शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची भरती स्थगित

By admin | Updated: October 16, 2015 22:21 IST

आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

रत्नागिरी : राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील भरतीला राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर हे आदेश जारी झाले आहेत.राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये गट-क आणि गट-ड ची सरळसेवेच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले होते. त्यानुसार ही भरती आॅनलाईन पध्दतीने करण्यात येत होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेने १८० पदांची भरती घोषित केली होती. त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य सेवक (पुरुष/महिला), पर्यवेक्षिका (एकात्मिक बाल विकास सेवा योजना), कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर, स्त्री परिचर आणि पर्यवेक्षिका आदि पदांचा त्यामध्ये समावेश आहे.अनेक महिन्यांपासून रखडलेली जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. या भरती प्रक्रियेचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्याची अंतिम तारीख ३० आॅक्टोबरपर्यंत होती. ही भरती प्रक्रिया गुरुवार १५ आॅक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. सध्या राज्यामध्ये ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने या निवडणुकांमुळे राज्य शासनाला सर्व जिल्हा परिषदांतील नोकर भरती प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेलाही स्थगिती मिळाली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकही शासनाने जाहीर केले असून २ नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)