शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

मुलांना होऊ द्या की मोठं स्वत:च, स्वत:हून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:10 IST

तरच वाढेल त्यांचा आत्मविश्वास..

ठळक मुद्देपरीक्षेतील ‘अपेक्षित’ प्रश्नांचा, अभ्यासक्रमाचा रट्टा मुलांकडून मारुन घेतलेला असतो म्हणून ती वाटतात हुशार...पण रट्टेमारु अभ्यासामुळे त्यांच्यात इतर गोष्टींबाबत कॉन्फिडन्स येईलच असं नाही.‘अभ्यासा’च्या नादात मुलांना इतर गोष्टींपासून ठेऊ नका दूर.

- मयूर पठाडेअनेक पालकांना आपल्या मुलांबाबत एका गोष्टीची मोठी चिंता वाटत असते. अभ्यासात तर खूप हुशार आहे, अभ्यासातलं त्याला काहीही विचारा, झटक्यात तो उत्तर देईल, घरातही तो अशिय शार्प आहे, पण बाहेर गेला, की त्याची पार ‘गोगलगाय’ होते. कोणाशीच धड बोलत नाही कि उत्तर देत नाही. घरात प्रत्येक बाबतीत ‘वाघ’ असलेलं आमचं मूल बाहेर कुठे चारचौघांत गेलं की त्याची ‘शेळी’ होते! अगदी नेहमीच्या परिचित लोकांकडे, नातेवाईकांकडे गेलं तरी त्याची बोलती एकदम बंद होते आणि ते लाजाळूचं झाड बनतं..अभ्यासकांनी याचं उत्तर शोधलं आहे. त्यांच्या मते मूल अभ्यासात हुशार आहे, कारण बºयाचदा तुम्ही त्याची घोकंपट्टी करुन घेतलेली असते. परीक्षेतील ‘अपेक्षित’ प्रश्नांचा, त्याच्या अभ्यासक्रमाचा रट्टा पालक म्हणून तुम्हीच त्याच्याकडून मारुन घेतलेला असतो, पण ज्या गोष्टींनी कॉन्फिडन्स येईल, मुलांचा आत्मविश्वास वाढेल, यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही त्याच्या वाट्याला येऊच दिलेल्या नाहीत किंवा ‘अभ्यासा’च्या नादात ‘इतर’ गोष्टींसाठी त्याला वेळच मिळालेला नाही.या इतर गोष्टी म्हणजे काय?.. अभ्यासकांचं म्हणणं आहे, मुलांनी एकवेळ ‘अभ्यास’ केला नाही तरी चालेल. मुळात या वयातल्या मुलांवर अभ्यासाची सक्ती करायलाच नको. त्याऐवजी विविध गोष्टींची ओळख त्याला करुन द्यायला हवी. तीही अगदी सहजपणे. ‘अभ्यासाचं’ लेबल त्यामागे नको. अशा गोष्टी जर आपलं मूल करीत असेल, आपल्या बरोबरच्या मित्रांमध्ये वावरत असेल, त्यांच्याशी खेळत असतानाच, त्यांच्याशी भांडत असेल, काही वेळा कोणाला मारत असेल, तर काही वेळा मार खाऊन येत असेल.. पालक म्हणून तुम्हाला अशा वेळी काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण मुलांची भांडणं आणि मारामाºयांमध्ये अगदीच गरज पडल्याशिवाय तुम्ही मधे पडू नका. मुलं त्यांचे प्रश्न त्यांच्या पद्धतीनं अतिशय उत्तम सोडवतात आणि पुन्हा लगेच एकत्रही येतात. एकोप्यानं खेळायलाही लागतात. मुलांचा आत्मविश्वास वाढतो तो याच गोष्टींतून. समाजात कसं वावरायचं, आपल्या क्षमता काय आहेत आणि त्या कशा पद्धतीनं वापरायच्या, तडजोड कुठे करायची, कुठे थांबायचं.. यासारख्या अनेक गोष्टी मुलं त्यातूनच शिकतात..त्यामुळे मुलांच्या फार मागे मागे न राहता, त्यांच्यावर ‘वॉच’ न ठेवता थोडं लक्ष असू द्या, पण मुलांना त्यांचं त्याचं मोठं होऊ द्या.. त्यामुळे ती खरंच मोठी होतील आणि तुम्हालाही मोठं करतील..