शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कामेरीत २५ एकर उसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कामेरी-तुजारपूर रस्त्यालगत राजारामबापू व कृष्णा सहकारी साखर कारखान्याला नोंद असणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कामेरी-तुजारपूर रस्त्यालगत राजारामबापू व कृष्णा सहकारी साखर कारखान्याला नोंद असणारा २० ते २५ एकर ऊस सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आगीत जळाला. यात १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही आग विजेच्या शॉर्टसर्किटने लागल्याचे परिसरातील शेतकरी सांगत असले, तरी वीज वितरण कंपनीच्या कामेरी कार्यालयातील कनिष्ठ शाखा अभियंता जितेंद्र पाटील यांनी मात्र ही शक्यता नाकारली आहे. इस्लामपूर येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी सकाळी १०.३० ते ११.२५ या वेळेत वीजपुरवठा बंद असल्याने शॉर्टसर्किटने आग लागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कामेरी येथील पांढरी परिसरातील सुदर्शन पाटील, कापसे मळा, माळी, मदने मळ्यातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या २५ एकर उसाला सकाळी अचानक आग लागली. साडेअकराच्या सुमारास सुदर्शन पाटील, श्रीकांत पाटील, प्रदीप पाटील, मुकुंद माळी यांनी या आगीबाबतची माहिती कोतवाल आनंदराव ठोंबरे यांना दिली.

इस्लामपूर येथे व वीजपुरवठा बंद असल्याने अग्निशमन गाडी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. श्रीकांत पाटील व मुकुंद माळी यांच्या वस्तीवरील घराकडे आग येऊ लागली होती. त्यावेळी ग्रामस्थ व युवकांनी पाणीपुरवठा संस्थेच्या चेंबरमधून पाणी उपलब्ध करून आग विझवली.

आगीमध्ये ऊस पूर्ण जळाल्याने अंदाजे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज तलाठी रामेश्वर शिंदे यांनी व्यक्त केला. मंडल अधिकारी मनोहर पाटील यांनी पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राजारामबापू व कृष्णा कारखाना ऊसतोडणी कार्यालयात शेतकऱ्यांनी जळीत उसाची नोंद केली असून मंगळवारपासून या उसाची तोडणी सुरू करण्याचा प्रयत्न करू, असे सांगण्यात आले.