शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१७ गावे सवलतींपासून वंचित

By admin | Updated: December 15, 2015 23:43 IST

कडेगाव तालुक्याचे चित्र : ५० टक्केहून कमी पैसेवारी असतानाही अन्याय

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ५६ पैकी ३९ गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीत केला आहे. परंतु खरीप हंगामात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १७ गावांचा दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ५० पैसे कमी पैसेवारी असतानाही या १७ गावांवर अन्याय का?, असा संतप्त सवाल या गावांचे नागरिक करीत आहेत. जि. प. सदस्य सुरेश मोहिते यांनी या गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये करण्याबाबतचे निवेदन दिले होते. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तसा अहवालही प्रांताधिकारी, कडेगाव यांच्याकडून शासनाकडे पाठविला आहे. परंतु शासनाच्या लाल फितीच्या कारभारात हा प्रस्ताव अडकला आहे.शासनाने राज्यात दुष्काळसदृश गावांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील ३९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु वंचित राहिलेल्या १७ गावांना दुष्काळी गावांच्या सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे.शेती वीजबिलात ३३.५ टक्के सूट, महाविद्यालय, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, आवश्यकतेप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा, शेतीपंपांची वीजबिल थकबाकीमुळे वीज तोडण्यास बंदी आदी सुविधांपासून ही गावे वंचित राहिली आहेत. कडेगाव तालुक्यातील वंचित गावे व कंसात पैसेवारी अशी - वांगी (४७), शिवणी ४४, हिंगणगाव (खुर्द) ४७, वडियेरायबाग ४४, शेळकबाव ४६, रामापूर ४७, चिंचणी (वांगी) ४७, देवराष्ट्रे ४७, शिरगाव ४६, मोहित्यांचे वडगाव ४६, कुंभारगाव ४६, सोनकिरे ४७, पाडळी ४७, सोनसळ ४५, शिरसगाव ४४. या सर्व गावांची २०१५-१६ ची पैसेवारी ५० पैशाच्या खाली आहे. तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित गावांची पैसेवारी ५० पैशाच्या खाली असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून या गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये करावा, अशी मागणी होत आहे.कडेगाव तालुक्यातील या १७ गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावांमध्ये करावा, अन्यथा शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेश मोहिते यांनी दिला. याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. (वार्ताहर)सर्वात कमी पावसाची नोंद असतानाही चिंचणी वंचित चिंचणी (वांगी) येथे पावसाळ्यात केवळ २६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वात कमी पाऊस चिंचणी (वांगी) येथे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शिवाय पीक उत्पादनाची पैसेवारीही ५० टक्केपेक्षा कमी म्हणजेच ४७ टक्के इतकीच आहे. तरीही दुष्काळसदृश गावांच्या यादीत चिंचणी (वांगी) गावाचा समावेश नाही. चिंचणी (वांगी) गावाचा समावेश तातडीने दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करावा, अशी मागणी सरपंच संजय पाटील यांनी केली आहे.