शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वीज ग्राहकांची थकबाकी १९७ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली : जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा नियमित होत होता. दहा महिन्यांपूर्वी दरमहा तीन कोटी ...

सांगली : जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा नियमित होत होता. दहा महिन्यांपूर्वी दरमहा तीन कोटी रुपयांची थकबाकी दिसून येत होती. मात्र, हीच थकबाकी आता तब्बल १९७ कोटी ६२ लाख रुपयांवर गेली आहे. यामुळे महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. तशा नोटीस वीज ग्राहकांना पाठविण्यात आल्या आहेत.

‘कोरोना’च्या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल १७७ कोटी चार लाखांनी वाढली आहे. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची रात्रं-दिवस अविरत धडपड सुरु असते, त्यांनाच महावितरणच्या अस्तित्वासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.

जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक असे एकूण सहा लाख ३९ हजार ग्राहक आहेत. मार्च २०१९मध्ये २५ हजार २५० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे केवळ दोन कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी होती. मार्च २०२०मध्ये ९६ हजार ६०० वीज ग्राहकांकडे २० कोटी ५९ लाखांची थकबाकी होती. ही थकबाकी वसूल करण्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाले. तेव्हापासून वीजबिल वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अनलॉकनंतरही थकीत व चालू वीजबिलांचा भरणा फारसा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या हालाखीची झाली आहे. जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वीज ग्राहकांकडे १९७ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात सर्वाधिक घरगुती दोन लाख २२ हजार ६५० ग्राहकांकडे १३८ कोटी ८८ लाख, वाणिज्यिक ३२ हजार ९५० ग्राहकांकडे ३३ कोटी २१ लाख तर औद्योगिक पाच हजार ९१० ग्राहकांकडे २५ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांना नोटीस पाठवून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरु झाली आहे. चालू वीजबिल आणि थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय महावितरणने केली असल्याचे नाळे यांनी सांगितले.

चौकट

महावितरणचे अस्तित्व धोक्यात

देशात सर्वाधिक विजेची मागणी असणारे व २३ हजार ७०० मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. जनतेच्या मालकीच्या महावितरणने देशाच्या वीजक्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे. परंतु, खासगीकरणाला चालना देणाऱ्या देशव्यापी धोरणात्मक बदलांमध्ये महावितरणचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे.