शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नांद्रे येथे उसाची २५ वाहने रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:12 IST

सांगली : थकीत देणी व एफआरपी जाहीर केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, प्रसंगी साखर कारखाने ...

सांगली : थकीत देणी व एफआरपी जाहीर केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, प्रसंगी साखर कारखाने पेटवून दिले जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दिला.मिरज, खानापूूर व कवठेमहांकाळ तालुक्यातील साखर कारखान्यांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, नांद्रे (ता. मिरज) येथे रविवारी पहाटे ऊस वाहतूक करणारी २५ वाहने रोखून धरली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांनी दोन तासानंतर वाहने सोडली.ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी आक्रमक भूमिका घेऊन सांगलीतील वसंतदादा पाटील साखर कारखाना, मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), महांकाली (कवठेमहांकाळ), उदगिरी (पारे) व नागेवाडी (ता. खानापूर) या कारखान्यांवर दुचाकी रॅली काढून धडक दिली. कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करून जोपर्यंत थकीत देणी, एफआरपी व दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरूकरू नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जोरदार घोषणाबाजी करीत व्यवस्थापनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. बायपास रस्त्यावरून रॅलीस प्रारंभ झाला. प्रथम वसंतदादा कारखान्यावर रॅली गेली. कोणातही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कारखानास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेटस् लाऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांनी रोखले. त्यानंतर ही रॅली उदगिरी व नागेवाडी, कवठेमहांकाळच्या महांकाली व आरगच्या मोहनराव शिंदे साखर कारखान्यांवर गेली.रॅलीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, संजय बेले, सयाजी मोरे, सावकार मदनाईक, संदीप राजोबा, भागवत जाधव, संजय खोलकुंबे, ज्योतिराम जाधव, अशोक खाडे, शिवाजी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.नांद्रेत वाहतूक रोखल्याने तणावनांद्रे येथूून वसंतदादा कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या तब्बल २५ ट्रॅक्टर-ट्रॉल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री एक वाजता रोखून धरल्या. यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला. सांगली ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली व कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनीही, परत वाहतूक करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पहाटे चार वाजता कार्यकर्त्यांनी ही वाहने सोडून दिली.