शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

..या खट्याळ मुलांना रमवायचं तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:04 IST

त्यासाठी आपल्याही थोडंसं लहान व्हावं लागेल. बस्स..

ठळक मुद्देमुलांच्या आवडीच्या गोष्टीतूनच ती शिकतील संयम.पलकांनाही व्हावं लागेल मुलांप्रमाणे लहान.मुलांमधली क्रिएटिव्हिटी पालकांनीही दाखवली तर बºयाच गोष्टी होतील सोप्या.

- मयूर पठाडेकुठलंही एखादं छोटं मोठं काम असो, त्यासाठी थोडा का वेळ लागणार असो, पण मुलं सोबत असली की इतका उच्छाद मांडतात की विचारायला सोय नाही. कशाला आपण इथे आलो आणि यांना सोबत आणलं असं आपल्याला होऊन जातं.. संयमाचीही परीक्षाच पाहिली जाते. अतिशय समंजस, सोशिक, मुलांना कधीही रागाऊ नये, त्यांना मारु नये अशा विचारांचे पालकही अशावेळी चिडतात..समजा एखाद्या कामासाठी आपण बॅँकेत गेलो आहे, पोस्टात गेलो आहे, शाळेत काही अर्जंट काम निघालं आहे.. तिथे किमान काही वेळ लागणार हे आपल्याला माहीत असतं आणि मुलांना घरी सोडून जाणंही शक्य नसतं किंवा तेवढी ती मोठी नसतात. अशावेळी मुलांना बरोबर न्यावंच लागतं. त्यावेळी मुलांबरोबर आई किंवा वडील यांपैकी एकटा पालकच असेल तर मग त्यांची खरोखरच तारांबळ उडते.मुलंही अगदी हुश्शार असतात. अशावेळी पालक आपल्याला काहीही करणार नाहीत, चारचौघांत ते आपल्याला मारणार नाहीत कि मोठ्यानं रागावणार नाहीत, हेही त्यांना माहीत असतं.. त्यामुळे त्यांच्या ‘प्रतिभे’ला आणखीच बहर चढतो आणि पालकांना सतावण्याचे एकसे एक अफलातून मार्ग ते शोधून काढतात.अशावेळी काय करायचं? कसं आवरायचं मुलांना?मुलांचंही बरोबरच असतं. जिथे त्यांना काहीही करता येत नाही, एकाच जागी बसून राहावं लागतं, त्यांना काहीही करण्यासारखं नसतं त्यावेळी तीही वैतागतात. काही अभ्यासकांनी त्यावर उत्तम उपाय सुचवला आहे. मुलांना त्यांच्या आवडीची गोष्ट करायला मिळाली किंवा पालकांनीच थोडासा ‘बावळट’पणा केला तर त्यांना खूप भावतो आणि ते रमतात.उदाहरणार्थ..मूल जर शाळेत जाणारं असेल, तर त्याच्या माहितीतलीच एखादी कविता मुद्दाम चुकीची म्हणायची.. पाढे, बाराखडी.. मुद्दाम चुकीची म्हणायची.. अर्थात ज्या गोष्टी मुलांना उत्तम येतात, त्याचाच उपयोग यासाठी करायला हवा. पालक चुकले आहेत हे मुलांना कळतंच.. मग ते आपल्या पालकांना दुरुस्त करतात. तुला कसं, काहीच येत नाही, मी तर किती हुशार असं त्यांना वाटतं..चेहºयाचे खेळ खेळणं.. मध्येच डोळे मोठ्ठे करणं, तोंड वेंगाडणं, नाक वेंगाडणं.. आपल्याकडे त्यावेळी उपलब्ध असलेल्या गोष्टींतूनच काहीतरी क्रिएटिव्ह करणं.. यासारख्या गोष्टी मुलांना आवडतात. मुलंही रमतात आणि आपलंही काम होतं..हुश्शार पालकांची हुश्शार पोरं पालकांची काही वेळा गोची करतातच. त्यावेळी त्यावरचा उपायही तसाच शोधावा लागतो..