शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Friendship Day 2018: मैत्रीतलं प्रेम अन् प्रेमातली मैत्री

By वैभव देसाई | Updated: August 5, 2018 07:06 IST

मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झाले हे वृषाली आणि मनोजलाही समजलेच नाही.

मनोजला तशी गावची फार आवड होती. विद्यार्थी दशेपासूनच त्याला मे महिन्याच्या सुट्टीतून बाबा आवर्जून गावी घेऊन जात असे. गावातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळणे, नदीत पोहायला जाणे या त्याच्या आवडत्या गोष्टी होत्या. गणपतीतूनही गावी जाणं होत असल्यानं निसर्गाशी त्याची चांगली गट्टी जमली होती. झाडांच्या हिरव्या गर्द झाडीतून वाट काढत नदी गाठण्याचा अनुभव मनोजसाठी अद्वितीय असे. कालांतरानं शिक्षणाच्या एक एक पाय-या चढत मनोज दहावीत पोहोचला. दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याला गावी जाण्याची फार इच्छा होती. परीक्षा संपल्यानंतरचा दोन महिन्यांचा कालावधी मुंबईतल्या घरी बसून कसा काढायचा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. तसेच वडिलांना त्याच वेळी सुट्टी नसल्यानं त्याचा काहीसा हिरमोड झाला.तसं मनोजचं अधूनमधून मामाच्या गावीही जाणं व्हायचं. त्यावेळी मामानं नेमकं मनोजच्या आईला फोन करून मनोजला गावी पाठवण्याचा आग्रह केला. मामाचा आग्रह आई तरी कसा मोडू शकणार होती. आईनं मनोजला मामाच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला. झालं मग ठरलं मनोजला मामाच्या गावी पाठवायचं. मनोजही फार खूश होता. मामाच्या गावीसुद्धा मोठाली नदी, डोंगर रांगांसह मामाची एकरांमध्ये शेती होती. आंबा आणि काजूच्या बागा होत्या. त्यामुळे मनोजनंही गावातल्या मुलांबरोबर बागांमध्ये जाऊन आंबे खाणे, नदीवर जाऊन मनसोक्त डुंबण्यासह डोंगर रांगामध्ये फिरण्याचे मनोमन प्लॅन बनवण्यास सुरुवात केली. अखेर मनोज गावी जाण्यासाठी गाडीत बसला आणि सकाळी तो मामाच्या गावात दाखल झाला. उतरल्या उतरल्या निसर्गाच्या त्या शुद्ध हवेनं मनोजची झोप कुठल्या कुठे पळाली. सामानाची बॅग घेऊन मनोजनं थेट मामाचं घर गाठलं. घरी पोहोचल्यानंतर मामीनं आंघोळ करून येण्यास सांगितले आणि त्याच्या पुढ्यात गरमागरम पिठलं भाकरी ठेवली. मनोजनं क्षणाचाही विलंब न करता त्यावर ताव मारला. त्यानंतर मनोजचं गावातल्या मुलांबरोबर हिंडणं सुरूच होतं.ब-याचदा मनोज वाडीतल्याच गणेश नावाच्या मित्रासोबत माधवाची वाडी(वरची वाडी)वर जात असे. खेडशी गावात तशा चार वाड्या होत्या. सर्वच वाड्यांमध्ये जवळपास ३ ते ४ किलोमीटरचं अंतर होते. खालच्या वाडीतून माधवाच्या वाडीत जायचं म्हटल्यास बरीच पायपीट करावी लागे. माधवाच्या वाडीत जाण्याचा हेतू म्हणजे तिथे पाटलाचं किराण्याचं दुकान होतं. त्या दुकानावर पॅप्सीपासून बरेच खाद्य पदार्थ मिळत होते. खरं तर मनोजसाठी माधवाच्या वाडीत जाण्याचा अनुभव हा जरा नवाच होता. परंतु गणेशचं माधवाच्या वाडीत कायम येणं-जाणं असायचं. कारण गणेशचा मामासुद्धा माधवाच्या वाडीत