शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही ‘ग्लोबलगॅप’ अनुदान

By admin | Updated: December 26, 2016 00:26 IST

संपर्काचे आवाहन : हापूस आंब्याच्या निर्यातीला चालना देण्याचे प्रयत्न

रत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या आंबा पिकाच्या निर्यातीस चालना मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे ग्लोबलगॅप प्रमाणिकरण अनुदान योजना चालू हंगामासाठी (२०१६-१७) राबविण्यात येणार आहे. युरोपियन देशांसह अमेरिका, जपान या देशांमध्ये आंबा निर्यात करण्यासाठी ग्लोबल प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे पणन विभागाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ग्लोबलगॅप प्रमाणिकरणासाठी हापूस आंबा, केशर आंबा उत्पादक इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे ‘अपेडा’ मान्यताप्राप्त कोणत्याही एजन्सीतर्फे प्रमाणिकरण करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. कृषी पणन मंडळातर्फे ग्लोबलगॅप प्रमाणिकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० किंवा ७५ टक्के रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल, ती वैयक्तिक शेतकऱ्यांचा ग्रुप (पीएमओ) यांच्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर देण्यात येईल. अनुदानाची रक्कम कृषी पणन मंडळ, पुणेतर्फे लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल. रत्नागिरी विभागीय कार्यालयातर्फे इच्छुक शेतकऱ्यांचे प्रस्ताव सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास विहीत मर्यादेनुसार अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. ग्लोबल गॅप प्रमाणिकरण अनुदान मिळण्याबाबत शेतकऱ्यांनी तारखेसह अर्ज सादर करावा. पीएमओअंतर्गत ग्लोबल गॅप प्रमाणिकरण अनुदान मिळण्याबाबतचा अर्ज तारखेसह सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, त्रयस्थ एजन्सीमार्फत तयार केलेल्या प्रमाणपत्राची प्रत, विभागीय उपसरव्यवस्थापक यांचे अनुदान मंजुरीबाबतचे शिफारसपत्र, अर्जासोबत शेतकऱ्यांनी बँक तपशील देणे आवश्यक आहे.त्यामध्ये बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक खातेक्रमांक, आयएफसी कोड तसेच रद्द (चेक)धनादेशासह कागदपत्र सादर करावीत. संबंधित शेतकऱ्यांनी राज्य कृषी पणन मंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पणनचे प्रयत्न : हापूसची परदेशवारी‘अपेडा’ मान्यताप्राप्त कोणत्याही एजन्सीतर्फे प्रमाणिकरण करून घेण्याची सूचना.अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये थेट जमा.शेतकऱ्यांनी कृषी पणन मंडळाच्या रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन.हापूस आंबा जास्तीत जास्त प्रमाणात परदेशात निर्यात व्हावा, यासाठी पणन विभाग प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांमध्ये हळूहळू सकारात्मक बदल होत असून, त्यामुळे आता परदेशातही कोकणी हापूस पोहोचू लागला आहे.