शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

बेदाणा भिजल्याने २० कोटींचा फटका

By admin | Updated: March 9, 2016 01:02 IST

जत तालुक्यातील चित्र : नुकसानीचे पंचनामे करा

जत/संख : कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, रात्रीची थंडी, चक्रीवादळ यामुळे द्राक्षे, बेदाणा, आंबा, शेवगा व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे व बेदाणा भिजून सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीच्या नैसर्गिक संकटाने हिरावून नेला आहे. अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून द्राक्षबागांची जोपासना केली आहे. आॅक्टोबर महिन्यामध्ये छाटणी झालेल्या बागा परिपक्व झाल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांचा माल बेदाण्यासाठी रॅकवर टाकण्यात आला आहे. पण अवकाळी पावसाने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने परिपक्व झालेल्या बागांतील मणी गळून पडले आहेत. द्राक्षघडांमध्ये पाणी साचून राहिले आहे. वाऱ्याने संख (ता. जत) येथील रामेश्वर नलवडे, माधुरी नलवडे यांची द्राक्षबाग कोसळून तीन लाखांचे नुकसान झाले आहे, तर रॅकवर टाकलेला बेदाणा भिजून काळा पडला आहे. रॅकवर तयार झालेल्या बेदाण्याची प्रतवारी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.अवकाळी पावसाने बनाळी (ता. जत) येथील बी. आर. सावंत यांच्या ७ एकर आंबा फळबागेचा मोहोर गळून पडला आहे. आंबा फळबागांचे ४ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. शेवगा, रब्बी हंगामातील ज्वारी, मका, सूर्यफूल पिकांचेही नुकसान झालेले आहे. (वार्ताहर)शासनाकडे भरपाईची मागणीशेडवर प्रक्रियेसाठी टाकण्यात आलेला बेदाणा अवकाळी पावसामुळे भिजून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.कर्जाची परतफेड कशी होणार?शेतकऱ्यांनी द्राक्षे, बेदाण्यावर कर्जे काढलेली आहेत. पण अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बँक, सोसायटीच्या काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार?, हा प्रश्न द्राक्ष बागायतदारांना भेडसावत आहे. म्हणून अवकाळीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष व बेदाण्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे.