शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

स्वयंरोजगार कार्यालयाकडे युवतींची पाठच!

By admin | Updated: January 4, 2015 01:04 IST

अल्प प्रतिसाद : ४२ वर्षात केवळ ११०४१ जणींनी घेतला लाभ

शोभना कांबळे / रत्नागिरीजिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ३३,८७७ बेरोजगारांनी नावनोंदणी केली. त्यापैकी २२८३६ युवक असून, केवळ ११,०४१ युवतींनी नावे नोंदविली आहेत. यावरून मुली स्वयंरोजगारासाठी नावनोंदणी करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे.येथील जिल्हा सेवायोजन कार्यालयाची (आताचे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्र) निर्मिती १९६९ साली झाली. त्यानंतर १९९४ साली या कार्यालयाचे नामकरण ‘जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र’ असे झाले. मात्र, या ४३ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील युवकांची संख्या २२,८३६ इतकी असून, युवतींची संख्या निम्म्याने कमी म्हणजे ११,०४१ इतकी आहे. विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागातील युवक - युवतींची संख्या अधिक आहे. एकूण संख्येपैकी १८,८२४ ग्रामीण युवकांनी तर ८,१३९ ग्रामीण युवतींनी या कार्यालयाकडे नोद केली आहे. म्हणजेच आतापर्यंत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये नावनोंदणीबाबत उदासीनता दिसून येत आहे. तसेच मुली आपल्या शहराबाहेर काम करण्यास इच्छुक नसल्याने त्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडे स्वयंरोजगारासाठी दहावी ते विविध विषयातील पदव्युत्तर युवक - युवती रोजगार मिळावा, या हेतूने नाव नोंदणी करतात.आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी पदधीधरांनी केली आहे. त्याखालोखाल दहावी उत्तीर्ण झालेल्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, पदव्युत्तर झालेल्यांपैकी केवळ २९ जणांनीच कार्यालयाच्या नोंदणीचा लाभ घेतला आहे. या दोन्हींमध्ये विधी शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर झालेल्या एकाही उमेदवाराने नोंदणी केलेली नाही. त्यामुळे स्वयंरोजगार केंद्राकडे नोंदणीबाबत अनेकांची अनुत्सुकता असल्याचे दिसून येते.