शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

जिल्हा परिषदेला पाणीपट्टी उपकराचा १५ कोटींचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST

ग्रामपंचायतींनी पाणी नळपाणी पुरवठा योजनांसाठी उचललेल्या पाण्यापोटी रॉयल्टी म्हणून काही ठराविक रक्कम पाटबंधारे विभागास द्यावे लागते. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ...

ग्रामपंचायतींनी पाणी नळपाणी पुरवठा योजनांसाठी उचललेल्या पाण्यापोटी रॉयल्टी म्हणून काही ठराविक रक्कम पाटबंधारे विभागास द्यावे लागते. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना आहेत व ते नदी, तलाव आदी ठिकाणाहून पाणी उपसा करत असतात. मात्र १९९२ पासून या पाण्यावर द्यायचा उपकरच या ग्रामपंचायतींनी भरला नाही. अनेकदा विनंती करूनही ग्रामपंचायती पैसे भरत नसल्याने पाटबंधारे विभागाने हे थकीत पैसे जिल्हा परिषदेकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला. तसेच आदेश प्राप्त करून घेतले.

पाटबंधारे विभागास ग्रामपंचायतीसह इतरही संस्था-आस्थापनांकडून पाण्यावर रॉयल्टी मिळते. या मिळणाऱ्या सर्व रॉयल्टीमधून काही हिस्सा जिल्हा परिषदेला द्यायचा असतो. पाटबंधारे विभाग हे पैसे जिल्हा परिषदेस देते. हे पैसे देताना पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतींचे पैसे कपात करून घेतले असून जिल्हा परिषदेनेच ते ग्रामपंचायतींकडून वसूल करावे असे सांगितले आहे. पाटबंधारेने जिल्हा परिषदेकडून पैसे कपात करून घेतल्याने पाटबंधारे विभाग सुटला मात्र जिल्हा परिषद अडकली आहे. सर्वच ग्रामपंचायतींकडून हे पैसे भरण्यास टाळाटाळ होत आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीला द्यायच्या मुद्रांक अनुदानातून हे पैसे कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र करण्यात येणारी कपात व प्रत्यक्षात असणारी थकबाकी यामध्ये मोठी तफावत आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा प्रत्येक वर्षी स्वीय निधीला कात्री लागणार आहे.

चौकट

तालुकानिहाय थकीत पाणीपट्टी

कडेगाव : ४१५४०९

जत : ८१०१३५

कवठेमहांकाळ : १६१७२६८९

आटपाडी : २४४४१८६

तासगाव : २६४८४७३२

शिराळा : ५०५५५०१

मिरज : ३६७७६६४३

पलूस : ३४५९५१८३

खानापूर : ६३५४९

वाळवा :२८२४९४६४

एकूण : १५१०६७४९२