शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

सांगलीत गॅस्ट्रोचे १९ रुग्ण

By admin | Updated: November 25, 2014 23:48 IST

घरोघरी सर्व्हे सुरू : पाण्याचे नमुने तपासणी, औषध फवारणी सुरू

सांगली : मिरजेपाठोपाठ सांगलीतही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळू लागल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आतापर्यंत शहरात गॅस्ट्रोचे १९ रुग्ण आढळले आहेत. यातील १४ रुग्णांवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा साथीचा आजार पसरु नये, यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे. पाण्याचे नमुने घेऊन तपासणी, तसेच विविध भागात औषध फवारणी केली जात आहे.शहरातील संजयनगर, अभयनगर, शंभरफुटी रस्ता, खणभाग, जमदाडे गल्ली, यशवंतनगर, माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर या परिसरात राहणाऱ्या काहीजणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या १९ रुग्णांपैकी १४ रुग्णच रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित चार रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या रुग्णांना ताप, उलटी व जुलाबाचा त्रास सुरु होता. खासगी रुग्णालयात त्यांनी औषधोपचार घेतले. मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. यामुळे ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मिरजेतही गेल्या चार दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत सातजणांचा बळी गेला आहे. अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सांगलीतही त्याची सुरुवात झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. दूषित पाण्याचा ग्रामीण भागात पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीकडून गावात पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले जात आहे. शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर प्रथम अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना वॉर्डात हलविले जात आहे. शहरातील खासगी रुग्णालयातही ताप, उलटी व जुलाबाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांची माहितीही जिल्हा आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. कवलापूर, कवठेएकंद येथेही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. (प्रतिनिधी)जुलाब, उलट्या चक्कर येणे, डोळे खोलवर जाणे, अंग थंडगार पडणे, थंडी वाजून येणेकाय काळजी घ्यावी...पाणी उकळून प्यावेघर व परिसर स्वच्छ ठेवावाविहीर व कूपनलिकेतील पाणी पिऊ नयेजुलाब, उलट्या झाल्यास तातडीने औषध घ्यावेसांगलीत आज बैठकीचे आयोजनमहापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रो व कॉलऱ्याने गंभीर स्वरूप धारण केले असून, यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीने उद्या (बुधवार) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. या बैठकीत तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.गेल्या आठ दिवसांपासून सांगली-मिरजेत गॅस्ट्रो-कॉलऱ्याने थैमान घातले आहे. सुमारे साडेतीनशेहून अधिक रुग्ण आढळले असून, चौघांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (मंगळवार) शासकीय रुग्णालय, मिरज व सांगली येथे भेट दिली. याबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे.