शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यमाच्या काळ्या छायेलाच रोखले ‘माय’च्या ममतेने...!

By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST

दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखम

शिवाजी गोरे, दापोली : ‘देव तारी त्याला कोण मारी?’असे म्हटले जाते. अगदी त्याचप्रमाणे दाभोळ टेमकरवाडीतील डोंगर कोसळून दरड कोसळली. त्या दरडीचा काही भाग हरेकर कुटुंबियांच्या घरावरील मागच्या बाजूला येऊन पडला. दरडीच्या रेट्यामुळे चक्क सागाचे झाड, ज्या खोलीत आई आपल्या मुलांना कुशीत घेऊन झोपली होती, त्याच खोलीवर येऊन पडले. मृत्यूची छाया त्यांच्यासमोर उभी होती. परंतु दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखम झाली व हर्षला हरेकर यांचे कुटुंब अक्षरश: बालंबाल बचावले. हरेकर कुटुंबाचे दोन भावांचे एक घर आहे. त्या दिवशी दोन्ही कुटुंब आपापल्या मुलांना घेऊन आपल्या खोलीत झोपली होती. पुढे काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. त्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यावर दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासह झोपायला गेले. रात्रभर पावसाचा जोर कमीच होत नव्हता. अचानक मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास डोंगर कोसळला व मोठ्याने आवाज होऊन दरड खाली आली. या दरडीत झाडे व घरे जमिनीत गाडली गेली. या डोंगराचा काही भाग हरेकर यांच्या घरावर येऊन धडकला. सागाचे एक मोठे झाड हरीश्चंद्र, हर्षला, सिद्धी, रिद्धी ज्या खोलीत साखरझोपेत होते, त्यांच्यावर येऊन पडले. डोंगराकडच्या भिंतीला भगदाड पडून दगड व झाडे खोलीत घुसले. परंतु, सुदैवाने चारहीजण बचावली. धो-धो पाऊस व त्यातच वीज नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोणाच्याही लक्षात येत नव्हता. हर्षला आपल्या मुलींसह साखर झोपेत होती. मात्र जेव्हा झाड पडले, तेव्हा रिद्धी आणि सिद्धी आईच्या कुशीत होत्या. त्यामुळे यमाची काळी सावली त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. हरिश्चंद्र यांच्या मोठ्या भावाने व शेजाऱ्याने खोलीत घुसून त्या सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली. अंधाऱ्या रात्रीत काळाने झडप घालण्याआधीच नातेवाईकाने खोलीतून ओढून बाहेर काढले. खोलीत झाड घुसल्याने बाहेर येता येत नव्हते. मृत्यू समोर उभा ठाकला होता. मात्र माय-लेकरांमधील अतूट मायेच्या धाग्यानेच जणू त्यांनी मृत्यूला थोपवून ठेवले आणि दोन मुलांचा पुनर्जन्मच झाला.