शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कोयना, चांदोलीमध्ये वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

सांगली : कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार केले जात आहे. खाद्य म्हणून सागरेश्वर आणि ...

सांगली : कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार केले जात आहे. खाद्य म्हणून सागरेश्वर आणि कात्रज येथून सांबर व चितळ आणून सोडली जातील. हरणांची पैदास वाढल्यानंतर ताडोबा वनक्षेत्रामधून वाघ आणून सोडले जाणार आहेत.

वन्यजीव संवर्धन आराखड्यानुसार राज्यात वाघांचे अधिवास क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. सध्या ताडोबा वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त वाघ नोंदवले गेलेत. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही संख्या वाढली आहे. जंगलक्षेत्रातील वाघ मानवी वस्तीत शिरल्याने रहिवासी त्रस्त आहेत; शिवाय जीवितहानीही होत आहे. त्यामुळे वाघांचा समतोल राखण्याचे नियोजन आहे. अतिरिक्त वाघांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यापूर्वीच घोषित झाला आहे. कोयना आणि चांदोलीचे जंगल त्याअंतर्गत येते. सध्या येथे बिबटे भरपूर आहेत, वाघ मात्र एखादाच आहे. वाघ वाढविण्यासाठी काही वर्षांपूर्वी कात्रजमधून ४० हून अधिक हरणे आणली होती. झोळंबी क्षेत्रात डीअर पार्क तयार केला होता. काही दिवसांनी हरणे जंगलक्षेत्रात सोडली, पण पैदास वाढली की नाही, हे मात्र निश्चित नाही. सोलापूरच्या प्राणीसंग्रहालयातून जास्त झालेले काळवीट आणण्याचे नियोजन प्राधिकरणाच्या नकारामुळे प्रत्यक्षात आले नाही.

चौकट

पाहुण्यांना चांदोली, कोयना मानवणार का?

डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून वाघांच्या पुनर्वसनाचा अभ्यास चार वर्षांपासून सुरू आहे. वाघांचा वावर, सुरक्षितता, खाद्याची उपलब्धता, भविष्यात पैदास होण्यासाठी अनुकूलता, मानवी वस्तीपासून अंतर, शिकारीचे धोके या सर्व बाबींचा अभ्यास सुरू आहे. ताडोबाच्या हवामानातील वाघांना चांदोली, कोयना मानवेल काय, याचाही अदमास घेतला जात आहे. अभ्यास अंतिम टप्प्यात असून, संस्थेने हिरवा कंदील दाखवल्यानंतर नवे पाहुणे चांदोली, कोयनेत रुजू होतील. पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद घेता येईल.

चौकट

चांदोलीत स्थानिक वाघ नाही

चांदोलीत एखादाच व कोयनेत तीन ते चार वाघ आढळले आहेत, पण ते स्थानिक रहिवासी नाहीत. चांदोली, कोयना, दाजीपूर-राधानगरी, तिलारी हा त्यांचा कॅरिडॉर आहे. ताडोबातून आणलेले वाघही या कॅरिडॉरमध्ये फिरल्यास जास्त संख्येमुळे मानवी वस्त्यांत शिरण्याची शक्यता वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली. अर्थात ३१७ चौरस किलोमीटरच्या चांदोलीमध्ये पुरेसे खाद्य मिळाल्यास ते अन्यत्र भटकणार नाहीत, असाही अंदाज आहे.