शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

२० हजार इमारती आगीच्या ढिगाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील आग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील आग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात हाॅटेल्स, खासगी रुग्णालये, शैक्षणिक संकुल, व्यावसायिक, व्यापारी संकुले अशा जवळपास २० हजाराहून अधिक इमारती आहेत. त्यापैकी ४०० ते ५०० जणांनीच आग सुरक्षा परवाना घेतला आहे. उर्वरित इमारतींचा आगीशी खेळच सुरू आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजनांबाबत २००६-०७ मध्ये कायदा केला. १५ मीटर उंचीपेक्षा अधिकच्या इमारतींना आग सुरक्षेच्या उपाययोजना करून महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक केले. केवळ रहिवासी इमारतीच नव्हे, तर हाॅटेल्स, शैक्षणिक संकुले, व्यापारी संकुले, शासकीय व खासगी रुग्णालये, शासकीय कार्यालये, किरकोळ दुकानदारांनाही परवाना आवश्यक आहे. पण या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. कायदा होऊन १३ वर्षे लोटली तरी, अगदी मोजक्याच इमारतींना आग सुरक्षा परवाना आहे. त्यात खासगी रुग्णालयांची संख्या अधिक आहे. जवळपास २०० हून अधिक रुग्णालयांनी हा परवाना घेतला आहे. हाॅटेल्स व इतर व्यावसायिकांनी मात्र त्याकडे पाठ फिरविली आहे. अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत व्यावसायिकांनी कायद्यात रस दाखविला आहे. शहरात व्यावसायिकांची संख्या २० हजाराहून अधिक आहे. त्यांनीही आग प्रतिबंधाबाबत उपाययोजना केलेल्या नाहीत.

चौकट

समन्वयाचा अभाव

महापालिका क्षेत्रात आग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता दिसून येते. त्यात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत विविध खात्यात समन्वयाचा अभाव आहे. आरोग्य विभागाकडून विविध व्यवसायांसाठी परवाने दिले जातात. हे परवाने देतानाच अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक केले पाहिजे. नगररचना विभागाकडून सर्रास बांधकाम परवाने, परिपूर्ती प्रमाणपत्र दिले जाते. पण या इमारतींनी आग सुरक्षेसंदर्भात उपाययोजना केल्या आहेत की नाही, याची खातरजमा होत नाही.

बांधकाम परवाने देतानाच आगीबाबत दक्षता घेतली पाहिजे.

चौकट

शासकीय यंत्रणेत अनास्था

शासकीय कार्यालये, रुग्णालयांत आग प्रतिबंधक साधने आवश्यक आहेत. पण या शासकीय यंत्रणेत अनास्था दिसून येते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सप्टेंबरमध्ये केलेल्या पाहणीत, जिल्ह्यात शिराळा उपरुग्णालय वगळता इतर एकाही शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून आले होते. हीच अवस्था शासकीय कार्यालयांचीही आहे.