शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

भातशेतीबरोबर भाजीपाला उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील माधव हरी भावे भातशेतीसह भाजीपाला उत्पादनासह जोडव्यवसाय म्हणून ‘दुग्ध व्यवसाय’ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील माधव हरी भावे भातशेतीसह भाजीपाला उत्पादनासह जोडव्यवसाय म्हणून ‘दुग्ध व्यवसाय’ करीत आहेत. याशिवाय आंबा, काजू, कोकम, फणस या कोकणी मेव्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती करून विक्री करीत आहेत. भातशेतीतून ५० गुंठे जमिनीतून २८८० किलो उत्पादन घेत आहेत.

माधव भावे सध्या ७० वर्षांचे आहेत. अकरावी मॅट्रिक झाल्यानंतर भावे यांनी नोकरीसाठी प्रयत्न न करता शेतीकडे लक्ष केंद्रित केले. गेली ४० वर्षे ते शेती व्यवसायात आहेत. वडिलोपार्जित जमिनीमध्ये भातशेती, त्यानंतर भाजीपाला, शिवाय उर्वरित जमिनीवर आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड केली आहे. सेंद्रिय उत्पादनावर विशेष भर असल्यामुळे त्यांच्याकडील भात, भाज्या तसेच फळांचा दर्जा तर चांगला आहे, शिवाय उत्पादकताही उत्तम आहे. पन्नास गुंठे जमिनीवर भाताचे उत्पादन घेत असून त्यांना पावणेतीन ते तीन हजार किलो भात उत्पादन प्राप्त होत आहे.

भात काढणीनंतर भाजीपाला लागवड करीत आहेत. बागायतीसह दूध व्यवसायातून उत्पन्न मिळवत आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना, व्यावसायिकता जोपासली आहे. कमी जागेत जास्तीतजास्त उत्पादन ते मिळवत आहेत.

दुग्ध व्यवसायाची जोड

माधव भावे यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. चार म्हशी व एका गायीचा सांभाळ केला असून शेतीसाठी नांगरणीकरिता बैलजोडी आहे. दररोज ते दूध रत्नागिरी शहरात जाऊन विक्री करीत आहेत. शेण व गोमूत्रापासून खत व जीवामृताची निर्मिती करीत आहेत. शेतीसाठी त्याचा वापर करीत असल्याने उत्पादन व दर्जा राखण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सेंद्रिय शेतीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

मिरची उत्पादन

सर्व प्रकारच्या पालेभाज्यांसह कोथिंबीर, वांगी, चवळी, पावटा लागवड करीत आहेत. याशिवाय, लोणच्यासाठी लागणा-या गावठी हिरव्या मिरचीचे ते उत्पादन घेत आहेत. १०० ते १२० रुपये किलो दराने मिरची विकली जात असल्याने मिरची लागवडीतून चांगला फायदा होत असल्याचे सांगितले. गावठी वांगी तसेच लाल व तांबडी चवळी लागवड करून उत्पादन घेत आहेत. स्थानिक पातळीवरच विक्री होत आहे.

मका लागवड

दुभती सहा तर नांगरणीसाठी दोन मिळून आठ जनावरे आहेत. दुभत्या जनावरांना बारमाही ओला चारा मिळावा, यासाठी पावसाळ्यानंतर ते मका लागवड करीत आहेत. खाण्यासाठी मका उपलब्ध होतोच, शिवाय दुभत्या जनावरांसाठी पोषक खाद्य असल्याने दुधाचा दर्जा चांगला राहतो. शिवाय, दूधही भरपूर प्राप्त होते.

बागायतीतून उत्पन्न

भावे यांनी १७० काजू, १०० नारळ, २०० सुपारी, १० फणस व ५ आंबा कलमांची लागवड करून उत्पादन घेत आहेत. कोकमपासून सरबत, शिवाय फणसपोळी, आंबापोळी यासारखे उत्पादन घेऊन विक्री करीत आहेत. बागायतीबरोबर प्रक्रिया उत्पादनातून उत्पन्न मिळवत आहेत. चांगल्या दर्जामुळे विक्रीही हातोहात होते.