शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

जिल्ह्यात १९ तळीरामांना अटक

By admin | Updated: May 26, 2014 01:18 IST

जिल्हाभर नाकाबंदी : पोलिसांची पुन्हा मोहीम सुरू; मद्यपींची वाहने जप्त

सांगली : दारुच्या नशेत वाहन चालविणार्‍या तळीरामांची शनिवारी रात्री पुन्हा धरपकड करण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १९ जणांना अटक करण्यात आली. त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. रात्री दहा ते बारा या वेळेत ही मोहीम राबविली. अटक केलेल्यांमध्ये सचिन बाबासाहेब शिरतोडे (वय ३२, रा. कवठेएकंद, ता. तासगाव), अशोक जगन्नाथ कावरे (५२, पलूस), जीवन विठ्ठल गडदे (३०, कुंडल), संदीप सखाराम पाखरे (२८, रामानंदनगर, ता. पलूस), तात्यासाहेब गणपती बिळासकर (३०, रा. बिऊर, ता. शिराळा), प्रमोद मुकुंद पटवर्धन (रा. टिंबर एरिया, सांगली), वामन भानुदास लवटे (अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली), नेताजी भीमराव केंगार (२६, जाखापूर, ता. कवठेमहांकाळ), भरत आनंदा मोरे (४३, रा. कृष्णाघाट, सांगली), विजय भाऊसाहेब लांडे (४०, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), बाळासाहेब मुरा पडळकर (३७, रा. वारणाली, विश्रामबाग), सिद्धाप्पा गुराप्पा बिरादार (३८, संजयनगर, सांगली), नामदेव मल्हारी कोकणे (६५, भारत सूतगिरणीजवळ, सांगली), दयानंद लिंगाप्पा ढवळेश्वर (४८, कुपवाड), प्रकाश रावसाहेब बंडोरे (३०, उदनवाडी, ता. सांगोला), विद्याधर वसंत फणबट (४५, रा. विवेकानंद सोसायटी, कुपवाड), अतुल आनंदराव दळवी (२७, रा. मंगसुळी, ता. अथणी), शफिक मालेकर (३०, बागणी), लालासाहेब पांडुरंग कदम (रा. आष्टा, ता. वाळवा) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शनिवारी रात्री संपूर्ण जिल्हाभर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी व दारुच्या नशेत वाहन चालविणार्‍या तळीरामांची धरपकड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २२ पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी लावली होती. सांगली शहर, विश्रामबाग, वाहतूक नियंत्रण शाखा, तासगाव, आष्टा, शिराळा, कवठेमहांकाळ, कुंडल या पोलिसांनाच तळीराम सापडले. अन्य पोलीस ठाण्यांच्या पोलिसांची मात्र एकही कारवाई न केल्याने सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी) अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस प्रारंभ मिरजेत आयोजन : दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध मिरज : मिरजेत दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस आज सकाळी सुरुवात झाली. किराना घराण्याच्या दिग्गजांनी सादर केलेल्या गायन व वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सकाळी दहा वाजता मीरासाहेब दर्गा पटांगणातील चिंचेच्या झाडाखाली संगीत सभेस सुरुवात झाली. संगीत सभेत डोंबीवलीचे समीर अभ्यंकर, पुणे येथील पंडित संजीव जहागीरदार, मुंबईचे पंडित चंद्रशेखर वझे, कोल्हापूरचे पंडित किशोर कागलकर व पंडित सहदेव झेंडे यांचे गायन व पुणे येथील चंद्रशेखर गाडगीळ यांचे गझल गायन झाले. समीर अभ्यंकर यांनी कोमल रिषभ आसावरी हा राग आळविला. विलंबित एकतालात री मे सुन पिया की बात व त्रितालात बढैय्या लावो लावो रे लावो या रचना सादर केल्या. त्यांना अजित पुरोहित यांनी हार्मोनियम व जितेंद्र भोसले यांनी तबलासाथ केली. पंडित संजीव जहागीरदार यांनी राग आसावरी तोडी सादर केला. विलंबित एकतालात सब मेरा वोही सकल जगत को पैदा करे व त्रितालात मै तो तुम्हारा दास या रचना सादर केल्या. त्यांना कल्याण देशपांडे यांनी तबला व अजित पुरोहित यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित चंद्रशेखर वझे यांनी राग भटियार सादर केला. विलंबित एकतालात महादेव शिवशंकर व द्रुत त्रितालात बेचैन हुई तेरे कारण या रचना सादर केल्या. त्यांना मनमोहन कुंभारे यांनी तबला व मधुकर कदम यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित किशोर कागलकर यांनी विलंबित एकतालात निले घुंगरीया हा राग बिलास खानी तोडी व द्रुत त्रितालात बलमा मोरी छोडी कलाईया हे राग सादर केले. त्यांना संदीप तावरे यांनी हार्मोनियम व दादा मुळे यांनी तबलासाथ केली. पंडित चंद्रशेखर गाडगीळ यांच्या वक्तसे पहले या गझल गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पंडित सहदेव झेंडे यांनी सूर मल्हार हा राग आळविला. पिलवित एकतालात गरजत आये व द्रुत त्रितालात बदलवा बरसन लागी सादर केले. त्यांच्या गायनाने मैफिलीचा समारोप झाला. (वार्ताहर)