शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

वाळवा तालुक्यात पुरामुळे शेतीचे १० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरात वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरात वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार, किमान ८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होईल. ही पिके कुजण्याचा धोका असल्याने, शेतकऱ्यांचे किमान १० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फळे, भाजीपाल्याचे तर पूर्ण नुकसान झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून पुराच्या पाण्याने शेतामध्ये ठाण मांडले आहे. त्यामुळे आडसाली ऊस या नगदी पिकासह सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी, कडधान्ये अशा सर्व पिकांची नासाडी होण्याची भीती आहे, तसेच शेतात उभा असलेला उसाचेही नुकसान होणार आहे. यावेळी तरी खरीप पिके हाताला लागतील, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची या महापुराने पूर्ण निराशा करून टाकली आहे.

तालुक्यात १२ हजार २२९ हेक्टर क्षेत्रावर नवीन आडसाली उसाची लागण करण्यात आली आहे. उसाचे एकूण क्षेत्र हे ४७ हजार ९३२ हेक्टर आहे. त्या खालोखाल १६ हजार २१९ हेक्टरमध्ये सोयाबीन पीक आहे, तर ९ हजार ३१९ हेक्टर क्षेत्रात भुईमुगाचे पीक आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठाला असणाऱ्या या पिकांना मोठा फटका बसणार आहे. वारणा नदीचे पाणी पात्रातून लगेच बाहेर पडून ते वेगाने शेतपट्ट्यात घुसत असल्याने, या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने म्हणाले, या पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पिके कुजून जाण्याचा धोका आहे. आडसाली उसाची लागण आणि खरीप पिकांचे नुकसान लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर गावनिहाय कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक अशी पथके केली आहेत. त्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, त्यांनी या पथकाशी संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती द्यावी. पथकांकडून नुकसानीची पाहणी करून, हा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाईल.

फोटो : २५ इस्लामपुर ३..४

वाळवा तालुक्यातील बहे येथे पुराच्या पाण्यात बाधित झालेले सोयाबीन आणि भुईमुगाचे पीक, तर दुसऱ्या छायाचित्रात वारणा नदीकाठचे उसाचे पीक असे उन्मळून पडले आहे.