शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सद्भावना एकता रॅलीत १० हजार सहभागी होणार जिल्हाधिकाºयांचा विश्वास : रविवारी सांगलीत आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:47 IST

सांगली : शहरासह जिल्ह्यात सुरक्षितता आणि शांतता राहण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. १४ जानेवारीला सकाळी ९ वाजता सांगलीत सद्भावना एकता रॅली काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिली सद्भावना एकता रॅली मना-मनांना सांधणारा धागा ठरेल. यातून एकतेचा, सामाजिक समतेचा विचार पेरला जाणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाºया घटकांसाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित खातेप्रमुखांना दिले

सांगली : शहरासह जिल्ह्यात सुरक्षितता आणि शांतता राहण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. १४ जानेवारीला सकाळी ९ वाजता सांगलीत सद्भावना एकता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते असा दहा हजाराचा जनसमुदाय सहभागी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिली.

कोरेगाव-भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार, दि. १४ जानेवारी रोजी सद्भावना एकता रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, यावेळी जिल्हाधिकारी काळम-पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी काळम-पाटील म्हणाले की, आपल्या शहरात सामाजिक सलोखा आणि एकी राहावी, यासाठी ही एकता रॅली काढण्यात येत आहे. अधिकारी, कर्मचाºयांनी शासकीय उपक्रमाचा सोपस्कार म्हणून नव्हे, तर समाजाचा एक घटक म्हणून या रॅलीत मन:पूर्वक सहभागी व्हावे. या रॅलीमध्ये सहभागी होणाºया घटकांसाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित खातेप्रमुखांना दिले. रॅलीसाठी नियंत्रण समिती, व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी समिती आदी समित्यांची स्थापना करण्याचे आणि उपस्थितांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून रूग्णवाहिका, अग्निशामक, वैद्यकीय पथक आदींची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, विविध मोर्चांमुळे भौतिक नुकसानीपेक्षा मना-मनांमध्ये दुही निर्माण होते. ही एकप्रकारे भरून न येणारी सामाजिक मानसिक हानी आहे. शासकीय सेवेत येताना आपण मानवतेची शपथ घेत असतो. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने काढण्यात येणारी ही राज्यातील पहिली सद्भावना एकता रॅली मना-मनांना सांधणारा धागा ठरेल. यातून एकतेचा, सामाजिक समतेचा विचार पेरला जाणार आहे. यात आपले हात एकत्र येणार नसून, मने गुंफली जाणार असल्याचेही शर्मा यांनी यावेळी सांगितले.सर्वपक्षीय कृती समितीचा पाठिंबासर्वपक्षीय कृती समितीने या एकता रॅलीला पाठिंबा दिला आहे. अन्य सामाजिक संघटनाही आंदोलनात सहभागी होणार आहेत. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध समाजसुधारकांच्या वेशभूषेत यावे, असेही या बैठकीत सूचित करण्यात आले. रॅलीच्या सुरुवातीस एकच राष्ट्रध्वज असणार आहे. अन्य कोणताही झेंडा या रॅलीत असणार नाही. यावेळी उपस्थितांना एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे. 

रॅलीचा मार्गदि. १४ जानेवारीला सकाळी ९ वाजता सर्वजण पुष्पराज चौकामध्ये एकत्रित जमा होणार आहेत. या चौकापासून ही रॅली सुरु होऊन राम मंदिर, पंचमुखी मारूती रस्ता, गरवारे महाविद्यालय, महानगरपालिका, राजवाडा चौक मार्गे निघून शिवाजी स्टेडियममध्ये येऊन रॅलीची सांगता होईल. या रॅलीमध्ये विविध विभागांचे मंत्री, अभिनेते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.