शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

१७ गावे सवलतींपासून वंचित

By admin | Updated: December 15, 2015 23:43 IST

कडेगाव तालुक्याचे चित्र : ५० टक्केहून कमी पैसेवारी असतानाही अन्याय

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ५६ पैकी ३९ गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीत केला आहे. परंतु खरीप हंगामात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १७ गावांचा दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ५० पैसे कमी पैसेवारी असतानाही या १७ गावांवर अन्याय का?, असा संतप्त सवाल या गावांचे नागरिक करीत आहेत. जि. प. सदस्य सुरेश मोहिते यांनी या गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये करण्याबाबतचे निवेदन दिले होते. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तसा अहवालही प्रांताधिकारी, कडेगाव यांच्याकडून शासनाकडे पाठविला आहे. परंतु शासनाच्या लाल फितीच्या कारभारात हा प्रस्ताव अडकला आहे.शासनाने राज्यात दुष्काळसदृश गावांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील ३९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु वंचित राहिलेल्या १७ गावांना दुष्काळी गावांच्या सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे.शेती वीजबिलात ३३.५ टक्के सूट, महाविद्यालय, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, आवश्यकतेप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा, शेतीपंपांची वीजबिल थकबाकीमुळे वीज तोडण्यास बंदी आदी सुविधांपासून ही गावे वंचित राहिली आहेत. कडेगाव तालुक्यातील वंचित गावे व कंसात पैसेवारी अशी - वांगी (४७), शिवणी ४४, हिंगणगाव (खुर्द) ४७, वडियेरायबाग ४४, शेळकबाव ४६, रामापूर ४७, चिंचणी (वांगी) ४७, देवराष्ट्रे ४७, शिरगाव ४६, मोहित्यांचे वडगाव ४६, कुंभारगाव ४६, सोनकिरे ४७, पाडळी ४७, सोनसळ ४५, शिरसगाव ४४. या सर्व गावांची २०१५-१६ ची पैसेवारी ५० पैशाच्या खाली आहे. तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित गावांची पैसेवारी ५० पैशाच्या खाली असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून या गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये करावा, अशी मागणी होत आहे.कडेगाव तालुक्यातील या १७ गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावांमध्ये करावा, अन्यथा शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेश मोहिते यांनी दिला. याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. (वार्ताहर)सर्वात कमी पावसाची नोंद असतानाही चिंचणी वंचित चिंचणी (वांगी) येथे पावसाळ्यात केवळ २६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वात कमी पाऊस चिंचणी (वांगी) येथे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शिवाय पीक उत्पादनाची पैसेवारीही ५० टक्केपेक्षा कमी म्हणजेच ४७ टक्के इतकीच आहे. तरीही दुष्काळसदृश गावांच्या यादीत चिंचणी (वांगी) गावाचा समावेश नाही. चिंचणी (वांगी) गावाचा समावेश तातडीने दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करावा, अशी मागणी सरपंच संजय पाटील यांनी केली आहे.