शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

..या खट्याळ मुलांना रमवायचं तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:04 IST

त्यासाठी आपल्याही थोडंसं लहान व्हावं लागेल. बस्स..

ठळक मुद्देमुलांच्या आवडीच्या गोष्टीतूनच ती शिकतील संयम.पलकांनाही व्हावं लागेल मुलांप्रमाणे लहान.मुलांमधली क्रिएटिव्हिटी पालकांनीही दाखवली तर बºयाच गोष्टी होतील सोप्या.

- मयूर पठाडेकुठलंही एखादं छोटं मोठं काम असो, त्यासाठी थोडा का वेळ लागणार असो, पण मुलं सोबत असली की इतका उच्छाद मांडतात की विचारायला सोय नाही. कशाला आपण इथे आलो आणि यांना सोबत आणलं असं आपल्याला होऊन जातं.. संयमाचीही परीक्षाच पाहिली जाते. अतिशय समंजस, सोशिक, मुलांना कधीही रागाऊ नये, त्यांना मारु नये अशा विचारांचे पालकही अशावेळी चिडतात..समजा एखाद्या कामासाठी आपण बॅँकेत गेलो आहे, पोस्टात गेलो आहे, शाळेत काही अर्जंट काम निघालं आहे.. तिथे किमान काही वेळ लागणार हे आपल्याला माहीत असतं आणि मुलांना घरी सोडून जाणंही शक्य नसतं किंवा तेवढी ती मोठी नसतात. अशावेळी मुलांना बरोबर न्यावंच लागतं. त्यावेळी मुलांबरोबर आई किंवा वडील यांपैकी एकटा पालकच असेल तर मग त्यांची खरोखरच तारांबळ उडते.मुलंही अगदी हुश्शार असतात. अशावेळी पालक आपल्याला काहीही करणार नाहीत, चारचौघांत ते आपल्याला मारणार नाहीत कि मोठ्यानं रागावणार नाहीत, हेही त्यांना माहीत असतं.. त्यामुळे त्यांच्या ‘प्रतिभे’ला आणखीच बहर चढतो आणि पालकांना सतावण्याचे एकसे एक अफलातून मार्ग ते शोधून काढतात.अशावेळी काय करायचं? कसं आवरायचं मुलांना?मुलांचंही बरोबरच असतं. जिथे त्यांना काहीही करता येत नाही, एकाच जागी बसून राहावं लागतं, त्यांना काहीही करण्यासारखं नसतं त्यावेळी तीही वैतागतात. काही अभ्यासकांनी त्यावर उत्तम उपाय सुचवला आहे. मुलांना त्यांच्या आवडीची गोष्ट करायला मिळाली किंवा पालकांनीच थोडासा ‘बावळट’पणा केला तर त्यांना खूप भावतो आणि ते रमतात.उदाहरणार्थ..मूल जर शाळेत जाणारं असेल, तर त्याच्या माहितीतलीच एखादी कविता मुद्दाम चुकीची म्हणायची.. पाढे, बाराखडी.. मुद्दाम चुकीची म्हणायची.. अर्थात ज्या गोष्टी मुलांना उत्तम येतात, त्याचाच उपयोग यासाठी करायला हवा. पालक चुकले आहेत हे मुलांना कळतंच.. मग ते आपल्या पालकांना दुरुस्त करतात. तुला कसं, काहीच येत नाही, मी तर किती हुशार असं त्यांना वाटतं..चेहºयाचे खेळ खेळणं.. मध्येच डोळे मोठ्ठे करणं, तोंड वेंगाडणं, नाक वेंगाडणं.. आपल्याकडे त्यावेळी उपलब्ध असलेल्या गोष्टींतूनच काहीतरी क्रिएटिव्ह करणं.. यासारख्या गोष्टी मुलांना आवडतात. मुलंही रमतात आणि आपलंही काम होतं..हुश्शार पालकांची हुश्शार पोरं पालकांची काही वेळा गोची करतातच. त्यावेळी त्यावरचा उपायही तसाच शोधावा लागतो..