शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

खड्डेमय रस्त्यांबाबत जिल्हा परिषद अनभिज्ञ

By admin | Updated: May 27, 2016 00:23 IST

अहवालाची प्रतीक्षा : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात रस्त्यांवरून वाहतूक करणे मुश्किल होणार आहे. बहुतांश रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, पावसाळ्यापूर्वी त्यावर उपाययोजना करणे आवश्यक होते. पावसाळा तोंडावर आला तरी किती रस्ते खड्डेमय आहेत, याबाबतची माहिती जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यात शहरी भागातील रस्ते चकाचक दिसत असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती त्याउलट आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता ग्रामीण भाग डोंगराळ व दुर्गम आहे. ग्रामीण भागातील रस्ते वाईट स्थितीत आहेत. मागील तीन वर्षांमध्ये पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे रस्ते व साकव उखडले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दळणवळण फारच त्रासदायक ठरत आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारित ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग येतात. केवळ महामार्गांकडे शासनाने लक्ष दिले. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. मागील वर्षी पावसाळ्यानंतर जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी व चिपळूण या बांधकाम विभागांच्या अभियंत्यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांची पाहणी केली असता त्यांनी ६७८७ किलोमीटरच्या रस्त्यांची चाळण झाल्याचे समोर आणले होते. त्यामध्ये चिपळूण विभागात ३३८६ किलोमीटर आणि रत्नागिरी विभागात ३४०१ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होऊनही त्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. जिल्हा परिषदेने रस्ते विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत या रस्त्यांसाठी शासनाकडे १९४ कोटी ९३ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानंतर सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला शासनाकडून रस्ता दुरुस्तीसाठी आला होता. त्यामुळे काही प्रमाणात रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. जिल्ह्यात ६५०० किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यांची आणखी एक-दोन वर्षे दुरुस्ती न झाल्यास या रस्त्यांवरून चालणे मुश्किल होऊन ग्रामीण जनतेचे हाल होणार आहेत. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक होते. मात्र, ही दुरुस्ती तर सोडाच पावसाळ्यापूर्वी ग्रामीण भागातील किती रस्ते नादुरुस्त आहेत, याची माहितीही जिल्हा परिषदेच्या दोन्ही बांधकाम विभागाकडे उपलब्ध नाही. नादुरुस्त रस्त्यांची माहिती दोन्ही बांधकाम विभागांनी नऊही तालुक्यांकडे मागवली होती. मात्र, अद्याप तालुक्यांनी ती दिलेली नसल्याने जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झालेली नाही. (शहर वार्ताहर)