शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

कृषी पंप वीज जोडणीसाठी १८७ कोटींच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:57 IST

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या ...

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या थ्री फेज वितरण रोहित्राद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. एका रोहित्रावर फक्त एक किंवा दोन कृषिपंप असणार आहेत.प्रचलित पध्दतीनुसार शेतीला ६३ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरुन वीजपुरवठा होतो. एका रोहित्रावर १५ ते २० शेतीपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे तसेच तांत्रिक गळती वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रासाठी उच्च्दाब वितरण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे.शेतकºयांच्या विहिरीपर्यंत उच्च दाबाची वाहिनी उभारुन वीज जोडणी दिली जाणार आहे. ७.५ अश्वशक्ती जोडभारासाठी दहा केव्हीएचे, दहा अश्वशक्तीसाठी १६, तर त्याहून अधिक भार किंवा शेजारी दुसरे शेतकरी असल्यास २५ केव्हीए क्षमतेचे थ्री फेज रोहित्र खांबावरच बसविले जाणार आहे. त्याच खांबावर रोहित्राच्या खाली मीटरपेटी बसवून जोडणी दिली जाणार आहे.सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ प्रलंबित कृषिपंप जोडण्यांसाठी १८७ कोटी ९५ लाखाच्या निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच संपूर्ण जोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीतूनच मिळणार आहेत.नवीन प्रणालीचे फायदेलघुदाब वाहिनीचे जाळे नसल्यामुळे बिघाडाचे प्रमाणात कमी होऊन अखंडित व शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे.उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने विजेची तार तुटल्यास वीजपुरवठा उपकेंद्रातून त्याक्षणास बंद होऊन वीज वाहिनी तुटून होणाºया अपघातात घट होईल.उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी होण्याचा धोका नाही. लघुदाब वाहिनी नसल्याने योग्य दाबाने वीजपुरवठा.प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन शेतकरी असल्यामुळे शेतकºयांमध्ये रोहित्र स्वामित्वाची भावना निर्माण होईल. त्यामुळे या रोहित्रावरुन अनधिकृत वीज जोडणी होणार नाही. तसेच रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही घट होईल.