शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ची कला जपत ‘आक्का’नं फुलवले बहिणींचे संसार

By admin | Updated: October 15, 2015 00:39 IST

अनुया बाम : वडिलांच्या निधनानंतर बहिणींसाठी त्याच झाल्या पिता--नारीशक्तीला सलाम

रत्नागिरी : वडिलांच्या पश्चात पाच बहिणींची लग्न करताना ‘आक्का’नं आपल्यातील अभिनेत्री हरवू दिली नाही. कधी या अभिनेत्रीने त्यांना साथ दिली, तर त्यांनी आपल्यातील अभिनेत्रीला! म्हणून तर आपल्या बहिणींचे संसार मार्गी लावतानाच त्यांनी ४० वर्षात तब्बल तीन हजारांहून अधिक नाटकांमध्ये काम केलं आणि बड्याबड्या कलाकारांकडून कौतुकाची थाप मिळवली. स्वत:ची आवड जपतानाच ‘आक्का’ असण्याचं कर्तव्य निभावणंही त्या विसरल्या नाहीत. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे सुनीता बापट अर्थातच आत्ताच्या अनुया बाम. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी वयाच्या १४व्या वर्षी त्या आरसा शील्डच्या स्पर्धेत ‘अबोल झालीस का’ या एकांकिकेत अगदी आयत्यावेळी नर्स झाल्या. अंगभूत सभाधीटपणा, उत्तम संभाषणकौशल्याच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेतून अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर दोन वर्षांनी ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं.रत्नागिरीतील अलंकर थिएटर्स, याचबरोबर एस. टी., सार्वजनिक बांधकाम, भू विकास इ. खात्यांच्या नाटकातून राज्य नाट्य स्पर्धेसाठी सुमारे १४ वर्षे त्यांनी अभिनय तर केलाच; पण अनेकदा या स्पर्धांतून मानाचं समजलं जाणारं अभिनयाचं रौप्य पदकही मिळवलं.वडील विनायक बापट यांच्याकडून जशी अभिनयाची आवड आली तशीच आई सरस्वती बापट यांच्याकडून गोड गाता गळाही मिळाला. ज्याचा उपयोग त्यांना मत्स्यगंधा, सं. सौभद्र, जय जय गौरी शंकर इ. संगीत नाटकांमध्ये त्यांना करता आला. अभिनयाइतकीच त्यांच्या गाण्यांनाही प्रेक्षकांकडून दाद मिळू लागली.अभिनयाची वाटचाल सुरु असतानाच त्यांच्या लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात वडिलांचं अर्धांगवायूमुळे निधन झालं आणि धाकट्या पाच बहिणी व आईची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. ही जबाबदारी पेलण्यासाठी या अभिनय कलेनेच त्यांना साथ दिली. महिन्यातील सलग २५/२६ दिवस रोज एक नाटक करत त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून धाकट्या सर्व बहिणींचे शिक्षण, लग्न आदी जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या.नटी या शब्दाला सुनीतातार्इंनी आपल्या चोख अभिनयाबरोबरच चोख वागण्यातून एक मान मिळवून दिला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आज त्यांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे ३००० नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. आकाशवाणीवरील मुक्ताकाश, ५०-५०, सूर्यस्पर्श, रथचक्र, लंडनची आजीबाई आदी श्रुतिकांमुळे त्यांचा आवाज ही त्यांची वेगळी ओळख बनली. दिल्लीत आकाशवाणी नाट्य स्पर्धेत परिवर्तनम् या संस्कृत नाटकासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला.एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला समजून घेऊ शकतो, हे त्यांचे पती अवधूत बाम यांच्यावरून समजतं. संसारिक जबाबदारी पेलतानाच पत्नीच्या कलेत मोलाचं सहकार्य त्यांनी नेहमीच दिलं. अवधूत बाम हे स्वत: आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक, वादक, संगीतकार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भजन आणि कीर्तन क्षेत्रातील सुनीतातार्इंची वाटचाल सुरु आहे. रत्नागिरीतल्या कर्लासारख्या छोट्याशा गावात राहून ४० वर्षांची ही वाटचाल आई-वडील, बहिणी आणि लग्नानंतर खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पतीमुळेच, असं त्या आवर्जून नमूद करतात. (प्रतिनिधी)आपल्या वाटचालीत आलेले अनुभव हेच त्यांचे गुरु बनले आणि त्या गुरुच्या आशीर्वादामुळेच प्र. ल. मयेकर, मधुकर तोरडमल, जयवंत दळवी अशा मान्यवरांची कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडली. पेट्रोमॅक्सच्या रंगमंचावर सुरु केलेली अभिनयाची वाटचाल फिरत्या रंगमंचापर्यंत पोहोचली ती प्रभाकर पणशीकरांसारख्या अभिनयातील बाप माणसाच्या तो मी नव्हेच या नाटकामुळे. कोकण आणि गोव्याच्या दौऱ्यात सुनंदा दातार ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली.विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नाटक हे माध्यम जपतानाच सुनीतातार्इंनी क्राईम डायरीसारखी ई टीव्हीवरील मालिका, रमाबाई आंबेडकर, बे एके बेसारखे चित्रपट, जीवन बिमा निगमसाठी डॉक्युमेंट्री ही अभिनय क्षेत्रातली वेगवेगळी माध्यमंही हाताळली. या प्रदीर्घ वाटचालीनंतर आता राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीची परीक्षिका म्हणून काम करण्याचा मानही त्यांनी पटकावला आहे. त्यांनी विविध क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी मोहोर उठवून वेगळेपण सिध्द केले आहे.कलाकाराचं ‘देण्या’चंही भानकलाकारानं घेण्याबरोबर देण्याचंही व्रत जोपासायला हवं, हे ध्यानात ठेवत अनुया बाम यांनी गरजूंची राहण्याची मोफत सोय, रुग्णांना जेवण देणं, रूग्णांच्या नातेवाईकांना मदत करणे अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. समाजकार्याच्या कामाची पावती म्हणजे त्यांची कर्ला ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी झालेली निवड. नाशिक, चिपळूण, रत्नागिरी येथील विविध संस्थांनी त्यांच्या या कामाची रंगभूमीवरील सेवेची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. निवेदिका म्हणूनही आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. सावळे परब्रह्म, देवाचिये द्वारी, शिवतनया विघ्नेशा, हरि भजनाचा मेळा आदी सिडीसाठी त्यांनी निवेदन केलं आहे.