शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

लांजातील उड्डाण पुलाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

लांजा : शहरातील भर बाजारपेठेत गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पुन्हा ठप्प झाले आहे. केवळ चार ते ...

लांजा : शहरातील भर बाजारपेठेत गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पुन्हा ठप्प झाले आहे. केवळ चार ते पाच अर्धवट स्थितीतील पिलर उभे करण्यात आले आहेत. हे काम मात्र अर्धवट स्थितीत ठप्प झाल्याने अनेक अडचणी आ-वासून उभ्या राहिल्या आहेत.

शहरातून जाणाऱ्या या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यापूर्वीच ते गतीने आणि एकमार्गी होणार असेल, तरच बाजारपेठ हटवा, अशी मागणी महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने प्रशासनाकडे वारंवार केली होती. शहराच्या भर बाजारपेठेत असलेल्या या महामार्गावर हा उड्डाणपूल होत असल्याने या ठिकाणचे जवळपास साडेतीनशे छोटे-मोठे व्यापारी विस्थापित झाले असल्यानेच ही मागणी करण्यात आली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी याबाबत उदासीन राहिले आहेत. याचा फटका लांजा शहराला आणि जनतेला बसत आहे. याबाबत महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीचे प्रमुख महंमद रखांगी यांनी सांगितले की, लांजातील या ओव्हरब्रिजचे केवळ दाखवण्यापुरते उणेपुरे काम झाले आहे. या कामाला कोणतीही गती नसल्याने हे बांधकाम दीर्घकाळ रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उड्डाणपुलासाठी झालेल्या भूसंपादनात सर्व व्यापारी बाजारपेठ उद्ध्वस्त करण्यात आली आहे. येथील जवळपास ३५० व्यापाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून उड्डाणपुलाच्या कामाच्या नावाखाली कायमचे हटविण्यात आले आहे. उड्डाणपूल बांधताना साईडपट्टी, डायवर्जन, सर्व्हिसरोड आदींची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. या सर्वांची तरतूद प्राधान्याने करणे आवश्यक असताना, केवळ मलमपट्टी करण्याचे काम संबंधित करीत आहेत. अंदाजपत्रकात समाविष्ट आणि तरतूद असलेली ही कामे करण्यात आलेली नसल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत.

सद्यस्थितीत कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे नसल्याने पावसाच्या पाण्याचा प्रचंड त्रास बाजारपेठेला होत आहे. यावर्षी पूर्णतः गटारे बुजल्याने संपूर्ण बाजारपेठेत पावसाचे पाणी घुसणार आहे. मुळात बाजारपेठेतील दोन किलोमीटरच्या टप्प्यात रस्ताच गायब झाला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महामार्ग पाण्याखाली जाऊन नदीचे स्वरूप आले होते. यावरून येथील बिकट परिस्थितीची कल्पना येते.

महंमद रखांगी पुढे म्हणाले की, चार वर्षांहून अधिक काळ मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. हे चौपदरीकरण २०१८ ला पूर्णत्वास जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज २०२१ चा मे महिना संपत आला तरीही महामार्गाच्या कामाला कोणतीही गती प्राप्त झालेली नाही. लांजा तालुक्यातील वाकेड ते आरवली हा जवळपास ८९ किलोमीटरचा टप्पा पूर्णतः रखडलेला आहे. अवघे १० टक्के थातुरमातुर काम झाले आहे. या टप्प्यात येणाऱ्या लांजा बाजारपेठेत मात्र चौपदरीकरणाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.

नगरपंचायत नळपाणी योजनेच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनचे काम, महावितरणचे विद्युत पोल आणि विद्युतलाईनचे काम, साईडपट्टीचे कोणतेही नियोजन नाही. उड्डाणपुलाला लागून ॲप्रोच रोड तयार करण्याबाबत महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यात उदासीनता दिसून येत आहे.

पक्क्या स्वरूपाचे सर्व्हिस, ॲप्रोच, डायवर्जन रोड करण्यात आलेले नसल्याने संपूर्ण बाजारपेठ आणि लांजा शहर धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहे. महामार्गावरून मोठमोठाल्या वाहनांची नियमितपणे वाहतूक होत असल्याने या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. रेस्ट हाऊस ते बसवेश्वर चौक असा सर्व्हिस रोड पूर्ण शहरात तयार होणे गरजेचे आहे. हा सर्व्हिस रोड पक्क्या स्वरूपाचा म्हणजेच डांबरीकरणाचा होणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार कंपनीने केवळ मलमपट्टी करून, खडी पसरवून कच्चा मातीचा हा रस्ता केला आहे. हा रस्ता जाग्यावर राहिलेला नाही. यामुळे बाजारपेठेत महामार्गावरील रस्ता शोधणे अवघड बनले आहे. पावसाळ्यात तर यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत.

लांजा बाजारपेठेला वाचविण्यासाठी बायपास असावा, अशी भूमिका घेऊन महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने आवाज उठविला होता. परंतु भर बाजारपेठेतूनच महामार्ग नेण्याचा निर्णय झाल्यानंतर या शहरात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला. मात्र हा निर्णय सर्वार्थाने चुकीचा ठरत असून, बजेटच्या दृष्टीनेही हा ओव्हरब्रीज परवडणारा नाही, हे स्पष्ट झाले असल्याचे रखांगी यांनी सांगितले.