शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

कर्जमाफीस २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र

By admin | Updated: July 4, 2017 23:32 IST

कर्जमाफीस २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफीच्या निर्णयाअंतर्गत टाकलेल्या नव्या नियमांच्या गुगलीने जिल्ह्यातील २६ हजार ७२७ शेतकऱ्यांना बाद ठरविले आहे. प्राथमिक टप्प्यात आता केवळ १५ हजार ६०६ शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असून, अन्य नियमांच्या आधारेही यातील अनेक शेतकरी अपात्र ठरण्याची चिन्हे आहेत. शासनाने, २०१२ पूर्वी कर्ज घेतलेल्या व थकीत असलेल्या कर्जदारांना कर्जमाफी मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नियमाच्या आधारे आता २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात याचा उल्लेख करून शासनाच्या नियमांची खिल्ली उडविली होती. वास्तविक जिल्हा बँकेनेही याबाबतचा अहवाल शासनाला दिला आहे. दीड लाखाची कर्जमाफी मिळणाऱ्यांची जिल्ह्यातील एकूण यादी ४२ हजार ३३३ शेतकऱ्यांची होती. यातील किमान ९० टक्के शेतकरी तरी नियमात बसतील, असे वाटत असतानाच, २०१२ च्या नियमाने ही यादी १५ हजाराच्या घरात आणली आहे. पंचवीस हजारापर्यंतच्या अनुदानास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी १ लाख ६८ हजार ४८२ इतकी आहे. त्याची रक्कम ४२१ कोटी २० लाख ५० हजार इतकी होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफीने फारसे काही पडणार नाही, असे चित्र आहे. २०१२ च्या नियमातून सुटलेले आणि कर्जमाफीस पात्र असलेले १५ हजार ६०६ शेतकरीही पूर्णत: कर्जमाफीस पात्र ठरले नाहीत. अन्य नियमांच्या आधारेही यातील अनेकजण अपात्रही ठरू शकतात. त्यामुळे ही संख्या आणखी कमी होऊ शकते. २०१२ पूर्वीच्या कर्जदारांना वगळण्याचा हा निर्णय शासनाने तातडीने रद्द करण्याची मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.सात-बारा कोरा होणार कसा?सात-बारा कोरा होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या केवळ २३ हजाराच्या घरात आहे. याशिवाय दीड लाखावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच माफी मिळणार आहे. दुष्काळी भागातील अनेक शेतकरी दीड लाखावरील यादीत असल्यामुळे, त्यांना ही रक्कम भरणे अडचणीचे ठरणार आहे. एकूण ३०९५ शेतकऱ्यांचे ९६ कोटी ७२ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे.