शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

वाळवा तालुक्यात पुरामुळे शेतीचे १० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरात वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरात वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार, किमान ८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होईल. ही पिके कुजण्याचा धोका असल्याने, शेतकऱ्यांचे किमान १० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फळे, भाजीपाल्याचे तर पूर्ण नुकसान झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून पुराच्या पाण्याने शेतामध्ये ठाण मांडले आहे. त्यामुळे आडसाली ऊस या नगदी पिकासह सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी, कडधान्ये अशा सर्व पिकांची नासाडी होण्याची भीती आहे, तसेच शेतात उभा असलेला उसाचेही नुकसान होणार आहे. यावेळी तरी खरीप पिके हाताला लागतील, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची या महापुराने पूर्ण निराशा करून टाकली आहे.

तालुक्यात १२ हजार २२९ हेक्टर क्षेत्रावर नवीन आडसाली उसाची लागण करण्यात आली आहे. उसाचे एकूण क्षेत्र हे ४७ हजार ९३२ हेक्टर आहे. त्या खालोखाल १६ हजार २१९ हेक्टरमध्ये सोयाबीन पीक आहे, तर ९ हजार ३१९ हेक्टर क्षेत्रात भुईमुगाचे पीक आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठाला असणाऱ्या या पिकांना मोठा फटका बसणार आहे. वारणा नदीचे पाणी पात्रातून लगेच बाहेर पडून ते वेगाने शेतपट्ट्यात घुसत असल्याने, या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने म्हणाले, या पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पिके कुजून जाण्याचा धोका आहे. आडसाली उसाची लागण आणि खरीप पिकांचे नुकसान लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर गावनिहाय कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक अशी पथके केली आहेत. त्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, त्यांनी या पथकाशी संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती द्यावी. पथकांकडून नुकसानीची पाहणी करून, हा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाईल.

फोटो : २५ इस्लामपुर ३..४

वाळवा तालुक्यातील बहे येथे पुराच्या पाण्यात बाधित झालेले सोयाबीन आणि भुईमुगाचे पीक, तर दुसऱ्या छायाचित्रात वारणा नदीकाठचे उसाचे पीक असे उन्मळून पडले आहे.