शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

वाळव्यात १ लाख ३७ हजार, महापालिकेत १ लाख २६ हजार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचे लसीकरण जास्त असणाऱ्या तालुक्यांना लसीचा जास्त पुरवठा होत आहे. महापालिकेला किंवा वाळवा तालुक्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाचे लसीकरण जास्त असणाऱ्या तालुक्यांना लसीचा जास्त पुरवठा होत आहे. महापालिकेला किंवा वाळवा तालुक्याला जास्त लस दिल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील उपस्थित होते. लस वितरणात भेदभावाच्या तक्रारी काहीजण करत आहेत. त्यावर डुडी म्हणाले, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव, मिरज तालुक्यांत लसीकरणाला प्रतिसाद चांगला आहे. लस मिळताच दुपारपर्यंत संपते, त्यामुळेच तेथील लसपुरवठा जास्त दिसतो. त्यांची लोकसंख्याही जास्त आहे. बुधवारअखेर (दि. ७) सर्वाधिक १ लाख ३८ हजार ८१४ लसीकरण वाळवा तालुक्यात झाले आहे. महापालिका क्षेत्रात १ लाख २६ हजार ६८४ लसीकरण आहे. अन्य लसीकरण असे - आटपाडी ३६ हजार ९८०, जत ५२ हजार ६४, कडेगाव ४१ हजार ३४७, कवठेमहांकाळ ४१ हजार ४४५, खानापूर ३७ हजार ४८३, मिरज ९२ हजार ९०७, पलूस ३८ हजार ९७०, शिराळा ५४ हजार २५९, तासगाव ७१ हजार ५८५ लसीकरण झाले आहे. डुडी म्हणाले, जत तालुक्यात प्रतिसाद कमी आहे. संख, उमदी केंद्रांमध्ये नागरिक पुढे येत नाहीत. तेथे प्रतिसाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या आठवड्यात लसीकरणात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता, त्यामुळे एकाच दिवशी ५८ हजार डोस मिळाले होते. त्यादिवशी कोल्हापूरला ११ हजार ५००, साताऱ्याला ९ हजार ५०० आणि सोलापूरला ८ हजार ५०० डोस मिळाले होते. जिल्ह्याला जास्त डोस मिळावेत, यासाठी दररोज पाठपुरावा सुरु असतो.

डुडी म्हणाले, एकाचवेळी २८० ठिकाणी लसीकरण सुरु करण्याचा प्रयत्न आहे. लस उपलब्धतेनुसार सध्या ११० ठिकाणी लसीकरण सुरु आहे. उपकेंद्र नसेल तेथे शाळांमध्ये सोय करु. गर्दी टाळण्यासाठी कुपन पद्धत राबविण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

पहिला डोस ३२ टक्के लाभार्थ्यांना

डुडी यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३० लाख ७१ हजार ३७२ लाभार्थी आहेत, त्यापैकी ३२ टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक टक्केवारी (४२ टक्के) शिराळ्याची आहे.

चौकट

निवडणुकीमुळे वाळव्यात रुग्ण वाढले

वाळवा तालुक्यात निवडणुकीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा दावा डुडी यांनी केला. कडेगावमध्येही कोरोना अद्याप नियंत्रणात नसल्याचे ते म्हणाले.