शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

..या खट्याळ मुलांना रमवायचं तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:04 IST

त्यासाठी आपल्याही थोडंसं लहान व्हावं लागेल. बस्स..

ठळक मुद्देमुलांच्या आवडीच्या गोष्टीतूनच ती शिकतील संयम.पलकांनाही व्हावं लागेल मुलांप्रमाणे लहान.मुलांमधली क्रिएटिव्हिटी पालकांनीही दाखवली तर बºयाच गोष्टी होतील सोप्या.

- मयूर पठाडेकुठलंही एखादं छोटं मोठं काम असो, त्यासाठी थोडा का वेळ लागणार असो, पण मुलं सोबत असली की इतका उच्छाद मांडतात की विचारायला सोय नाही. कशाला आपण इथे आलो आणि यांना सोबत आणलं असं आपल्याला होऊन जातं.. संयमाचीही परीक्षाच पाहिली जाते. अतिशय समंजस, सोशिक, मुलांना कधीही रागाऊ नये, त्यांना मारु नये अशा विचारांचे पालकही अशावेळी चिडतात..समजा एखाद्या कामासाठी आपण बॅँकेत गेलो आहे, पोस्टात गेलो आहे, शाळेत काही अर्जंट काम निघालं आहे.. तिथे किमान काही वेळ लागणार हे आपल्याला माहीत असतं आणि मुलांना घरी सोडून जाणंही शक्य नसतं किंवा तेवढी ती मोठी नसतात. अशावेळी मुलांना बरोबर न्यावंच लागतं. त्यावेळी मुलांबरोबर आई किंवा वडील यांपैकी एकटा पालकच असेल तर मग त्यांची खरोखरच तारांबळ उडते.मुलंही अगदी हुश्शार असतात. अशावेळी पालक आपल्याला काहीही करणार नाहीत, चारचौघांत ते आपल्याला मारणार नाहीत कि मोठ्यानं रागावणार नाहीत, हेही त्यांना माहीत असतं.. त्यामुळे त्यांच्या ‘प्रतिभे’ला आणखीच बहर चढतो आणि पालकांना सतावण्याचे एकसे एक अफलातून मार्ग ते शोधून काढतात.अशावेळी काय करायचं? कसं आवरायचं मुलांना?मुलांचंही बरोबरच असतं. जिथे त्यांना काहीही करता येत नाही, एकाच जागी बसून राहावं लागतं, त्यांना काहीही करण्यासारखं नसतं त्यावेळी तीही वैतागतात. काही अभ्यासकांनी त्यावर उत्तम उपाय सुचवला आहे. मुलांना त्यांच्या आवडीची गोष्ट करायला मिळाली किंवा पालकांनीच थोडासा ‘बावळट’पणा केला तर त्यांना खूप भावतो आणि ते रमतात.उदाहरणार्थ..मूल जर शाळेत जाणारं असेल, तर त्याच्या माहितीतलीच एखादी कविता मुद्दाम चुकीची म्हणायची.. पाढे, बाराखडी.. मुद्दाम चुकीची म्हणायची.. अर्थात ज्या गोष्टी मुलांना उत्तम येतात, त्याचाच उपयोग यासाठी करायला हवा. पालक चुकले आहेत हे मुलांना कळतंच.. मग ते आपल्या पालकांना दुरुस्त करतात. तुला कसं, काहीच येत नाही, मी तर किती हुशार असं त्यांना वाटतं..चेहºयाचे खेळ खेळणं.. मध्येच डोळे मोठ्ठे करणं, तोंड वेंगाडणं, नाक वेंगाडणं.. आपल्याकडे त्यावेळी उपलब्ध असलेल्या गोष्टींतूनच काहीतरी क्रिएटिव्ह करणं.. यासारख्या गोष्टी मुलांना आवडतात. मुलंही रमतात आणि आपलंही काम होतं..हुश्शार पालकांची हुश्शार पोरं पालकांची काही वेळा गोची करतातच. त्यावेळी त्यावरचा उपायही तसाच शोधावा लागतो..