शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जाकादेवी आठवडा बाजारात पिण्याच्या पाण्याची मागणी

By admin | Updated: December 16, 2014 00:17 IST

व्यापाऱ्यांचा मुद्दा : स्वच्छतागृहासाठीही धरला आग्रह

जाकादेवी : जाकादेवी येथील आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी बाजाराच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली आहे.खालगाव - जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथे खालगाव रोडजवळील तळ्याकाठी कातळावर दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. सकाळी ८ ते सायंकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत आठवडा बाजार सुरु असतो. जाकादेवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ या बाजाराचा लाभ घेतात. भाजीपाला व इतर वस्तूंची विक्री करण्यासाठी येथे ठिकठिकाणाहून व्यापारी येत असतात. येथील व्यापारीही या बाजारात उत्साहाने भाग घेतात. कातळावर भरत असलेल्या या बाजारासाठी छत्र्या घेऊन किंवा काही सावली डोक्यावर घेऊन हे व्यापारी बसलेले असतात. अलिकडे उन्हाचा कडाका असतोच त्यामध्ये वातावरणात दमटपणा असतो. अशा उन्हाळी वातावरणात तहानही लागते. अलिकडे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स बरोबर घेतल्या जातात. तरीही दुपारच्या जेवणाचा डबा खाताना पाणी अधिक प्रमाणात लागते. तिथे बॉटल्स अपुऱ्या पडतात व पाण्याची गरज वाढते म्हणून बाजाराच्या ठिकाणी हजार लीटर पाण्याची टाकी बाजाराचे दिवशी ठेवली तर पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होईल . हा बाजार कातळावर अगदी उघड्यावर भरत असल्याने पाण्यावाचून ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. जवळपास झाडे - झुडपेही नसल्याने सावलीही मिळत नाही. या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी होते. मात्र येथे स्वच्छतागृहाचा अभाव आहे. येथे महिलांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बाजाराचे दिवशी स्वच्छतागृहाची सोय करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तेथे आठवडा बाजारातील स्वच्छतागृहाची मागणी गेले काही दिवस होत असून खालगाव - जाकादेवी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावी अशी मागणी केली जात आहे. आठवडा बाजार जेथे भरला जातो त्या ठिकाणी रस्त्यासमोर पाण्याचा छोटा तलाव आहे. मात्र, या तलावातील पाण्यात कपडे धुतले जातात . ते तळे स्वच्छ केलेले नाही त्यामुळे ते पिण्यास नाही. तेथे पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी, असे व्यापाऱ्यांनी सुचविले आहे. मात्र, तळ्याचा विकास व पाण्याची सुविधा हे दोन मुद्दे येथे महत्त्वाचे आहेत. (वार्ताहर)