शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीस २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र

By admin | Updated: July 4, 2017 23:32 IST

कर्जमाफीस २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफीच्या निर्णयाअंतर्गत टाकलेल्या नव्या नियमांच्या गुगलीने जिल्ह्यातील २६ हजार ७२७ शेतकऱ्यांना बाद ठरविले आहे. प्राथमिक टप्प्यात आता केवळ १५ हजार ६०६ शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असून, अन्य नियमांच्या आधारेही यातील अनेक शेतकरी अपात्र ठरण्याची चिन्हे आहेत. शासनाने, २०१२ पूर्वी कर्ज घेतलेल्या व थकीत असलेल्या कर्जदारांना कर्जमाफी मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नियमाच्या आधारे आता २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात याचा उल्लेख करून शासनाच्या नियमांची खिल्ली उडविली होती. वास्तविक जिल्हा बँकेनेही याबाबतचा अहवाल शासनाला दिला आहे. दीड लाखाची कर्जमाफी मिळणाऱ्यांची जिल्ह्यातील एकूण यादी ४२ हजार ३३३ शेतकऱ्यांची होती. यातील किमान ९० टक्के शेतकरी तरी नियमात बसतील, असे वाटत असतानाच, २०१२ च्या नियमाने ही यादी १५ हजाराच्या घरात आणली आहे. पंचवीस हजारापर्यंतच्या अनुदानास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी १ लाख ६८ हजार ४८२ इतकी आहे. त्याची रक्कम ४२१ कोटी २० लाख ५० हजार इतकी होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफीने फारसे काही पडणार नाही, असे चित्र आहे. २०१२ च्या नियमातून सुटलेले आणि कर्जमाफीस पात्र असलेले १५ हजार ६०६ शेतकरीही पूर्णत: कर्जमाफीस पात्र ठरले नाहीत. अन्य नियमांच्या आधारेही यातील अनेकजण अपात्रही ठरू शकतात. त्यामुळे ही संख्या आणखी कमी होऊ शकते. २०१२ पूर्वीच्या कर्जदारांना वगळण्याचा हा निर्णय शासनाने तातडीने रद्द करण्याची मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.सात-बारा कोरा होणार कसा?सात-बारा कोरा होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या केवळ २३ हजाराच्या घरात आहे. याशिवाय दीड लाखावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच माफी मिळणार आहे. दुष्काळी भागातील अनेक शेतकरी दीड लाखावरील यादीत असल्यामुळे, त्यांना ही रक्कम भरणे अडचणीचे ठरणार आहे. एकूण ३०९५ शेतकऱ्यांचे ९६ कोटी ७२ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे.