शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

By admin | Updated: May 20, 2015 00:14 IST

सेवाप्रणालीचे काम अपूर्ण : क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर

रत्नागिरी : सेवा प्रणालीचे काम अपूर्ण असल्याने जिल्हा परिषदेच्या ३२०० कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होण्याचे प्रमाण वाढले आहे. क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळाल्यास त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मे महिन्याची सुट्टी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सुट्टीनिमित्त फिरायला बाहेर जातात. तसेच बहुतांश कर्मचारी परजिल्ह्यातील असल्याचे त्यांचे कुटुंबीय गावी जातात. त्यासाठी त्यांना आपल्या वेतनावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे अवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे सेवार्थ कर्मचारी ३२०० आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीचे काम गेले कित्येक दिवस सुरु आहे. मात्र, ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या खात्यावर वेतन जमा करणे प्रशासनाला अडचणीचे होत आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळावे, यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वामन कदम यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांनीही सेवार्थ प्रणालीमुळेच वेतन रखडलेल्याचे सांगून ते काम पूर्ण झाल्याशिवाय वेतन देण्यात अडचण असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यासाठी वेतन आणखी किती दिवस रखडणार आहे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे. वेतन झालेले नसल्यामुळे ऐन सुट्टीत अशा कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठीही खर्च करणे अवघड बनले आहे.जिल्हा परिषदेतील हा प्रश्न गेले अनेक महिने गाजत असून याबाबत वेळीच आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. (शहर वार्ताहर)