शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

जिल्हा परिषदेची भरती स्थगित

By admin | Updated: October 16, 2015 22:21 IST

आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

रत्नागिरी : राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील भरतीला राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर हे आदेश जारी झाले आहेत.राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये गट-क आणि गट-ड ची सरळसेवेच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले होते. त्यानुसार ही भरती आॅनलाईन पध्दतीने करण्यात येत होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेने १८० पदांची भरती घोषित केली होती. त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य सेवक (पुरुष/महिला), पर्यवेक्षिका (एकात्मिक बाल विकास सेवा योजना), कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर, स्त्री परिचर आणि पर्यवेक्षिका आदि पदांचा त्यामध्ये समावेश आहे.अनेक महिन्यांपासून रखडलेली जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. या भरती प्रक्रियेचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्याची अंतिम तारीख ३० आॅक्टोबरपर्यंत होती. ही भरती प्रक्रिया गुरुवार १५ आॅक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. सध्या राज्यामध्ये ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने या निवडणुकांमुळे राज्य शासनाला सर्व जिल्हा परिषदांतील नोकर भरती प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेलाही स्थगिती मिळाली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकही शासनाने जाहीर केले असून २ नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)