शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

आबांच्या स्मारकाचे १६ रोजी भूमिपूजन

By admin | Updated: August 8, 2016 23:36 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : एका वर्षात काम पूर्ण करण्याचा निर्णय

सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील महात्मा गांधी वसतिगृह परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे मंगळवार, दि. १६ आॅगस्टला, आबांच्या जयंतीदिनी भूमिपूजन करण्यात येणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले. एका वर्षात स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीतही एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले. १२ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांच्याकडून स्मारक स्थळाची पाहणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाने आबांच्या स्मारकाला दहा कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून यातील पाच कोटी रूपये निधी प्राप्त झाला आहे. स्मारकामध्ये संग्रहालय, सभागृह, ग्रंथालय, कलादालन, ज्यामध्ये आर. आर. आबांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या चित्रांचा समावेश असणार आहे. स्मारकाला देण्यात येणारा रंगही आबांच्या स्वच्छ प्रतिमेला साजेसा असा पांढरा देण्यात येणार असून स्मारकाला विधानभवनाप्रमाणे आकार देण्याचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला. आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले की, आबांच्या जयंतीदिनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असून एका वर्षाच्या आत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. केवळ स्मारकाचे बांधकाम न करता वसतिगृहसुध्दा अद्ययावत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांना, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत.यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, स्मिता पाटील, ताजुद्दिन तांबोळी, वास्तुविशारद प्रमोद चौगुले उपस्थित होते. (प्रतिनिधी)ुवसतिगृहाला नाव द्या गांधी वसतिगृहाच्या जागेवर होणाऱ्या आर. आर. पाटील यांच्या स्मारकास विरोध नाही. मात्र, याठिकाणी होणारे स्मारक वसतिगृहरूपी होऊन त्याचा केवळ शैक्षणिक कारणासाठीच उपयोग व्हावा, अशी मागणी महात्मा गांधी वसतिगृह बचाव आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. स्मारकाची उभारणी करताना वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. सध्या १५० विद्यार्थी राहू शकतात. पण हजार विद्यार्थी राहू शकतील असे वसतिगृह बांधून त्याला आबांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली. समितीचे महेश खराडे, कबीर मुलाणी, प्रतीक पाटील, सागर चव्हाण, विजय गडदे आदींनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.