शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जिल्हा परिषदेला पाणीपट्टी उपकराचा १५ कोटींचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST

ग्रामपंचायतींनी पाणी नळपाणी पुरवठा योजनांसाठी उचललेल्या पाण्यापोटी रॉयल्टी म्हणून काही ठराविक रक्कम पाटबंधारे विभागास द्यावे लागते. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ...

ग्रामपंचायतींनी पाणी नळपाणी पुरवठा योजनांसाठी उचललेल्या पाण्यापोटी रॉयल्टी म्हणून काही ठराविक रक्कम पाटबंधारे विभागास द्यावे लागते. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना आहेत व ते नदी, तलाव आदी ठिकाणाहून पाणी उपसा करत असतात. मात्र १९९२ पासून या पाण्यावर द्यायचा उपकरच या ग्रामपंचायतींनी भरला नाही. अनेकदा विनंती करूनही ग्रामपंचायती पैसे भरत नसल्याने पाटबंधारे विभागाने हे थकीत पैसे जिल्हा परिषदेकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला. तसेच आदेश प्राप्त करून घेतले.

पाटबंधारे विभागास ग्रामपंचायतीसह इतरही संस्था-आस्थापनांकडून पाण्यावर रॉयल्टी मिळते. या मिळणाऱ्या सर्व रॉयल्टीमधून काही हिस्सा जिल्हा परिषदेला द्यायचा असतो. पाटबंधारे विभाग हे पैसे जिल्हा परिषदेस देते. हे पैसे देताना पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतींचे पैसे कपात करून घेतले असून जिल्हा परिषदेनेच ते ग्रामपंचायतींकडून वसूल करावे असे सांगितले आहे. पाटबंधारेने जिल्हा परिषदेकडून पैसे कपात करून घेतल्याने पाटबंधारे विभाग सुटला मात्र जिल्हा परिषद अडकली आहे. सर्वच ग्रामपंचायतींकडून हे पैसे भरण्यास टाळाटाळ होत आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीला द्यायच्या मुद्रांक अनुदानातून हे पैसे कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र करण्यात येणारी कपात व प्रत्यक्षात असणारी थकबाकी यामध्ये मोठी तफावत आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा प्रत्येक वर्षी स्वीय निधीला कात्री लागणार आहे.

चौकट

तालुकानिहाय थकीत पाणीपट्टी

कडेगाव : ४१५४०९

जत : ८१०१३५

कवठेमहांकाळ : १६१७२६८९

आटपाडी : २४४४१८६

तासगाव : २६४८४७३२

शिराळा : ५०५५५०१

मिरज : ३६७७६६४३

पलूस : ३४५९५१८३

खानापूर : ६३५४९

वाळवा :२८२४९४६४

एकूण : १५१०६७४९२