शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

रमार्इंच्या माहेराला जागतिक कीर्तीची नांदी

By admin | Updated: August 31, 2015 21:28 IST

भाई गिरकर : सामाजिक ऋण फेडण्यासाठीच वणंद गावदत्तक

शिवाजी गोरे-- दापोली   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामागे खंबीरपणे उभे राहून ज्या मातेने समाजासाठी सामाजिक योगदान दिले. अशा या महान कर्तृत्ववान माता रमाई आंबेडकरांचे वणंद हे माहेर आहे. या महान व्यक्तीमत्वाचे गाव आजही शासन दरबारी दुर्लक्षित आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करुन सामाजिक ऋण फेडण्यासाठीच वणंद गाव आमदार आदर्श ग्राम म्हणून आपण दत्तक घेतल्याचे माजी मंत्री आमदार भाई गिरकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.आमदार आदर्श ग्राम म्हणून वणंद गाव दत्तक घेतल्यानंतर पहिल्यांदाच भाई गिरकर वणंद येथे आले होते. माता रमार्इंचे माहेर वणंद येथे अलीकडे माता रमाई स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाईच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आज मी केवळ या महापुरुषांमुळेच मंत्री, आमदार होऊ शकलो. ज्यांनी शिका, संघटीत व्हा, प्रगती करा हा मूलमंत्र दिला. त्यामुळेच आज आपण घडलो. त्यांचे ऋण माझ्यावर आहेत. ते फेडण्यासाठीच वणंद गाव दत्तक घेतले आहे. या गावातील रस्ते, पाणी, २४ तास वीज, आरोग्य, शिक्षण, शौचालय, रोजगार या सुविधा पुरवण्यास आपण कटीबद्ध आहोत, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.माता रमार्र्इंचे गाव जगाच्या नकाशावर झळकण्यासाठी या गावात मुलींचे शासकीय वसतिगृह, कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या उच्च शिक्षणातून सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वणंद हे गाव दापोली शहरापासून जवळ असूनसुद्धा या गावाचा विकास झालेला नाही. हे महामानवाचे गाव दुर्लक्षित असल्याबद्दल खंत व्यक्त करुन माता रमाईचे माहेर जागतिक कीर्तीचे बनवण्याचा संकल्प केला असल्याचे आमदार गिरकर यावेळी म्हणाले.वणंद गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गावाच्या नावलौकिकाला शोभेसे गाव बनवण्यासाठी वणंद-गिम्हवणे ग्रुप ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास केला जाईल. यामध्ये वणंद गावाची कामे प्राधान्याने केली जातील. वणंद बौद्धवाडी, गुजरवाडी, दुबळेवाडी, कांगणेवाडी, कातळवाडी, लोवरेवाडी, गवळवाडी या वाड्यातील कामे प्राधान्याने केली जातील, असेही ते म्हणाले.आमदार आदर्श ग्राम योजनेची आमदार भाई गिरकर यांची ग्रामस्थांसमवेत माता रमाई स्मारकात बैठक झाली. या बैठकीत वणंद गावातील ७ वाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत वणंद गावाच्या आराखड्याबाबत चर्चा झाली.या बैठकीला तहसीलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी डॉ. मनिषा देवगुणे, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस प्रीतम रुके, विस्तार अधिकारी भांड, शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे, सदाशिव रसाळ, मंगेश मोरे, शरद धोत्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम इदाते, सुभाष धोत्रे, सुनील धोत्रे, सुरेश धोत्रे, बाळाराम धोत्रे, चंद्रमणी गमरे, बाळाराम धोत्रे, चंद्रमणी गमरे, यशवंत काटकर, नारायण गुजर, अनंत गुजर, प्रकाश कांगणे, महिला बालकल्याण अधिकारी साळवी, धोंडू दुबळे, अर्चना येलवे, जि. प. सदस्या सुजाता तांबे उपस्थित होते.सर्व योजना प्राधान्याने राबविणारवणंद गावाचा सर्व्हे करुन गावाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होण्याचे दृष्टीने प्रयत्न केले जातील. शासनाच्या सर्व योजना या गावात प्राधान्य क्रमाने राबवण्यात येतील.- कल्पना गोरे, तहसीलदार दापोलीगावाचा विकास आराखडा तयार झाल्यावर लोकसहभागातून गावाला विश्वासात घेऊन प्राधान्य क्रमाने विकासकामे केली जातील. आमदार आदर्श ग्रामसाठी जिल्हाधिकारी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करतील. ग्रामस्थांच्या सूचनांप्रमाणे गावातील विकासकामे केली जातील.- डॉ. मनिषा देवगुणे, गटविकास अधिकारीवणंद गाव आपण केवळ विकास कामाकरिता घेतले आहे. वणंद गावाच्या विकासात कोणतेही राजकारण आड येऊ देणार नाही. कोणीही यामध्ये राजकारण करु नये. माता रमाईच्या गावाचा विकास हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून गावाची निवड केली आहे.- आमदार भाई गिरकर, माजी समाजकल्याणमंत्री