शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

तासगाव तालुक्यात कोरोनाचे २८ दिवसांत २६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:20 IST

तासगाव : तासगाव तालुक्यात कोरोनोची दुसरी लाट गंभीररूप धारण करीत आहे. आटोक्यात आलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने पुन्हा एक हजारचा ...

तासगाव : तासगाव तालुक्यात कोरोनोची दुसरी लाट गंभीररूप धारण करीत आहे. आटोक्यात आलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने पुन्हा एक हजारचा आकडा ओलांडला आहे. तालुक्यात प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू असले तरी तुटपुंंज्या यंत्रणेमुळे आणि नागरिकांच्या गाफीलपणामुळे कोरोनोचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी पहाटे नरसेवाडीतील एका वृद्ध महिलेचा उपचारासाठी बेड न मिळाल्याने मृत्यू झाला. गेल्या २८ दिवसांत तालुक्यात तब्बल २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

तासगाव तालुक्यात कोरेानोची पहिली लाट ओसरल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत तालुक्यात पुन्हा भीषण परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. महिन्याभरापासून तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रोज शंभरच्या संख्येने कोरोनाबाधित होत आहेत. विशेषत: शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनोचा विळखा वाढत आहे.

तालुक्यात आजअखेर ५ हजार ७९ कोरोनाबाधित रुग्ण होते, त्यापैकी ३ हजार ८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत तालुक्यात एक हजार १४ कोरोनाबाधित असून, त्यापैकी ७९२ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. २२२ रुग्णांवर कोविड रुग्णालयांतून उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आजअखेर १९९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी गेल्या २८ दिवसांत २६ मृत्यू झाले आहेत. दुसऱ्या लाटेत तालुक्यातील कोरोनाबाधितांचा मृत्युदर चिंताजनक झाला आहे.

प्रशासनाकडून रात्रंदिवस कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे. मात्र, या लढाईत उपचारांसाठीची यंत्रणाच तुटपुंजी असल्यामुळे कोरोनोचा विळखा वाढत आहे. बुुधवारी नरसेवाडीतील एका रुग्णाला वेळेत उपचारांसाठी बेड न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला. कोरोनाबाधित होऊन अत्यवस्थ स्थितीत असलेल्या रुग्णांची उपचाराची सोय मिळविण्यासाठी फरफट सुरू असल्याचे चित्र आहे.

चौकट

जीव मुठीत घेऊन अंत्यसंस्कार; दोघे पॉझिटव्ह

नरसेवाडी येथील कोरोनोबाधित रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यानंतर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पीपीई कीट उपलब्ध न झाल्याने घरातीलच व्यक्तींनी अंत्यसंस्कार केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या तपासणीत आणखी दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.

चौकट

ग्रामीण भागात वाढता विळखा

दुसऱ्या लाटेत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक गावांत रोज आठ, दहा रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. गाव पातळीवर दक्षता समित्या स्थापन करून नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, लोकांनीच दुसरी लाट गांभीर्याने घेतली नसल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.