शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

नांद्रे येथे उसाची २५ वाहने रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:12 IST

सांगली : थकीत देणी व एफआरपी जाहीर केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, प्रसंगी साखर कारखाने ...

सांगली : थकीत देणी व एफआरपी जाहीर केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, प्रसंगी साखर कारखाने पेटवून दिले जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दिला.मिरज, खानापूूर व कवठेमहांकाळ तालुक्यातील साखर कारखान्यांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, नांद्रे (ता. मिरज) येथे रविवारी पहाटे ऊस वाहतूक करणारी २५ वाहने रोखून धरली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांनी दोन तासानंतर वाहने सोडली.ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी आक्रमक भूमिका घेऊन सांगलीतील वसंतदादा पाटील साखर कारखाना, मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), महांकाली (कवठेमहांकाळ), उदगिरी (पारे) व नागेवाडी (ता. खानापूर) या कारखान्यांवर दुचाकी रॅली काढून धडक दिली. कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करून जोपर्यंत थकीत देणी, एफआरपी व दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरूकरू नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जोरदार घोषणाबाजी करीत व्यवस्थापनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. बायपास रस्त्यावरून रॅलीस प्रारंभ झाला. प्रथम वसंतदादा कारखान्यावर रॅली गेली. कोणातही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कारखानास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेटस् लाऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांनी रोखले. त्यानंतर ही रॅली उदगिरी व नागेवाडी, कवठेमहांकाळच्या महांकाली व आरगच्या मोहनराव शिंदे साखर कारखान्यांवर गेली.रॅलीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, संजय बेले, सयाजी मोरे, सावकार मदनाईक, संदीप राजोबा, भागवत जाधव, संजय खोलकुंबे, ज्योतिराम जाधव, अशोक खाडे, शिवाजी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.नांद्रेत वाहतूक रोखल्याने तणावनांद्रे येथूून वसंतदादा कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या तब्बल २५ ट्रॅक्टर-ट्रॉल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री एक वाजता रोखून धरल्या. यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला. सांगली ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली व कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनीही, परत वाहतूक करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पहाटे चार वाजता कार्यकर्त्यांनी ही वाहने सोडून दिली.