शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

लांबी - ३०० मीटर रुंदी - ३० मीटर लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : मुंबई-गाेवा महामार्गाचे राजापूर शहरातील काम सध्या ...

लांबी - ३०० मीटर

रुंदी - ३० मीटर

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : मुंबई-गाेवा महामार्गाचे राजापूर शहरातील काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील वरचीपेठ येथील अर्जुना नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूचे काम अद्याप बाकी असल्याने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता नाही, तरीही संबंधित ठेकेदाराला पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई - गोवा महामार्गावरील सर्वात उंच पूल म्हणून राजापूर शहरानजीक अर्जुना नदीवर उभारण्यात येणारा पूल असून, आता पूर्णत्वाकडे जात आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या असलेले काम पाहता, तो सुरू होण्याची शक्यता दिसून येत नाही. पुलाची उभारणी करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याने पुलाचे काम झपाट्याने झाले आहे.

राजापूर शहरातून हा महामार्ग राजापूर बस स्थानकाकडून पुढे कै. मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल व महामार्गावरील दर्ग्याच्या मधून पुढे सारंगबागेतून थेट अर्जुना नदीवरील पुलावर जात आहे. पुढे सुमारे ३० मीटर लांबीच्या पुलाने थेट गाडगीळवाडी येथे सध्या असलेल्या महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे राजापूर दर्ग्याजवळून पुढे कब्रस्तान, शासकीय विश्रामगृह व पुढे वरचीपेठ ब्रिटिशकालीन पूल हे सुमारे ७०० ते ८०० मीटर इतके अंतर कमी होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन पुलापासून अर्जुन नदीपात्रात शीळकडे जाताना पुढे सुमारे १०० ते १२५ मीटर लांबीवर हा नवीन पूल बांधला जात आहे.

सध्या वाहतुकीसाठी सुरू असलेला ब्रिटिशकालिन पूल वाहतुकीला धोकादायक झाल्याने, या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. गतवर्षी पावसाळ्यातील अतिवृष्टीत हा पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आला होता. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून नवीन पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांना दिले आहेत.

.........................................

पुलामुळे ११ वेडीवाकडी वळणे कमी

सारंग बागेतून थेट अर्जुना नदीवरून पुढे गाडगीळवाडीतून सध्याच्या महामार्गाला हा पूल जोडला जाणार आहे. या दुहेरी पुलाला एकूण १६ पीलर असून, अर्जुना नदीपात्रातून सुमारे ३६ मीटर उंचीचे दोन पुलांसाठी चार पीलर टाकले आहेत, तर उर्वरित पीलर हे प्रारंभी व शेवट आणि मध्यभागी टाकले आहेत. यात नदीपात्रातील लांबी ही २२० मीटर तर जमिनीवरील लांबी ही सुमारे ८० मीटर इतकी राहणार आहे. या पुलामुळे ११ वेडीवाकडी अवघड आणि छोटी मोठी वळणे कमी होणार आहेत.