शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

वाळवा तालुक्यात पुरामुळे शेतीचे १० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरात वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरात वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार, किमान ८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होईल. ही पिके कुजण्याचा धोका असल्याने, शेतकऱ्यांचे किमान १० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फळे, भाजीपाल्याचे तर पूर्ण नुकसान झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून पुराच्या पाण्याने शेतामध्ये ठाण मांडले आहे. त्यामुळे आडसाली ऊस या नगदी पिकासह सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी, कडधान्ये अशा सर्व पिकांची नासाडी होण्याची भीती आहे, तसेच शेतात उभा असलेला उसाचेही नुकसान होणार आहे. यावेळी तरी खरीप पिके हाताला लागतील, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची या महापुराने पूर्ण निराशा करून टाकली आहे.

तालुक्यात १२ हजार २२९ हेक्टर क्षेत्रावर नवीन आडसाली उसाची लागण करण्यात आली आहे. उसाचे एकूण क्षेत्र हे ४७ हजार ९३२ हेक्टर आहे. त्या खालोखाल १६ हजार २१९ हेक्टरमध्ये सोयाबीन पीक आहे, तर ९ हजार ३१९ हेक्टर क्षेत्रात भुईमुगाचे पीक आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठाला असणाऱ्या या पिकांना मोठा फटका बसणार आहे. वारणा नदीचे पाणी पात्रातून लगेच बाहेर पडून ते वेगाने शेतपट्ट्यात घुसत असल्याने, या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने म्हणाले, या पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पिके कुजून जाण्याचा धोका आहे. आडसाली उसाची लागण आणि खरीप पिकांचे नुकसान लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर गावनिहाय कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक अशी पथके केली आहेत. त्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, त्यांनी या पथकाशी संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती द्यावी. पथकांकडून नुकसानीची पाहणी करून, हा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाईल.

फोटो : २५ इस्लामपुर ३..४

वाळवा तालुक्यातील बहे येथे पुराच्या पाण्यात बाधित झालेले सोयाबीन आणि भुईमुगाचे पीक, तर दुसऱ्या छायाचित्रात वारणा नदीकाठचे उसाचे पीक असे उन्मळून पडले आहे.