शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

..या खट्याळ मुलांना रमवायचं तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:04 IST

त्यासाठी आपल्याही थोडंसं लहान व्हावं लागेल. बस्स..

ठळक मुद्देमुलांच्या आवडीच्या गोष्टीतूनच ती शिकतील संयम.पलकांनाही व्हावं लागेल मुलांप्रमाणे लहान.मुलांमधली क्रिएटिव्हिटी पालकांनीही दाखवली तर बºयाच गोष्टी होतील सोप्या.

- मयूर पठाडेकुठलंही एखादं छोटं मोठं काम असो, त्यासाठी थोडा का वेळ लागणार असो, पण मुलं सोबत असली की इतका उच्छाद मांडतात की विचारायला सोय नाही. कशाला आपण इथे आलो आणि यांना सोबत आणलं असं आपल्याला होऊन जातं.. संयमाचीही परीक्षाच पाहिली जाते. अतिशय समंजस, सोशिक, मुलांना कधीही रागाऊ नये, त्यांना मारु नये अशा विचारांचे पालकही अशावेळी चिडतात..समजा एखाद्या कामासाठी आपण बॅँकेत गेलो आहे, पोस्टात गेलो आहे, शाळेत काही अर्जंट काम निघालं आहे.. तिथे किमान काही वेळ लागणार हे आपल्याला माहीत असतं आणि मुलांना घरी सोडून जाणंही शक्य नसतं किंवा तेवढी ती मोठी नसतात. अशावेळी मुलांना बरोबर न्यावंच लागतं. त्यावेळी मुलांबरोबर आई किंवा वडील यांपैकी एकटा पालकच असेल तर मग त्यांची खरोखरच तारांबळ उडते.मुलंही अगदी हुश्शार असतात. अशावेळी पालक आपल्याला काहीही करणार नाहीत, चारचौघांत ते आपल्याला मारणार नाहीत कि मोठ्यानं रागावणार नाहीत, हेही त्यांना माहीत असतं.. त्यामुळे त्यांच्या ‘प्रतिभे’ला आणखीच बहर चढतो आणि पालकांना सतावण्याचे एकसे एक अफलातून मार्ग ते शोधून काढतात.अशावेळी काय करायचं? कसं आवरायचं मुलांना?मुलांचंही बरोबरच असतं. जिथे त्यांना काहीही करता येत नाही, एकाच जागी बसून राहावं लागतं, त्यांना काहीही करण्यासारखं नसतं त्यावेळी तीही वैतागतात. काही अभ्यासकांनी त्यावर उत्तम उपाय सुचवला आहे. मुलांना त्यांच्या आवडीची गोष्ट करायला मिळाली किंवा पालकांनीच थोडासा ‘बावळट’पणा केला तर त्यांना खूप भावतो आणि ते रमतात.उदाहरणार्थ..मूल जर शाळेत जाणारं असेल, तर त्याच्या माहितीतलीच एखादी कविता मुद्दाम चुकीची म्हणायची.. पाढे, बाराखडी.. मुद्दाम चुकीची म्हणायची.. अर्थात ज्या गोष्टी मुलांना उत्तम येतात, त्याचाच उपयोग यासाठी करायला हवा. पालक चुकले आहेत हे मुलांना कळतंच.. मग ते आपल्या पालकांना दुरुस्त करतात. तुला कसं, काहीच येत नाही, मी तर किती हुशार असं त्यांना वाटतं..चेहºयाचे खेळ खेळणं.. मध्येच डोळे मोठ्ठे करणं, तोंड वेंगाडणं, नाक वेंगाडणं.. आपल्याकडे त्यावेळी उपलब्ध असलेल्या गोष्टींतूनच काहीतरी क्रिएटिव्ह करणं.. यासारख्या गोष्टी मुलांना आवडतात. मुलंही रमतात आणि आपलंही काम होतं..हुश्शार पालकांची हुश्शार पोरं पालकांची काही वेळा गोची करतातच. त्यावेळी त्यावरचा उपायही तसाच शोधावा लागतो..