शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वाळव्यात १ लाख ३७ हजार, महापालिकेत १ लाख २६ हजार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचे लसीकरण जास्त असणाऱ्या तालुक्यांना लसीचा जास्त पुरवठा होत आहे. महापालिकेला किंवा वाळवा तालुक्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाचे लसीकरण जास्त असणाऱ्या तालुक्यांना लसीचा जास्त पुरवठा होत आहे. महापालिकेला किंवा वाळवा तालुक्याला जास्त लस दिल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील उपस्थित होते. लस वितरणात भेदभावाच्या तक्रारी काहीजण करत आहेत. त्यावर डुडी म्हणाले, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव, मिरज तालुक्यांत लसीकरणाला प्रतिसाद चांगला आहे. लस मिळताच दुपारपर्यंत संपते, त्यामुळेच तेथील लसपुरवठा जास्त दिसतो. त्यांची लोकसंख्याही जास्त आहे. बुधवारअखेर (दि. ७) सर्वाधिक १ लाख ३८ हजार ८१४ लसीकरण वाळवा तालुक्यात झाले आहे. महापालिका क्षेत्रात १ लाख २६ हजार ६८४ लसीकरण आहे. अन्य लसीकरण असे - आटपाडी ३६ हजार ९८०, जत ५२ हजार ६४, कडेगाव ४१ हजार ३४७, कवठेमहांकाळ ४१ हजार ४४५, खानापूर ३७ हजार ४८३, मिरज ९२ हजार ९०७, पलूस ३८ हजार ९७०, शिराळा ५४ हजार २५९, तासगाव ७१ हजार ५८५ लसीकरण झाले आहे. डुडी म्हणाले, जत तालुक्यात प्रतिसाद कमी आहे. संख, उमदी केंद्रांमध्ये नागरिक पुढे येत नाहीत. तेथे प्रतिसाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या आठवड्यात लसीकरणात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता, त्यामुळे एकाच दिवशी ५८ हजार डोस मिळाले होते. त्यादिवशी कोल्हापूरला ११ हजार ५००, साताऱ्याला ९ हजार ५०० आणि सोलापूरला ८ हजार ५०० डोस मिळाले होते. जिल्ह्याला जास्त डोस मिळावेत, यासाठी दररोज पाठपुरावा सुरु असतो.

डुडी म्हणाले, एकाचवेळी २८० ठिकाणी लसीकरण सुरु करण्याचा प्रयत्न आहे. लस उपलब्धतेनुसार सध्या ११० ठिकाणी लसीकरण सुरु आहे. उपकेंद्र नसेल तेथे शाळांमध्ये सोय करु. गर्दी टाळण्यासाठी कुपन पद्धत राबविण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

पहिला डोस ३२ टक्के लाभार्थ्यांना

डुडी यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३० लाख ७१ हजार ३७२ लाभार्थी आहेत, त्यापैकी ३२ टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक टक्केवारी (४२ टक्के) शिराळ्याची आहे.

चौकट

निवडणुकीमुळे वाळव्यात रुग्ण वाढले

वाळवा तालुक्यात निवडणुकीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा दावा डुडी यांनी केला. कडेगावमध्येही कोरोना अद्याप नियंत्रणात नसल्याचे ते म्हणाले.