शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

बावीस महिन्यांत २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

By admin | Updated: August 16, 2016 23:30 IST

जयंत पाटील : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार उदासीन; लेंगरे येथे आढावा बैठक

विटा : आघाडी सरकारच्या काळात ‘टेंभू’ला मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्या तुलनेत आताच्या सरकारने अत्यल्प निधी दिला आहे. पुराचे पाणी उचलून दुष्काळी भागाला देण्याची मागणी मी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. पश्चिम महाराष्ट्राला न्याय देण्याबाबत भाजप सरकारची उदासीन भूमिका आहे. राज्यात बावीस महिन्यात २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अशा परिस्थितीत जनतेला अच्छे दिन कसे येणार, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांनी लगावला.खानापूर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने लेंगरे येथे जिल्हा परिषद गटातील आढावा बैठकीत आ. पाटील बोलत होते. यावेळी माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील, राष्ट्रवादीचे खानापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, रवींद्र बर्डे, जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर उपस्थित होते. रस्ते, टेंभूचे पाणी, तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करावा, रोहयोची कामे सुरू करावीत अशा मागण्या लोकांनी केल्या. देविखिंडी येथील अरविंद निकम म्हणाले की,, आमच्या गावची चारशे एकर जमीन टेंभू कालव्यासाठी संपादित करण्यात आली, त्या परिसरात ८० फूट कालवा खोल असल्याने विहिरींचेही पाणी गेले आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी सुरू झाल्यानंतर थेट ते कालव्यातून घेण्यास परवानगी द्यावी, वेजेगाव तलावात टेंभूचे पाणी सोडावे. जोंधळखिंडी येथील महिलांनी, सहा महिन्यापासून मागणी करूनही रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली नसल्याचे सांगितले. माधळमुठी, देविखिंडी परिसरात झालेली रस्त्यांची निकृष्ट कामे, सिमेंट बंधारे व पुलाची कामे निकृष्ट झाली असून त्याकडे तक्रारी करूनही पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार भक्तराज ठिगळे यांनी आ. पाटील यांच्याकडे केली. पारे गावात बेघरांना प्लॉट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी कमल शिंदे यांनी केली. तीर्थक्षेत्र श्री रेवणसिध्द परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रेणावी येथील हिंमत पाटील यांनी केली. बैठकीस लेंगरेच्या सरपंच सौ. शीलन शिंदे, भांबर्डेच्या अलका सरगर, श्रीरंग शिंदे, बबन हसबे, तुकाराम जाधव, नितीन दिवटे, अजित जाधव, सुवर्णा पाटील, संभाजी मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूलमाजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी परवा जलसिंचन योजनांसाठी सौरऊर्जा वापरण्याची घोषणा केली. मात्र, यासाठी ५०० कोटीचा खर्च आहे. टेंभूचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी विजेचे दोन कोटी रुपये सरकार भरण्यास तयार नाही. परंतु, पाचशे कोटीच्या खर्चाची घोषणा करून मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करीत आहेत.