शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९ तळीरामांना अटक

By admin | Updated: May 26, 2014 01:18 IST

जिल्हाभर नाकाबंदी : पोलिसांची पुन्हा मोहीम सुरू; मद्यपींची वाहने जप्त

सांगली : दारुच्या नशेत वाहन चालविणार्‍या तळीरामांची शनिवारी रात्री पुन्हा धरपकड करण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १९ जणांना अटक करण्यात आली. त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. रात्री दहा ते बारा या वेळेत ही मोहीम राबविली. अटक केलेल्यांमध्ये सचिन बाबासाहेब शिरतोडे (वय ३२, रा. कवठेएकंद, ता. तासगाव), अशोक जगन्नाथ कावरे (५२, पलूस), जीवन विठ्ठल गडदे (३०, कुंडल), संदीप सखाराम पाखरे (२८, रामानंदनगर, ता. पलूस), तात्यासाहेब गणपती बिळासकर (३०, रा. बिऊर, ता. शिराळा), प्रमोद मुकुंद पटवर्धन (रा. टिंबर एरिया, सांगली), वामन भानुदास लवटे (अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली), नेताजी भीमराव केंगार (२६, जाखापूर, ता. कवठेमहांकाळ), भरत आनंदा मोरे (४३, रा. कृष्णाघाट, सांगली), विजय भाऊसाहेब लांडे (४०, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), बाळासाहेब मुरा पडळकर (३७, रा. वारणाली, विश्रामबाग), सिद्धाप्पा गुराप्पा बिरादार (३८, संजयनगर, सांगली), नामदेव मल्हारी कोकणे (६५, भारत सूतगिरणीजवळ, सांगली), दयानंद लिंगाप्पा ढवळेश्वर (४८, कुपवाड), प्रकाश रावसाहेब बंडोरे (३०, उदनवाडी, ता. सांगोला), विद्याधर वसंत फणबट (४५, रा. विवेकानंद सोसायटी, कुपवाड), अतुल आनंदराव दळवी (२७, रा. मंगसुळी, ता. अथणी), शफिक मालेकर (३०, बागणी), लालासाहेब पांडुरंग कदम (रा. आष्टा, ता. वाळवा) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शनिवारी रात्री संपूर्ण जिल्हाभर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी व दारुच्या नशेत वाहन चालविणार्‍या तळीरामांची धरपकड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २२ पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी लावली होती. सांगली शहर, विश्रामबाग, वाहतूक नियंत्रण शाखा, तासगाव, आष्टा, शिराळा, कवठेमहांकाळ, कुंडल या पोलिसांनाच तळीराम सापडले. अन्य पोलीस ठाण्यांच्या पोलिसांची मात्र एकही कारवाई न केल्याने सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी) अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस प्रारंभ मिरजेत आयोजन : दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध मिरज : मिरजेत दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस आज सकाळी सुरुवात झाली. किराना घराण्याच्या दिग्गजांनी सादर केलेल्या गायन व वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सकाळी दहा वाजता मीरासाहेब दर्गा पटांगणातील चिंचेच्या झाडाखाली संगीत सभेस सुरुवात झाली. संगीत सभेत डोंबीवलीचे समीर अभ्यंकर, पुणे येथील पंडित संजीव जहागीरदार, मुंबईचे पंडित चंद्रशेखर वझे, कोल्हापूरचे पंडित किशोर कागलकर व पंडित सहदेव झेंडे यांचे गायन व पुणे येथील चंद्रशेखर गाडगीळ यांचे गझल गायन झाले. समीर अभ्यंकर यांनी कोमल रिषभ आसावरी हा राग आळविला. विलंबित एकतालात री मे सुन पिया की बात व त्रितालात बढैय्या लावो लावो रे लावो या रचना सादर केल्या. त्यांना अजित पुरोहित यांनी हार्मोनियम व जितेंद्र भोसले यांनी तबलासाथ केली. पंडित संजीव जहागीरदार यांनी राग आसावरी तोडी सादर केला. विलंबित एकतालात सब मेरा वोही सकल जगत को पैदा करे व त्रितालात मै तो तुम्हारा दास या रचना सादर केल्या. त्यांना कल्याण देशपांडे यांनी तबला व अजित पुरोहित यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित चंद्रशेखर वझे यांनी राग भटियार सादर केला. विलंबित एकतालात महादेव शिवशंकर व द्रुत त्रितालात बेचैन हुई तेरे कारण या रचना सादर केल्या. त्यांना मनमोहन कुंभारे यांनी तबला व मधुकर कदम यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित किशोर कागलकर यांनी विलंबित एकतालात निले घुंगरीया हा राग बिलास खानी तोडी व द्रुत त्रितालात बलमा मोरी छोडी कलाईया हे राग सादर केले. त्यांना संदीप तावरे यांनी हार्मोनियम व दादा मुळे यांनी तबलासाथ केली. पंडित चंद्रशेखर गाडगीळ यांच्या वक्तसे पहले या गझल गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पंडित सहदेव झेंडे यांनी सूर मल्हार हा राग आळविला. पिलवित एकतालात गरजत आये व द्रुत त्रितालात बदलवा बरसन लागी सादर केले. त्यांच्या गायनाने मैफिलीचा समारोप झाला. (वार्ताहर)