शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

तुंगमधील २० जणांना अटक

By admin | Updated: November 6, 2015 23:36 IST

मारामारी प्रकरण : ४० जणांविरुद्ध गुन्हा; परस्परविरोधी तक्रारी दाखल

सांगली : तुंग (ता. मिरज) येथे पैशाच्या देवाण-घेवाणीतून दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी दोन्ही गटांच्या ४० जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील २० जणांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात यश आले आहे. गुरुवारी सकाळी मारामारीची ही घटना घडली होती. अटक केलेल्यांमध्ये तुकाराम चंदर जाधव (वय ४२), आकाश आकाराम जाधव (२५), ईश्वरा पांडुरंग जाधव (६०), सखाराम चंदर जाधव (४८), बापू शंकर जाधव (४०), विलास बाबू जाधव (६०), उत्तम बाबू जाधव (३०), सावकार बाबू जाधव (२२), मोहन बाबू जाधव (२५), युवराज वसंत जाधव (२२), राम विलास जाधव (३८), लखन विलास जाधव (२०), बापू हिंदुराव जाधव (५०), बाळू प्रल्हाद जाधव (२५), सुभाष बापू जाधव (३३), अर्जुन बापू जाधव (२४), अर्जुन बबन जाधव (२४), करण वसंत जाधव (१९), तानाजी ईश्वरा जाधव (३५) व गुलाब वसंत जाधव (वय ३०, सर्व रा. तुंग) यांचा समावेश आहे. बाबासाहेब शंकर जाधव व भरत बाबूराव जाधव यांनी परस्पराविरुद्ध फिर्याद दिली आहे. बाबासाहेब यांच्या फिर्यादीनुसार १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मजुरीचे तीनशे रुपये देण्यास नकार दिला, याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भरत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पन्नास हजार रुपये व्याजासह दिले नाहीत, म्हणून पैसे मागण्यास गेल्यानंतर संशयितांनी मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटाने काठी, तलवार, चाकू व दगडांचा वापर केला. घटनेनंतर संशयित पसार झाले होते. काही संशयित तुंगमध्येच एका इमारतीच्या गच्चीवर झोपले असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, सहायक फौजदार बाळासाहेब पाटील, चैतन्य यादव, शिवानंद गव्हाणे यांच्या पथकाने तेथे छापा टाकून त्यांना अटक केली. (प्रतिनिधी) संशयित रुग्णालयात दोन्ही गटातील प्रत्येकी सात, असे १४ संशयित जखमी आहेत. त्यांची डोकी फुटली आहेत. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठीक होताच त्यांना अटक केली जाईल, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.