शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

द्राक्ष निर्यातीत १३१८ टनांची घट

By admin | Updated: April 13, 2015 00:05 IST

अवकाळीचा पंचवीस कोटींचा फटका : व्यापाऱ्यांकडूनही अडवणूक

सांगली : ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यामुळे आणि पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षबागांचे क्षेत्र वाढले होते. हे क्षेत्र गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक असल्यामुळे २०१४-१५ वर्षात द्राक्षांची निर्यातही जादा होणार, असा अंदाज होता. परंतु, फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्यात द्राक्षबागांतील मण्यांना तडे गेल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीच बंद केली. यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचे क्षेत्र जादा असूनही १३१८ टनाने द्राक्षांची निर्यात कमी झाल्यामुळे बागायतदारांना वीस ते पंचवीस कोटींचा फटका बसला आहे. जिल्ह्यात ४१ हजार २०० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र असून यामध्ये निर्यातक्षम द्राक्षांचे एक हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. युरोपीय राष्ट्रांत जिल्ह्यातील द्राक्षाला चांगली मागणी आहे. शिवाय, तेथे दरही चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीकडे वळला होता. शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होत होता. जिल्ह्यात २०१०-११ मध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे ९४८ शेतकऱ्यांनी ४००.३४ हेक्टर क्षेत्रावरील सहा हजार २५२ टन द्राक्षांची निर्यात केली होती. त्यानंतर २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षापर्यंत जिल्ह्यातून सरासरी साडेचार हजार टन द्राक्षे निर्यात झाली होती. शंभर ते दीडशे कोटींचे परकीय चलन जिल्ह्याला मिळत होते. २०१४-१५ या वर्षात निर्यातक्षम द्राक्षांसाठी प्रशासनाकडे ९३७ शेतकऱ्यांनी ४४६.३५ हेक्टरची नोंदणी केली होती. सर्वाधिक द्राक्षांची निर्यात होईल, असाच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज होता. पण, फेबु्रवारी आणि मार्च २०१५ मध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. द्राक्षबागेतील काही मण्यांना तडे गेल्यामुळे व्यापाऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष खरेदीच थांबविली. निर्यातदार व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार द्राक्षबागेतील एखाद्या घडामधील मण्याला तडा गेला असेल, तर पूर्ण बॉक्समधील द्राक्षांना भुरी लागण्याची शक्यता असते. कारण, युरोपीय राष्ट्रांपर्यंत द्राक्षे पोहोचण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधित पूर्ण कंटेनरमधील द्राक्षांना भुरी लागून ती खराब होण्याची शक्यता असते. यामुळेच द्राक्ष खरेदी थांबविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) द्राक्ष निर्यात जादा होणार अशी अपेक्षा होती. परंतु, अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे फार मोठे नुकसान झाल्यामुळे ३७४१ टन द्राक्षांचीच निर्यात झाली आहे. आता जत, खानापूर तालुक्यातून काही प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता आहे. -डी. एस. शिलेदार, कृषी अधिकारी. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा वर्षक्षेत्र (हेक्टर) शेतकरी संख्या टनकंटेनर २०१०-११४००़३४९४८६२५२५०२ २०११-१२४३८़२३९८४४६३८३८० २०१२-१३३३०़७५७४७४१६८३२८ २०१३-१४३९८.७६८४४५०५९३९६ २०१४-१५४४६.३५९३७३७४१२९६