शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

तुंगमधील २० जणांना अटक

By admin | Updated: November 6, 2015 23:36 IST

मारामारी प्रकरण : ४० जणांविरुद्ध गुन्हा; परस्परविरोधी तक्रारी दाखल

सांगली : तुंग (ता. मिरज) येथे पैशाच्या देवाण-घेवाणीतून दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी दोन्ही गटांच्या ४० जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील २० जणांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात यश आले आहे. गुरुवारी सकाळी मारामारीची ही घटना घडली होती. अटक केलेल्यांमध्ये तुकाराम चंदर जाधव (वय ४२), आकाश आकाराम जाधव (२५), ईश्वरा पांडुरंग जाधव (६०), सखाराम चंदर जाधव (४८), बापू शंकर जाधव (४०), विलास बाबू जाधव (६०), उत्तम बाबू जाधव (३०), सावकार बाबू जाधव (२२), मोहन बाबू जाधव (२५), युवराज वसंत जाधव (२२), राम विलास जाधव (३८), लखन विलास जाधव (२०), बापू हिंदुराव जाधव (५०), बाळू प्रल्हाद जाधव (२५), सुभाष बापू जाधव (३३), अर्जुन बापू जाधव (२४), अर्जुन बबन जाधव (२४), करण वसंत जाधव (१९), तानाजी ईश्वरा जाधव (३५) व गुलाब वसंत जाधव (वय ३०, सर्व रा. तुंग) यांचा समावेश आहे. बाबासाहेब शंकर जाधव व भरत बाबूराव जाधव यांनी परस्पराविरुद्ध फिर्याद दिली आहे. बाबासाहेब यांच्या फिर्यादीनुसार १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मजुरीचे तीनशे रुपये देण्यास नकार दिला, याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भरत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पन्नास हजार रुपये व्याजासह दिले नाहीत, म्हणून पैसे मागण्यास गेल्यानंतर संशयितांनी मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटाने काठी, तलवार, चाकू व दगडांचा वापर केला. घटनेनंतर संशयित पसार झाले होते. काही संशयित तुंगमध्येच एका इमारतीच्या गच्चीवर झोपले असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, सहायक फौजदार बाळासाहेब पाटील, चैतन्य यादव, शिवानंद गव्हाणे यांच्या पथकाने तेथे छापा टाकून त्यांना अटक केली. (प्रतिनिधी) संशयित रुग्णालयात दोन्ही गटातील प्रत्येकी सात, असे १४ संशयित जखमी आहेत. त्यांची डोकी फुटली आहेत. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठीक होताच त्यांना अटक केली जाईल, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.