शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

नांद्रे येथे उसाची २५ वाहने रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:12 IST

सांगली : थकीत देणी व एफआरपी जाहीर केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, प्रसंगी साखर कारखाने ...

सांगली : थकीत देणी व एफआरपी जाहीर केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, प्रसंगी साखर कारखाने पेटवून दिले जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दिला.मिरज, खानापूूर व कवठेमहांकाळ तालुक्यातील साखर कारखान्यांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, नांद्रे (ता. मिरज) येथे रविवारी पहाटे ऊस वाहतूक करणारी २५ वाहने रोखून धरली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांनी दोन तासानंतर वाहने सोडली.ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी आक्रमक भूमिका घेऊन सांगलीतील वसंतदादा पाटील साखर कारखाना, मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), महांकाली (कवठेमहांकाळ), उदगिरी (पारे) व नागेवाडी (ता. खानापूर) या कारखान्यांवर दुचाकी रॅली काढून धडक दिली. कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करून जोपर्यंत थकीत देणी, एफआरपी व दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरूकरू नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जोरदार घोषणाबाजी करीत व्यवस्थापनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. बायपास रस्त्यावरून रॅलीस प्रारंभ झाला. प्रथम वसंतदादा कारखान्यावर रॅली गेली. कोणातही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कारखानास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेटस् लाऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांनी रोखले. त्यानंतर ही रॅली उदगिरी व नागेवाडी, कवठेमहांकाळच्या महांकाली व आरगच्या मोहनराव शिंदे साखर कारखान्यांवर गेली.रॅलीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, संजय बेले, सयाजी मोरे, सावकार मदनाईक, संदीप राजोबा, भागवत जाधव, संजय खोलकुंबे, ज्योतिराम जाधव, अशोक खाडे, शिवाजी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.नांद्रेत वाहतूक रोखल्याने तणावनांद्रे येथूून वसंतदादा कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या तब्बल २५ ट्रॅक्टर-ट्रॉल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री एक वाजता रोखून धरल्या. यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला. सांगली ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली व कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनीही, परत वाहतूक करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पहाटे चार वाजता कार्यकर्त्यांनी ही वाहने सोडून दिली.