शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

यमाच्या काळ्या छायेलाच रोखले ‘माय’च्या ममतेने...!

By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST

दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखम

शिवाजी गोरे, दापोली : ‘देव तारी त्याला कोण मारी?’असे म्हटले जाते. अगदी त्याचप्रमाणे दाभोळ टेमकरवाडीतील डोंगर कोसळून दरड कोसळली. त्या दरडीचा काही भाग हरेकर कुटुंबियांच्या घरावरील मागच्या बाजूला येऊन पडला. दरडीच्या रेट्यामुळे चक्क सागाचे झाड, ज्या खोलीत आई आपल्या मुलांना कुशीत घेऊन झोपली होती, त्याच खोलीवर येऊन पडले. मृत्यूची छाया त्यांच्यासमोर उभी होती. परंतु दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखम झाली व हर्षला हरेकर यांचे कुटुंब अक्षरश: बालंबाल बचावले. हरेकर कुटुंबाचे दोन भावांचे एक घर आहे. त्या दिवशी दोन्ही कुटुंब आपापल्या मुलांना घेऊन आपल्या खोलीत झोपली होती. पुढे काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. त्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यावर दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासह झोपायला गेले. रात्रभर पावसाचा जोर कमीच होत नव्हता. अचानक मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास डोंगर कोसळला व मोठ्याने आवाज होऊन दरड खाली आली. या दरडीत झाडे व घरे जमिनीत गाडली गेली. या डोंगराचा काही भाग हरेकर यांच्या घरावर येऊन धडकला. सागाचे एक मोठे झाड हरीश्चंद्र, हर्षला, सिद्धी, रिद्धी ज्या खोलीत साखरझोपेत होते, त्यांच्यावर येऊन पडले. डोंगराकडच्या भिंतीला भगदाड पडून दगड व झाडे खोलीत घुसले. परंतु, सुदैवाने चारहीजण बचावली. धो-धो पाऊस व त्यातच वीज नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोणाच्याही लक्षात येत नव्हता. हर्षला आपल्या मुलींसह साखर झोपेत होती. मात्र जेव्हा झाड पडले, तेव्हा रिद्धी आणि सिद्धी आईच्या कुशीत होत्या. त्यामुळे यमाची काळी सावली त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. हरिश्चंद्र यांच्या मोठ्या भावाने व शेजाऱ्याने खोलीत घुसून त्या सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली. अंधाऱ्या रात्रीत काळाने झडप घालण्याआधीच नातेवाईकाने खोलीतून ओढून बाहेर काढले. खोलीत झाड घुसल्याने बाहेर येता येत नव्हते. मृत्यू समोर उभा ठाकला होता. मात्र माय-लेकरांमधील अतूट मायेच्या धाग्यानेच जणू त्यांनी मृत्यूला थोपवून ठेवले आणि दोन मुलांचा पुनर्जन्मच झाला.