शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

महापालिका क्षेत्रात १३८ धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:31 IST

सांगली : पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून, महापालिका क्षेत्रात १३८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या ...

सांगली : पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून, महापालिका क्षेत्रात १३८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या मिळकतधारकांना महापालिकेच्या वतीने नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. धोकादायक इमारती तत्काळ उतरवून घ्याव्यात, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

धोकादायक इमारत अथवा धोकादायक भाग उतरवून घ्यावा. अतिधोकादायक इमारत तत्काळ रिकामी करून उतरवून घ्यावी. धोकादायक भाग उतरविण्यापूर्वी बाजूच्या इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जरुरीप्रमाणे टेके द्यावेत. कोणासही धोका पोहोचणार नाही, अशा दृष्टीने सर्व उपाययोजना व तजवीज करावी, असे आवाहन महापालिका प्रभाग समितींच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

दरम्यान, महापालिकेने धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू केले आहे. या नोटिसीत जुलै आणि ऑगस्ट २०१९ मध्ये झालेली अतिवृष्टी व कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ज्यांच्या इमारती, घरे राहण्यास अत्यंत धोकादायक झालेले आहेत, अशा मिळकतधारकांनी धोकादायक इमारती, घरे तत्काळ उतरवून घ्यावीत. त्याबाबत कार्यवाही न केल्यास व जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित मिळकतधारक जबाबदार राहतील. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. खटला भरण्याचा महानगरपालिकेस अधिकार राहील, असे म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक, मोडकळीस आलेल्या खासगी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करावयाची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणेने ही कार्यवाही करावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

चौकट

धोकादायक इमारतींचे पुढे काय?

सध्या महापालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारतींनी नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. नोटिसीनंतर धोकादायक इमारती निष्काशित करण्याची कारवाई केली जाते. जागामालकाने इमारत उतरवून घेतली नाही तर महापालिकेकडून ती पाडण्यात येते व त्याचा खर्च जागा मालकांकडून वसूल केला जातो.