शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जत तालुक्यात वर्षात ११२ कोटींची कामे

By admin | Updated: November 5, 2015 23:56 IST

विलासराव जगताप : प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार

जत : तालुक्यात मागील एक वर्षात ११२ कोटी पन्नास लाख रुपयांची विविध विकास कामे प्रशानकीय पातळीवर मंजुर करून घेवून ती पूर्णत्वास नेली आहेत अशी माहीती आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.तालुक्यातील प्रमुख रस्त्यासाठी ७६ कोटी रुपयाचा निधी मंजुर करून घेऊन प्रत्यक्षात कामे सुरू केली आहेत. यातील सर्वच कामे प्रगती पथावर आहेत. आमदार फंडातून सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या दोन आर्थिक वर्षासाठी चार कोटी ७४ लाख सात हजार रुपयांची कामे प्रस्तावित क रण्यात आली आहेत तालुक्यातील वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाला सतत सुचना केली त्यामुळे त्यांनी तीन वाळू तस्करावर गुन्हे दाखल करुन ५८ लाख रुपये दंड वसूल केला आहे. मागासवर्गीय सुधार योजना व २५१५ शिर्षातंर्गत एक कोटी ३१ लाख ५० हजार रुपये निधी करुन घेतला आहे.भारत निर्माण राष्ट्रीय पेय जल व जलस्वराज्य संघर्षात एक त्रीत बैठक घेऊन अपूर्ण काम पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केला आहेत.मागील पाच वर्षापासून तालुक्यातील २३ भारत निर्माण योजनांचे काम रखडले होते त्यापैकी पाच योजना शासनाकडून मंजून करून घेवून प्रत्यक्षात तेथे काम सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले व हे काम प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले, राष्ट्रीय पेयजन अंतर्गत चार गावासाठी पाच कोटी ३५ लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे. टंचाई कालावधीत शासन दरबारी सतत पाठपुरावी करून म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून आलेल्या पाण्यातून एकतीस तलाव भरून घेतले आहेत. त्यामुळे ३७८ टी सी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्व भागातील ४२ गावात म्हैसाळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी ३२ कोटी रुपये देण्याचे लेखी आश्वासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यांचा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून निधी मिळविला जाईल असेही त्यानी यावेळी सांगितले. (वार्ताहर) जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ४२ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानअंतर्गत ४२ गावांची निवड करून ७५५ विविध प्रकारची कामे तेथे सुरू केली आहेत. यापैकी ६४९ कामावर अकरा कोटी ४७ लाख रुपये २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५३ लाख रुपये व २०१५-१६ या आर्थिक वर्षात २७ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या जलयुक्त शिवाराचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना महत्त्वाचा ठरणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.