शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला हवेत २२९३ मैलकुली

By admin | Updated: September 13, 2014 23:39 IST

प्रस्ताव पडूनच : वर्षभरानंतरही कमतरता कायम

रहिम दलाल, रत्नागिरी : जिल्ह्यात मैलकुलींची कमतरता असल्याने त्याचा परिणाम रस्तेकामांवर होत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सुमारे २ हजार २९३ मैलकुलींची आवश्यकता असून, तशा मागणीचा शासनाकडे गेले वर्षभर पडून आहे. मैलकुली म्हणजेच रस्ता कामगारांची जिल्हा परिषदेला फार मोठी चणचण भासत असल्याने त्याचा मोठा परिणाम रस्त्याच्या कामांवर होत आहे. रस्त्याच्या पृष्ठभागावर खडी येऊन तसेच खड्डे पडून सर्रासपणे अपघात होत असतात. त्यामध्ये काहीजणांना जीवही गमवावा लागतो. शिवाय अनेकजण जखमी होऊन कायमचे जायबंदी होण्याच्या घटनाही घडत असतात. मैलकुली हा जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे अंग असून, रस्त्याच्या हद्दीतील उपलब्ध मुरुम आणि त्याने खणून काढलेली माती खडीच्या पृष्ठभागावर टाकणे, रस्त्यांच्या बाजूची गटारे व पाणी वाहून जाण्याकरिता खोदलेले चर स्वच्छ ठेवणे व त्यांची योग्य प्रकारे देखभाल करणे, मोऱ्या तसेच लहान व मोठे पूल यांच्या बांधकामात आलेली झाडे झुडपे काढून टाकणे व पाणलोटच्या जागेवरील अडथळा दूर करणे, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे वेळीच लक्ष पुरविणे, रस्त्याच्या जवळपास उपलब्ध असलेली माती, मुरुम वापरुन रस्त्यांच्या बाजूपट्ट्या भरणे, रस्त्याच्या कडेला असलेले साहित्य, झाडे झुडपे, किलोमीटरचे दगड, सूचना फलक इत्यादींवर लक्ष ठेवून त्यांची देखभाल करणे, धोकादायक व उखडलेली झाडे पाडण्याचे काम करणे व ती उचलून बाजूला टाकणे, झाडांची छाटणी करणे व झाडांच्या फांद्या कापणे आदी कामे हे जिल्हा परिषदेचे मैलकुली करीत असतात. जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी व चिपळूण या दोन्ही बांधकाम विभागाकडे सुमारे ५० मैलकुली आहेत. ही मैलकुलींची संख्या अगदी किरकोळ असून, जिल्ह्यासाठी २२९३ मैलकुलींची जिल्हा परिषद बांधकाम विभागाला आवश्यक आहे. चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांच्याकडेही मैलकुलींची जिल्हा परिषदेला किती आवश्यकता आहे, याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तो अजूनही शासनदरबारी पडून असल्याने कामे ठप्प झाली आहेत.भरतीच बंद!मैलकुलींची भरती गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली असल्याने जिल्हा परिषदेला रस्ते काम व अन्य कामांबाबत मोठी अडचण निर्माण होते. त्यासाठी २२९३ मैलकुलींच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. ही भरती बंद असल्याने शासनाकडे अजूनही तो प्रस्ताव पडून आहे. आता ही भरती कधी होणार? असा प्रश्न केला जात असून त्यानंतरच ही कामे मार्गी लागतील.