शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
4
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
5
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
6
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
7
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
8
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
9
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
11
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
12
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
14
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
15
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
16
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
17
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
18
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
19
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
20
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

कृषी पंप वीज जोडणीसाठी १८७ कोटींच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:57 IST

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या ...

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या थ्री फेज वितरण रोहित्राद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. एका रोहित्रावर फक्त एक किंवा दोन कृषिपंप असणार आहेत.प्रचलित पध्दतीनुसार शेतीला ६३ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरुन वीजपुरवठा होतो. एका रोहित्रावर १५ ते २० शेतीपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे तसेच तांत्रिक गळती वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रासाठी उच्च्दाब वितरण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे.शेतकºयांच्या विहिरीपर्यंत उच्च दाबाची वाहिनी उभारुन वीज जोडणी दिली जाणार आहे. ७.५ अश्वशक्ती जोडभारासाठी दहा केव्हीएचे, दहा अश्वशक्तीसाठी १६, तर त्याहून अधिक भार किंवा शेजारी दुसरे शेतकरी असल्यास २५ केव्हीए क्षमतेचे थ्री फेज रोहित्र खांबावरच बसविले जाणार आहे. त्याच खांबावर रोहित्राच्या खाली मीटरपेटी बसवून जोडणी दिली जाणार आहे.सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ प्रलंबित कृषिपंप जोडण्यांसाठी १८७ कोटी ९५ लाखाच्या निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच संपूर्ण जोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीतूनच मिळणार आहेत.नवीन प्रणालीचे फायदेलघुदाब वाहिनीचे जाळे नसल्यामुळे बिघाडाचे प्रमाणात कमी होऊन अखंडित व शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे.उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने विजेची तार तुटल्यास वीजपुरवठा उपकेंद्रातून त्याक्षणास बंद होऊन वीज वाहिनी तुटून होणाºया अपघातात घट होईल.उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी होण्याचा धोका नाही. लघुदाब वाहिनी नसल्याने योग्य दाबाने वीजपुरवठा.प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन शेतकरी असल्यामुळे शेतकºयांमध्ये रोहित्र स्वामित्वाची भावना निर्माण होईल. त्यामुळे या रोहित्रावरुन अनधिकृत वीज जोडणी होणार नाही. तसेच रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही घट होईल.