राहत होता. गणेशच्या आईचं त्याच्या वडिलांशी प्रेमसंबंधातून लग्न झालं होतं. त्यामुळे गणेशला माधवाच्या वाडीची वाट काही नवी नव्हती. एकदा गणेश आणि मनोज दोघेही वरच्या वाडीत गेले होते. त्यावेळी गणेशनं चल जरा मामाकडे जाऊन येऊ या, असा मनोजला आग्रह केला. परंतु मनोज त्यासाठी तयार नव्हता. अखेर गणेश त्याला जबरदस्तीनं तिकडे घेऊन गेला. मनोज तिकडे गेल्यानंतर त्याला खळ्यातच एक सुंदर मुलगी दिसली. मनोजला पाहून ती घरात गेली.गणेश आणि मनोज दोघेही घरात गेल्यानंतर गणेशच्या मामीनं दोघांसाठी चुलीवर चहा टाकला आणि वृषालीला दोघांना पाणी देण्यास सांगितलं. ग्लासातून पाणी घेऊन आलेली मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून ती मगाशी खळ्यात उभी असलेली सुंदर मुलगी होती. अर्थात तिचं नाव वृषाली आहे हे मनोजला आता समजलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. गणेश मामीशी गप्पा गोष्टी करण्यात दंग झाला. मनोज आपला अवघडल्यासारखा एका ठिकाणी बसून राहिला. वृषालीही लांबून सगळं पाहत होती. त्यानंतर गणेशनं मनोजची मामा-मामीशी ओळख करून दिली. तसा मनोजचा मामा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्यामुळे त्याला सगळेच ओळखत होते. मग गणेश आणि मनोज माधवाच्या वाडीत गेल्यानंतर वरचेवर गणेशच्या मामाकडे ये-जा करत होते. गणेशच्या मामाला तशी एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगी म्हणजे वृषालीच.मनोज आणि गणेशचं माधवाची वाडीवर जाणं-येणं होत असल्यानं वृषालीची आणि मनोजचीही चांगली मैत्री झाली. वय अल्लड असल्यानं मनोजही वृषालीची चेष्टा-मस्करी करत असे. वृषालीलाही मनोजनं केलेली मस्करी फार आवडे. मनोजनं नुकतीच १०वीची परीक्षा दिल्यामुळे त्या वयात प्रेम हे काय असतं हे त्याला ठाऊकच नव्हतं. परंतु जेव्हा मनोज मुंबईला आला तेव्हा त्याला वृषालीची आठवण सतावू लागली. वृषालीच्या मनातही तशाच काहीशा भावना होत्या. त्यामुळे वृषालीही गावातल्या एसटीडी बुथवरून कधी ना कधी मनोजला फोन करत असे. कॉलेजात मुलं-मुली कसं प्रेम करतात ते मनोजनं त्यावेळी जवळून पाहिलं. तेव्हा त्यालाही वृषालीशी असलेली मैत्री म्हणजेच प्रेम याची जाणीव झाली. मग एकदा वृषालीनं गावातल्या एसटीडी बुथवरून फोन केला असता, मनोजनं तिला प्रपोज केलं. वृषाली जणू काही या क्षणाची वाटच पाहत होती. परंतु तिने मनोजला त्यावेळी काहीच उत्तर न देता फोन ठेवला. पुन्हा आठवड्यानं तिने मनोजला फोन केला. त्यावेळी पुन्हा मनोजनं तिला विचारला केली. तेव्हा तिनं फोनवरून लाजत हो म्हटलं. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झाले हे वृषाली आणि मनोजलाही समजलेच नाही. असं म्हणतात, खरं प्रेम त्यागात दडलेलं असतं. काही अपरिहार्य कारणास्तव कालांतरानं त्यांचं हे नातं संपुष्टात आलं. परंतु त्याच्यातील मैत्री कधीच संपली नाही.(ही कथा काल्पनिक असून, त्याचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा)

टॅग्स :relationshipरिलेशनशिपFriendship Dayफ्रेण्डशीप डे