शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

बेदाणा भिजल्याने २० कोटींचा फटका

By admin | Updated: March 9, 2016 01:02 IST

जत तालुक्यातील चित्र : नुकसानीचे पंचनामे करा

जत/संख : कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, रात्रीची थंडी, चक्रीवादळ यामुळे द्राक्षे, बेदाणा, आंबा, शेवगा व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे व बेदाणा भिजून सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीच्या नैसर्गिक संकटाने हिरावून नेला आहे. अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून द्राक्षबागांची जोपासना केली आहे. आॅक्टोबर महिन्यामध्ये छाटणी झालेल्या बागा परिपक्व झाल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांचा माल बेदाण्यासाठी रॅकवर टाकण्यात आला आहे. पण अवकाळी पावसाने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने परिपक्व झालेल्या बागांतील मणी गळून पडले आहेत. द्राक्षघडांमध्ये पाणी साचून राहिले आहे. वाऱ्याने संख (ता. जत) येथील रामेश्वर नलवडे, माधुरी नलवडे यांची द्राक्षबाग कोसळून तीन लाखांचे नुकसान झाले आहे, तर रॅकवर टाकलेला बेदाणा भिजून काळा पडला आहे. रॅकवर तयार झालेल्या बेदाण्याची प्रतवारी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.अवकाळी पावसाने बनाळी (ता. जत) येथील बी. आर. सावंत यांच्या ७ एकर आंबा फळबागेचा मोहोर गळून पडला आहे. आंबा फळबागांचे ४ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. शेवगा, रब्बी हंगामातील ज्वारी, मका, सूर्यफूल पिकांचेही नुकसान झालेले आहे. (वार्ताहर)शासनाकडे भरपाईची मागणीशेडवर प्रक्रियेसाठी टाकण्यात आलेला बेदाणा अवकाळी पावसामुळे भिजून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.कर्जाची परतफेड कशी होणार?शेतकऱ्यांनी द्राक्षे, बेदाण्यावर कर्जे काढलेली आहेत. पण अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बँक, सोसायटीच्या काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार?, हा प्रश्न द्राक्ष बागायतदारांना भेडसावत आहे. म्हणून अवकाळीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष व बेदाण्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे.