शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जाकादेवी आठवडा बाजारात पिण्याच्या पाण्याची मागणी

By admin | Updated: December 16, 2014 00:17 IST

व्यापाऱ्यांचा मुद्दा : स्वच्छतागृहासाठीही धरला आग्रह

जाकादेवी : जाकादेवी येथील आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी बाजाराच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली आहे.खालगाव - जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथे खालगाव रोडजवळील तळ्याकाठी कातळावर दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. सकाळी ८ ते सायंकाळी ६ ते ६.३० वाजेपर्यंत आठवडा बाजार सुरु असतो. जाकादेवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ या बाजाराचा लाभ घेतात. भाजीपाला व इतर वस्तूंची विक्री करण्यासाठी येथे ठिकठिकाणाहून व्यापारी येत असतात. येथील व्यापारीही या बाजारात उत्साहाने भाग घेतात. कातळावर भरत असलेल्या या बाजारासाठी छत्र्या घेऊन किंवा काही सावली डोक्यावर घेऊन हे व्यापारी बसलेले असतात. अलिकडे उन्हाचा कडाका असतोच त्यामध्ये वातावरणात दमटपणा असतो. अशा उन्हाळी वातावरणात तहानही लागते. अलिकडे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स बरोबर घेतल्या जातात. तरीही दुपारच्या जेवणाचा डबा खाताना पाणी अधिक प्रमाणात लागते. तिथे बॉटल्स अपुऱ्या पडतात व पाण्याची गरज वाढते म्हणून बाजाराच्या ठिकाणी हजार लीटर पाण्याची टाकी बाजाराचे दिवशी ठेवली तर पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होईल . हा बाजार कातळावर अगदी उघड्यावर भरत असल्याने पाण्यावाचून ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. जवळपास झाडे - झुडपेही नसल्याने सावलीही मिळत नाही. या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी होते. मात्र येथे स्वच्छतागृहाचा अभाव आहे. येथे महिलांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बाजाराचे दिवशी स्वच्छतागृहाची सोय करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तेथे आठवडा बाजारातील स्वच्छतागृहाची मागणी गेले काही दिवस होत असून खालगाव - जाकादेवी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावी अशी मागणी केली जात आहे. आठवडा बाजार जेथे भरला जातो त्या ठिकाणी रस्त्यासमोर पाण्याचा छोटा तलाव आहे. मात्र, या तलावातील पाण्यात कपडे धुतले जातात . ते तळे स्वच्छ केलेले नाही त्यामुळे ते पिण्यास नाही. तेथे पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हावी, असे व्यापाऱ्यांनी सुचविले आहे. मात्र, तळ्याचा विकास व पाण्याची सुविधा हे दोन मुद्दे येथे महत्त्वाचे आहेत. (वार्ताहर)