शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

वाळवा तालुक्यातील २२८ बालकांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले जात आहेत. मात्र, वाळवा तालुक्यात पहिल्या लाटेत ० ते ५ वर्षांच्या आतील ६५ आणि दुसऱ्या लाटेत १६३ मुलांनी कोरोनाचा यशस्वी मुकाबला करत त्याच्यावर मात केली आहे. त्यामुळे तज्ज्ञांचे निष्कर्ष काहीही असले तरी तालुक्यातील या लहान मुलांनी आपल्या जबर इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनाला हरवता येते हे दाखवून दिले आहे.

गेल्या मार्च महिन्यात इस्लामपूर शहरातून या कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. माणसाला माणसापासून दूर ठेवणाऱ्या या विषाणूबाबत सर्वांच्याच मनात भीतीचे काहूर माजले होते. त्यानंतर हा संसर्ग तालुक्याच्या ग्रामीण भागात पसरत गेला. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर असलेली अनेक कुटुंबे, नागरिक गावी परतू लागले. या स्थलांतरामधूनही कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. त्यातून मग लॉकडाऊन, टाळेबंदी, बाहेर फिरण्यास आणि गर्दी करण्यास मज्जाव, मुखपट्टी, सॅनिटायझर, सामाजिक अंतर अशा नव्या पद्धती स्वच्छंदी जगण्यावर परिणाम करणाऱ्या ठरल्या.

पहिल्या लाटेचा जीवघेणा कहर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हाहाकार माजवून गेला. त्यानंतर थोडीशी उसंत घेतलेल्या या विषाणूने पुन्हा मार्च महिन्यापासून आपली दाहकता दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीचा काही काळवगळता एप्रिल आणि मे महिन्यात पुन्हा या विषाणूने अनेक कुटुंबे उद-ध्वस्त करताना कित्येक घरातील कर्त्या माणसांचा बळी घेतला.

कोरोनाच्या या दोन्ही लाटांचा भयकंप डोके सुन्न करून टाकत असतानाच आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा मोठा धोका असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यामुळे या लाटेत मुलांना कसे जपायचे याची धास्ती अनेक कुटुंबांना लागून राहिली आहे. मात्र, वाळवा तालुक्यातील पाच वर्षांच्या आतील २२८ मुलांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या कोरोना संसर्गावर मात केल्याचे आशादायी चित्र आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते,असे वैद्यकीय शास्त्र सांगते आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करताना आता पालकांनी आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवून राहणे गरजेचे आहे.

चौकट

सर्व बालके मृत्यूजंयी

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत वयाची चाळीशी ओलांडलेल्या आणि वृद्ध रुग्णांचा बळी गेला तर दुसऱ्या लाटेने २५ ते ३५ वयोगटांतील रुग्णांना आपल्या कराल दाढेत ओढले. या दोन्ही लाटेत मात्र ० ते ५ वयोगटांतील बालकांनी कोरोनावर मात केली. त्यातील एकाही बालकाने मृत्यूचे तांडव घालणाऱ्या कोरोनाला भीक घातली नाही. सर्व बालक मृत्युंजयी ठरले.