शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २०० बस कोरोना फ्री, प्रवासी मात्र बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST

शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी बसेसना अँटी मायक्रोबियल कोटिंग केले जात आहे. त्यामुळे ...

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी बसेसना अँटी मायक्रोबियल कोटिंग केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळणार आहे. आतापर्यंत २०० गाड्यांना कोटिंग झाले आहे. एसटी बसेस कोरोना फ्री झाल्या, तरीही प्रवाशांना आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यात भीतीपोटी प्रवाशांची संख्याही रोडावली आहे. त्यामुळे महामंडळाने अँटी मायक्रोबियल कोटिंगचा निर्णय घेतला. सांगली जिल्ह्यातील सर्व आगारात कोटिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोटिंग झाले तरी प्रवाशांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. अनेकदा प्रवाशी विनामास्कच बसमध्ये बसलेला असतात. त्यांची बेफिकिरी कोरोना निमंत्रण देऊ शकते.

चौकट

एका एसटीला वर्षातून चारवेळा होणार कोटिंग

बसमधील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, दरवाजा, चालकाची केबिन, फ्लोअरिंग कोटिंग केले जात आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा धोका कमी होणार आहे. एका एसटीला वर्षातून चारवेळा कोटिंग केले जाणार आहे.

चौकट

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास?

१. बसना कोटिंग केल्याने कोरोना विषाणू, बुरशी व इतर जीवाणूपासून प्रवाशांचे संरक्षण होणार आहे.

२. पण कोरोनाबाधित व्यक्ती प्रवासांत सोबत बसली असली तर इतर प्रवाशांना धोका कायम आहे. बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर, दुसरा प्रवासी बसल्यास कोरोनाचा धोका कमी असेल.

चौकट

विभागीय नियंत्रक म्हणतात...

जिल्ह्यात ४२३ एसटी बस आहेत. त्यापैकी २०० हून अधिक बसना कोटिंग करण्यात आले आहे. १०० हून अधिक बस गणेशोत्सवासाठी कोकण, मुंबईला गेल्या आहेत. त्या चार दिवस परत येतील. येत्या आठवडाभरात कोटिंगचे काम पूर्ण होईल. - अरुण वाघाटे, विभागीय नियंत्रक

चौकट

प्रवासी म्हणतात...

१. एसटी महामंडळाने कोरोनाच्या बचावासाठी कोटिंगचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल. - सचिन पाटील

२. एसटीने प्रवास करताना अनेकदा कोरोनाची भीती वाटत होती. पण आता कोटिंगमुळे विषाणूचा धोका कमी झाला आहे. तरीही मास्कचा वापर प्रवाशांना बंधनकारक करण्याची गरज आहे. - रवींद्र भोसले