शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जिल्हा परिषदेला हवेत २२९३ मैलकुली

By admin | Updated: September 13, 2014 23:39 IST

प्रस्ताव पडूनच : वर्षभरानंतरही कमतरता कायम

रहिम दलाल, रत्नागिरी : जिल्ह्यात मैलकुलींची कमतरता असल्याने त्याचा परिणाम रस्तेकामांवर होत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सुमारे २ हजार २९३ मैलकुलींची आवश्यकता असून, तशा मागणीचा शासनाकडे गेले वर्षभर पडून आहे. मैलकुली म्हणजेच रस्ता कामगारांची जिल्हा परिषदेला फार मोठी चणचण भासत असल्याने त्याचा मोठा परिणाम रस्त्याच्या कामांवर होत आहे. रस्त्याच्या पृष्ठभागावर खडी येऊन तसेच खड्डे पडून सर्रासपणे अपघात होत असतात. त्यामध्ये काहीजणांना जीवही गमवावा लागतो. शिवाय अनेकजण जखमी होऊन कायमचे जायबंदी होण्याच्या घटनाही घडत असतात. मैलकुली हा जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे अंग असून, रस्त्याच्या हद्दीतील उपलब्ध मुरुम आणि त्याने खणून काढलेली माती खडीच्या पृष्ठभागावर टाकणे, रस्त्यांच्या बाजूची गटारे व पाणी वाहून जाण्याकरिता खोदलेले चर स्वच्छ ठेवणे व त्यांची योग्य प्रकारे देखभाल करणे, मोऱ्या तसेच लहान व मोठे पूल यांच्या बांधकामात आलेली झाडे झुडपे काढून टाकणे व पाणलोटच्या जागेवरील अडथळा दूर करणे, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे वेळीच लक्ष पुरविणे, रस्त्याच्या जवळपास उपलब्ध असलेली माती, मुरुम वापरुन रस्त्यांच्या बाजूपट्ट्या भरणे, रस्त्याच्या कडेला असलेले साहित्य, झाडे झुडपे, किलोमीटरचे दगड, सूचना फलक इत्यादींवर लक्ष ठेवून त्यांची देखभाल करणे, धोकादायक व उखडलेली झाडे पाडण्याचे काम करणे व ती उचलून बाजूला टाकणे, झाडांची छाटणी करणे व झाडांच्या फांद्या कापणे आदी कामे हे जिल्हा परिषदेचे मैलकुली करीत असतात. जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी व चिपळूण या दोन्ही बांधकाम विभागाकडे सुमारे ५० मैलकुली आहेत. ही मैलकुलींची संख्या अगदी किरकोळ असून, जिल्ह्यासाठी २२९३ मैलकुलींची जिल्हा परिषद बांधकाम विभागाला आवश्यक आहे. चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांच्याकडेही मैलकुलींची जिल्हा परिषदेला किती आवश्यकता आहे, याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तो अजूनही शासनदरबारी पडून असल्याने कामे ठप्प झाली आहेत.भरतीच बंद!मैलकुलींची भरती गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली असल्याने जिल्हा परिषदेला रस्ते काम व अन्य कामांबाबत मोठी अडचण निर्माण होते. त्यासाठी २२९३ मैलकुलींच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. ही भरती बंद असल्याने शासनाकडे अजूनही तो प्रस्ताव पडून आहे. आता ही भरती कधी होणार? असा प्रश्न केला जात असून त्यानंतरच ही कामे मार्गी लागतील.