शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन संपेपर्यंत करावी लागणार निकालपत्रासाठी प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:52 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षण विभागाच्या नियमानुसार ...

रत्नागिरी : कोरोनामुळे पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून निकाल श्रेणीनुसार जाहीर केला जाणार आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने लॉकडाऊननंतरच निकालपत्र देण्यात येणार असल्याचे शाळांनी जाहीर केले आहे.

गतवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक परीक्षा रद्द केल्यामुळे सर्वकष मूल्यमापन पद्धत स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करण्याचे काम शाळेत सुरू आहे. शाळांचे शिक्षक सरसावले असून, काही शाळांनी दि. १० पर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे पालकांना निकालपत्र आणण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शाळांना तूर्तास निकालपत्र देणे रद्द केले असून पुढील तारखा व्हॉटसॲपवर घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

लॉकडाऊनमुळे शाळांमधील शैक्षणिक कामकाज सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे पूर्वीचे मूल्यमापन करून गुणपत्रिका बनविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये गुणपत्रिका तयार करण्याची कामे सुरू आहेत. सलग दोन वर्षे वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय निकाल व गुणपत्रिका वितरित करण्याची तयारी शाळाशाळांमधून सुरू आहे. निकालासाठी शाळेत गर्दी होऊ नये यासाठी वर्गनिहाय तारखा निश्चित करून पालकांना वेळापत्रक व्हॉटस्ॲपवर पाठविण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य लोकांना बाहेर पडता येत नसल्यामुळे शाळांनी निकालपत्र वितरण रद्द केले आहे.