायालयाने २०११ मध्ये आजी, माजी नगरसेवकांसह २८ जणांना दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालामुळे दोषी ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांना निवडणूक लढविण्यात अडचणी आल्याने त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली होती.

या निकालाविरोधात सांगलीच्या जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. २८ जणांच्यावतीने तीन अपील दाखल होते. या तीन याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत नरवाडकर, गिरीश तपकिरे, सी. डी. माने यांनी काम पाहिले. शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेले अपील बुधवारी जिल्हा न्यायालयाने मंजूर करून माजी महापौर मैनुद्दीन बागवान, इद्रिस नायकवडी, नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, आनंदा देवमाने व संभाजी मेंढे यांच्यासह २८ जणांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. जिल्हा न्यायालयाच्या या निकालाने सर्वांना दिलासा मिळाला आहे. या खटल्यातील दादासाहेब लांडगे, जयगोंड परगोंड, इब्राहिम चौधरी या तीन माजी नगरसेवकांचे निधन झाले आहेत. या खटल्याचा निकाल अकरा वर्षांनी लागला.न्यायालयाच्या निकालावर समाधानी - इद्रिस नायकवडीमहापालिका मिरज विभागीय कार्यालयावर नागरिकांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाबाहेरील काहींनी महापालिकेच्या मिरज कार्यालयावर दगडफेक केली होती. या दगडफेकीत बाराशे रुपयांचे किरकोळ नुकसान झाले होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकून २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी मिरज न्यायालयाने शिक्षा व दंड ठोठावला होता. याविरोधात जिल्हा न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने हे अपील मान्य केल्याने सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालावर समाधानी असल्याचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सांगितले.