शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

तुंगमधील २० जणांना अटक

By admin | Updated: November 6, 2015 23:36 IST

मारामारी प्रकरण : ४० जणांविरुद्ध गुन्हा; परस्परविरोधी तक्रारी दाखल

सांगली : तुंग (ता. मिरज) येथे पैशाच्या देवाण-घेवाणीतून दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी दोन्ही गटांच्या ४० जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील २० जणांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात यश आले आहे. गुरुवारी सकाळी मारामारीची ही घटना घडली होती. अटक केलेल्यांमध्ये तुकाराम चंदर जाधव (वय ४२), आकाश आकाराम जाधव (२५), ईश्वरा पांडुरंग जाधव (६०), सखाराम चंदर जाधव (४८), बापू शंकर जाधव (४०), विलास बाबू जाधव (६०), उत्तम बाबू जाधव (३०), सावकार बाबू जाधव (२२), मोहन बाबू जाधव (२५), युवराज वसंत जाधव (२२), राम विलास जाधव (३८), लखन विलास जाधव (२०), बापू हिंदुराव जाधव (५०), बाळू प्रल्हाद जाधव (२५), सुभाष बापू जाधव (३३), अर्जुन बापू जाधव (२४), अर्जुन बबन जाधव (२४), करण वसंत जाधव (१९), तानाजी ईश्वरा जाधव (३५) व गुलाब वसंत जाधव (वय ३०, सर्व रा. तुंग) यांचा समावेश आहे. बाबासाहेब शंकर जाधव व भरत बाबूराव जाधव यांनी परस्पराविरुद्ध फिर्याद दिली आहे. बाबासाहेब यांच्या फिर्यादीनुसार १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मजुरीचे तीनशे रुपये देण्यास नकार दिला, याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भरत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पन्नास हजार रुपये व्याजासह दिले नाहीत, म्हणून पैसे मागण्यास गेल्यानंतर संशयितांनी मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटाने काठी, तलवार, चाकू व दगडांचा वापर केला. घटनेनंतर संशयित पसार झाले होते. काही संशयित तुंगमध्येच एका इमारतीच्या गच्चीवर झोपले असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, सहायक फौजदार बाळासाहेब पाटील, चैतन्य यादव, शिवानंद गव्हाणे यांच्या पथकाने तेथे छापा टाकून त्यांना अटक केली. (प्रतिनिधी) संशयित रुग्णालयात दोन्ही गटातील प्रत्येकी सात, असे १४ संशयित जखमी आहेत. त्यांची डोकी फुटली आहेत. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठीक होताच त्यांना अटक केली जाईल, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.