शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

मुलांना होऊ द्या की मोठं स्वत:च, स्वत:हून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:10 IST

तरच वाढेल त्यांचा आत्मविश्वास..

ठळक मुद्देपरीक्षेतील ‘अपेक्षित’ प्रश्नांचा, अभ्यासक्रमाचा रट्टा मुलांकडून मारुन घेतलेला असतो म्हणून ती वाटतात हुशार...पण रट्टेमारु अभ्यासामुळे त्यांच्यात इतर गोष्टींबाबत कॉन्फिडन्स येईलच असं नाही.‘अभ्यासा’च्या नादात मुलांना इतर गोष्टींपासून ठेऊ नका दूर.

- मयूर पठाडेअनेक पालकांना आपल्या मुलांबाबत एका गोष्टीची मोठी चिंता वाटत असते. अभ्यासात तर खूप हुशार आहे, अभ्यासातलं त्याला काहीही विचारा, झटक्यात तो उत्तर देईल, घरातही तो अशिय शार्प आहे, पण बाहेर गेला, की त्याची पार ‘गोगलगाय’ होते. कोणाशीच धड बोलत नाही कि उत्तर देत नाही. घरात प्रत्येक बाबतीत ‘वाघ’ असलेलं आमचं मूल बाहेर कुठे चारचौघांत गेलं की त्याची ‘शेळी’ होते! अगदी नेहमीच्या परिचित लोकांकडे, नातेवाईकांकडे गेलं तरी त्याची बोलती एकदम बंद होते आणि ते लाजाळूचं झाड बनतं..अभ्यासकांनी याचं उत्तर शोधलं आहे. त्यांच्या मते मूल अभ्यासात हुशार आहे, कारण बºयाचदा तुम्ही त्याची घोकंपट्टी करुन घेतलेली असते. परीक्षेतील ‘अपेक्षित’ प्रश्नांचा, त्याच्या अभ्यासक्रमाचा रट्टा पालक म्हणून तुम्हीच त्याच्याकडून मारुन घेतलेला असतो, पण ज्या गोष्टींनी कॉन्फिडन्स येईल, मुलांचा आत्मविश्वास वाढेल, यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही त्याच्या वाट्याला येऊच दिलेल्या नाहीत किंवा ‘अभ्यासा’च्या नादात ‘इतर’ गोष्टींसाठी त्याला वेळच मिळालेला नाही.या इतर गोष्टी म्हणजे काय?.. अभ्यासकांचं म्हणणं आहे, मुलांनी एकवेळ ‘अभ्यास’ केला नाही तरी चालेल. मुळात या वयातल्या मुलांवर अभ्यासाची सक्ती करायलाच नको. त्याऐवजी विविध गोष्टींची ओळख त्याला करुन द्यायला हवी. तीही अगदी सहजपणे. ‘अभ्यासाचं’ लेबल त्यामागे नको. अशा गोष्टी जर आपलं मूल करीत असेल, आपल्या बरोबरच्या मित्रांमध्ये वावरत असेल, त्यांच्याशी खेळत असतानाच, त्यांच्याशी भांडत असेल, काही वेळा कोणाला मारत असेल, तर काही वेळा मार खाऊन येत असेल.. पालक म्हणून तुम्हाला अशा वेळी काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण मुलांची भांडणं आणि मारामाºयांमध्ये अगदीच गरज पडल्याशिवाय तुम्ही मधे पडू नका. मुलं त्यांचे प्रश्न त्यांच्या पद्धतीनं अतिशय उत्तम सोडवतात आणि पुन्हा लगेच एकत्रही येतात. एकोप्यानं खेळायलाही लागतात. मुलांचा आत्मविश्वास वाढतो तो याच गोष्टींतून. समाजात कसं वावरायचं, आपल्या क्षमता काय आहेत आणि त्या कशा पद्धतीनं वापरायच्या, तडजोड कुठे करायची, कुठे थांबायचं.. यासारख्या अनेक गोष्टी मुलं त्यातूनच शिकतात..त्यामुळे मुलांच्या फार मागे मागे न राहता, त्यांच्यावर ‘वॉच’ न ठेवता थोडं लक्ष असू द्या, पण मुलांना त्यांचं त्याचं मोठं होऊ द्या.. त्यामुळे ती खरंच मोठी होतील आणि तुम्हालाही मोठं करतील..