शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कृषी पंप वीज जोडणीसाठी १८७ कोटींच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:57 IST

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या ...

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यापुढे कृषी पंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण कंपनीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ कृषिपंप धारकांसाठी १८७ कोटी ९५ लाखांची निविदा मागविल्या असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकºयांच्या गरजेनुसार दहा ते पंचवीस केव्हीए क्षमतेच्या छोट्या थ्री फेज वितरण रोहित्राद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. एका रोहित्रावर फक्त एक किंवा दोन कृषिपंप असणार आहेत.प्रचलित पध्दतीनुसार शेतीला ६३ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरुन वीजपुरवठा होतो. एका रोहित्रावर १५ ते २० शेतीपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे तसेच तांत्रिक गळती वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रासाठी उच्च्दाब वितरण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे.शेतकºयांच्या विहिरीपर्यंत उच्च दाबाची वाहिनी उभारुन वीज जोडणी दिली जाणार आहे. ७.५ अश्वशक्ती जोडभारासाठी दहा केव्हीएचे, दहा अश्वशक्तीसाठी १६, तर त्याहून अधिक भार किंवा शेजारी दुसरे शेतकरी असल्यास २५ केव्हीए क्षमतेचे थ्री फेज रोहित्र खांबावरच बसविले जाणार आहे. त्याच खांबावर रोहित्राच्या खाली मीटरपेटी बसवून जोडणी दिली जाणार आहे.सांगली जिल्ह्यातील १३ हजार ४८७ प्रलंबित कृषिपंप जोडण्यांसाठी १८७ कोटी ९५ लाखाच्या निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच संपूर्ण जोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीतूनच मिळणार आहेत.नवीन प्रणालीचे फायदेलघुदाब वाहिनीचे जाळे नसल्यामुळे बिघाडाचे प्रमाणात कमी होऊन अखंडित व शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे.उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने विजेची तार तुटल्यास वीजपुरवठा उपकेंद्रातून त्याक्षणास बंद होऊन वीज वाहिनी तुटून होणाºया अपघातात घट होईल.उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी होण्याचा धोका नाही. लघुदाब वाहिनी नसल्याने योग्य दाबाने वीजपुरवठा.प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन शेतकरी असल्यामुळे शेतकºयांमध्ये रोहित्र स्वामित्वाची भावना निर्माण होईल. त्यामुळे या रोहित्रावरुन अनधिकृत वीज जोडणी होणार नाही. तसेच रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही घट होईल.