शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आयातीस परवानगीनंतर सोयाबीनच्या दरात १५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:29 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेले उत्पादन, महापूर व अतिवृष्टीमुळे देशांतर्गत पिकांचे झालेले नुकसान यामुळे ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेले उत्पादन, महापूर व अतिवृष्टीमुळे देशांतर्गत पिकांचे झालेले नुकसान यामुळे मागील काही आठवड्यांपासून चढणारे सोयाबीनचे भाव अचानक खाली गेले आहेत. दरात १५ टक्के घट झाली असून, सोयाबीनच्या पशूखाद्य आयातीस परवानगी दिल्याचा हा परिणाम असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात वेगाने वाढ होत आहे. ६५ रुपये किलोवरुन १०० रुपयांपर्यंत भाव वाढल्याने अनेक सोया प्रक्रिया उद्योगांना याचा फटका बसला. यात सर्वाधिक फटका पोल्ट्री उद्योगाला बसला होता. सोया खाद्य महागल्याने त्यांच्या खर्चात यामुळे दुप्पट वाढ झाली होती. ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशनने या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे शून्य आयात शुल्कावर सोया पशू खाद्य आयातीस परवानगीची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षाही भारतातील सोयाबीनचे भाव अधिक असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. त्यावरुन गेले दीड महिना खल सुरु होता.

आता केंद्रीय पशूपालन व डेअरी मंत्रालयाने सोयाबीन आयातीला परवानगी दिल्याने सोयाबीनच्या बाजारावर परिणाम दिसत आहे. सांगलीच्या मार्केट यार्डातील सौद्यात गुरुवारी सोयाबीनला किमान ८ हजार व कमाल ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. मागील आठवड्यात तो किमान ९ हजार तर कमाल १० हजार इतका होता.

सोयाबीनवर चालणाऱ्या उद्योजकांनीही सोयाबीनच्या दरवाढीवर नाराजी व्यक्त करत केंद्र शासनाकडे दर नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. बुधवारी पशुपालन व डेअरी मंत्रालयाचे सहआयुक्त एस. के. दत्ता यांनी १४ लाख मेट्रिक टन सोया पशुखाद्य आयातीस परवानगी दिली.

कोट

केंद्र शासनाने पोल्ट्रीसाठी लागणाऱ्या सोयाबीन खाद्याच्या आयातीला हिरवा कंदील दर्शविला आहे. त्याबाबत सूचनापत्रक निघाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाला आम्ही याबद्दल धन्यवाद देतो. सोयाबीनच्या दरात यामुळे अपेक्षित उतार सुरु होईल. यापुढेही केंद्र शासनाने या दरावर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष द्यावे. तातडीने हा निर्णय झाला नसता तर देशातील अनेक पोल्ट्री उद्योजक दिवाळखोरीत गेले असते.

- रमेश खत्री, अध्यक्ष, पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया