शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

Research : ‘या’ कारणामुळे भारतीय तरुणांना लग्न करण्याची असते जास्त घाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 13:33 IST

ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता, काय कारण आहे जाणून घ्या...!

-रवीन्द्र मोरे लग्नाबाबत भारतीय तरुणांचे मत बदलत असून लग्नामुळे त्यांच्या आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल असे त्यांना वाटते.  एका मॅचमेकिंग सर्विसने लग्नाबाबत तरुणांच्या विचारावर सर्वे केला असून त्यात सध्याची तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, हे जाणून घेण्यात आले.  सर्वेमध्ये सहभागी सुमारे २०.५ टक्के पुरुष आणि २३.१ महिलांचे म्हणणे होते की, ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता. त्यातच १२.२ टक्के पुरुष आणि १०.३ टक्के महिलांचे म्हणणे होते की, लग्न त्यांच्यासाठी नाही. तसेच १८. २ टक्के पुरुष आणि १३.२ टक्के महिलांचे म्हणणे होते की, ते अजून लग्नाबाबत विचार करण्यासाठी मॅच्युअर नाहीत.    लग्नासाठी नाही म्हणणाऱ्या लोकांना त्याचे कारण विचारले असता त्यातील बरेच लोकांनी सांगितले की, ते अजून जबाबदारी घेऊ इच्छित नाही. काहींनी असेही सांगितले की, त्यांना लग्नासारख्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही. त्यातच काही लोकांनी कमिटमेंटचेही कारण सांगितले.  या व्यतिरिक्त लग्न करु इच्छिणाऱ्या लोकांना याचा सर्वात मोठा फायदा विचारण्यात आले तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी लग्नामुळे भावनात्मक स्थिरता येते हे कारण सांगितले. काही लोकांनी आर्थिक स्थिरतादेखील कारण सांगितले.  या आॅनलाइन पोलसाठी सुमारे १४ हजार ७०० प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यानुसार सध्याची तरुणाई लग्नाबाबत रिअ‍ॅलिस्टिक आहे, असे आढळून येते. तसे यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी आपल्या पार्टनरचे आपणास भावनात्मक आणि आर्थिक सहकार्य करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते.   Also Read : ​Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?