जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना संपला आहे. जिल्ह्यात एक लाख हेक्टरहून अधिकचे उसाचे क्षेत्र आहे. यामुळे कारखान्यांना उसाची मुबलक उपलब्धता असल्यामुळे गळीत हंगाम जोरात चालू आहे. ऊस गळिताला गेल्यानंतर पंधरा दिवसांत वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा साखर कारखान्याने प्रतिटन तीन हजार १७६ रुपयांप्रमाणे एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. पारे-पाडळी (ता. खानापूर) येथील उदगिरी शुगर कारखान्यानेही प्रतिटन दोन हजार ८८३ रुपयाची एकरकमी एफआरपी जमा केली आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीची रक्कम अद्याप जमा केली नाही. काही कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे करूनहीच एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित बिल दोन ते तीन महिन्यांनंतर या शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे एकरकमी एफआरपीबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
चौकट
साखर कारखान्यांचे गाळप
कारखाने ऊस गाळप साखर उतारा टक्के
वसंतदादा-दत्त इंडिया १९६८५० १०.३
राजारामबापू-साखराळे २०७४५५ १०.९७
राजारामबापू-वाटेगाव १२८९३० १०.९७
राजारामबापू-सर्वोदय १०१७१५ १०.५९
विश्वास १४९८२० ९.६९
हुतात्मा १२४२३० १०.५१
राजारामबापू-डफळे २६५२५ ७.८२
सोनहिरा २२८३१० १०.३९
क्रांती २३९४५० १०.३४
मोहनराव शिंदे ५६८३० ९.५५
निनाईदेवी-दालमिया ८८१६५ १०.९६
यशवंत १७८४८ ८.४१
उदगिरी शुगर १५०३९० १०.३७
सदगुरू श्री श्री शुगर १७५२९८ १०.५०
एकूण १८९१८१६ १०.४