शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला हवेत २२९३ मैलकुली

By admin | Updated: September 13, 2014 23:39 IST

प्रस्ताव पडूनच : वर्षभरानंतरही कमतरता कायम

रहिम दलाल, रत्नागिरी : जिल्ह्यात मैलकुलींची कमतरता असल्याने त्याचा परिणाम रस्तेकामांवर होत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सुमारे २ हजार २९३ मैलकुलींची आवश्यकता असून, तशा मागणीचा शासनाकडे गेले वर्षभर पडून आहे. मैलकुली म्हणजेच रस्ता कामगारांची जिल्हा परिषदेला फार मोठी चणचण भासत असल्याने त्याचा मोठा परिणाम रस्त्याच्या कामांवर होत आहे. रस्त्याच्या पृष्ठभागावर खडी येऊन तसेच खड्डे पडून सर्रासपणे अपघात होत असतात. त्यामध्ये काहीजणांना जीवही गमवावा लागतो. शिवाय अनेकजण जखमी होऊन कायमचे जायबंदी होण्याच्या घटनाही घडत असतात. मैलकुली हा जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे अंग असून, रस्त्याच्या हद्दीतील उपलब्ध मुरुम आणि त्याने खणून काढलेली माती खडीच्या पृष्ठभागावर टाकणे, रस्त्यांच्या बाजूची गटारे व पाणी वाहून जाण्याकरिता खोदलेले चर स्वच्छ ठेवणे व त्यांची योग्य प्रकारे देखभाल करणे, मोऱ्या तसेच लहान व मोठे पूल यांच्या बांधकामात आलेली झाडे झुडपे काढून टाकणे व पाणलोटच्या जागेवरील अडथळा दूर करणे, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे वेळीच लक्ष पुरविणे, रस्त्याच्या जवळपास उपलब्ध असलेली माती, मुरुम वापरुन रस्त्यांच्या बाजूपट्ट्या भरणे, रस्त्याच्या कडेला असलेले साहित्य, झाडे झुडपे, किलोमीटरचे दगड, सूचना फलक इत्यादींवर लक्ष ठेवून त्यांची देखभाल करणे, धोकादायक व उखडलेली झाडे पाडण्याचे काम करणे व ती उचलून बाजूला टाकणे, झाडांची छाटणी करणे व झाडांच्या फांद्या कापणे आदी कामे हे जिल्हा परिषदेचे मैलकुली करीत असतात. जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी व चिपळूण या दोन्ही बांधकाम विभागाकडे सुमारे ५० मैलकुली आहेत. ही मैलकुलींची संख्या अगदी किरकोळ असून, जिल्ह्यासाठी २२९३ मैलकुलींची जिल्हा परिषद बांधकाम विभागाला आवश्यक आहे. चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांच्याकडेही मैलकुलींची जिल्हा परिषदेला किती आवश्यकता आहे, याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तो अजूनही शासनदरबारी पडून असल्याने कामे ठप्प झाली आहेत.भरतीच बंद!मैलकुलींची भरती गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली असल्याने जिल्हा परिषदेला रस्ते काम व अन्य कामांबाबत मोठी अडचण निर्माण होते. त्यासाठी २२९३ मैलकुलींच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. ही भरती बंद असल्याने शासनाकडे अजूनही तो प्रस्ताव पडून आहे. आता ही भरती कधी होणार? असा प्रश्न केला जात असून त्यानंतरच ही कामे मार्गी लागतील.