शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवीयन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
5
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
6
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
7
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
8
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
9
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
10
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
11
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
12
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
13
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
16
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
17
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
18
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
19
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
20
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

बावीस महिन्यांत २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

By admin | Updated: August 16, 2016 23:30 IST

जयंत पाटील : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार उदासीन; लेंगरे येथे आढावा बैठक

विटा : आघाडी सरकारच्या काळात ‘टेंभू’ला मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्या तुलनेत आताच्या सरकारने अत्यल्प निधी दिला आहे. पुराचे पाणी उचलून दुष्काळी भागाला देण्याची मागणी मी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. पश्चिम महाराष्ट्राला न्याय देण्याबाबत भाजप सरकारची उदासीन भूमिका आहे. राज्यात बावीस महिन्यात २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अशा परिस्थितीत जनतेला अच्छे दिन कसे येणार, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांनी लगावला.खानापूर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने लेंगरे येथे जिल्हा परिषद गटातील आढावा बैठकीत आ. पाटील बोलत होते. यावेळी माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील, राष्ट्रवादीचे खानापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, रवींद्र बर्डे, जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर उपस्थित होते. रस्ते, टेंभूचे पाणी, तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करावा, रोहयोची कामे सुरू करावीत अशा मागण्या लोकांनी केल्या. देविखिंडी येथील अरविंद निकम म्हणाले की,, आमच्या गावची चारशे एकर जमीन टेंभू कालव्यासाठी संपादित करण्यात आली, त्या परिसरात ८० फूट कालवा खोल असल्याने विहिरींचेही पाणी गेले आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी सुरू झाल्यानंतर थेट ते कालव्यातून घेण्यास परवानगी द्यावी, वेजेगाव तलावात टेंभूचे पाणी सोडावे. जोंधळखिंडी येथील महिलांनी, सहा महिन्यापासून मागणी करूनही रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली नसल्याचे सांगितले. माधळमुठी, देविखिंडी परिसरात झालेली रस्त्यांची निकृष्ट कामे, सिमेंट बंधारे व पुलाची कामे निकृष्ट झाली असून त्याकडे तक्रारी करूनही पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार भक्तराज ठिगळे यांनी आ. पाटील यांच्याकडे केली. पारे गावात बेघरांना प्लॉट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी कमल शिंदे यांनी केली. तीर्थक्षेत्र श्री रेवणसिध्द परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रेणावी येथील हिंमत पाटील यांनी केली. बैठकीस लेंगरेच्या सरपंच सौ. शीलन शिंदे, भांबर्डेच्या अलका सरगर, श्रीरंग शिंदे, बबन हसबे, तुकाराम जाधव, नितीन दिवटे, अजित जाधव, सुवर्णा पाटील, संभाजी मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूलमाजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी परवा जलसिंचन योजनांसाठी सौरऊर्जा वापरण्याची घोषणा केली. मात्र, यासाठी ५०० कोटीचा खर्च आहे. टेंभूचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी विजेचे दोन कोटी रुपये सरकार भरण्यास तयार नाही. परंतु, पाचशे कोटीच्या खर्चाची घोषणा करून मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करीत आहेत.