शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

Research : ‘या’ कारणामुळे भारतीय तरुणांना लग्न करण्याची असते जास्त घाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 13:33 IST

ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता, काय कारण आहे जाणून घ्या...!

-रवीन्द्र मोरे लग्नाबाबत भारतीय तरुणांचे मत बदलत असून लग्नामुळे त्यांच्या आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल असे त्यांना वाटते.  एका मॅचमेकिंग सर्विसने लग्नाबाबत तरुणांच्या विचारावर सर्वे केला असून त्यात सध्याची तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, हे जाणून घेण्यात आले.  सर्वेमध्ये सहभागी सुमारे २०.५ टक्के पुरुष आणि २३.१ महिलांचे म्हणणे होते की, ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता. त्यातच १२.२ टक्के पुरुष आणि १०.३ टक्के महिलांचे म्हणणे होते की, लग्न त्यांच्यासाठी नाही. तसेच १८. २ टक्के पुरुष आणि १३.२ टक्के महिलांचे म्हणणे होते की, ते अजून लग्नाबाबत विचार करण्यासाठी मॅच्युअर नाहीत.    लग्नासाठी नाही म्हणणाऱ्या लोकांना त्याचे कारण विचारले असता त्यातील बरेच लोकांनी सांगितले की, ते अजून जबाबदारी घेऊ इच्छित नाही. काहींनी असेही सांगितले की, त्यांना लग्नासारख्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही. त्यातच काही लोकांनी कमिटमेंटचेही कारण सांगितले.  या व्यतिरिक्त लग्न करु इच्छिणाऱ्या लोकांना याचा सर्वात मोठा फायदा विचारण्यात आले तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी लग्नामुळे भावनात्मक स्थिरता येते हे कारण सांगितले. काही लोकांनी आर्थिक स्थिरतादेखील कारण सांगितले.  या आॅनलाइन पोलसाठी सुमारे १४ हजार ७०० प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यानुसार सध्याची तरुणाई लग्नाबाबत रिअ‍ॅलिस्टिक आहे, असे आढळून येते. तसे यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी आपल्या पार्टनरचे आपणास भावनात्मक आणि आर्थिक सहकार्य करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते.   Also Read : ​Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?