शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लाकडी खोक्याचा पिंजरा झुकला नव्वदीकडे!

By admin | Updated: January 28, 2015 00:53 IST

महागाईचा परिणाम : बाजारपेठेत हापूस पोहोचण्यास महिन्याचा अवधी

रत्नागिरी : आंबा बाजारपेठेत येण्यास सुमारे दीड महिन्याचा अवधी आहे. अजूनही कलमांवर फवारणी सुरू आहे. मात्र, आंबा बाजारपेठेत पाठविण्यासाठी लागणारा लाकडी खोका ‘पिंजरा’ तयार करण्यास आता प्रारंभ झाला आहे. मात्र, महागाईचा परिणाम या लाकडी खोक्यावरही झालेला दिसून येत आहे. तयार खोका ‘पिंजरा’ ९० रूपये दराने विकण्यात आहे, तर सुट्या पट्टीची ७५ रूपये दराने विक्री सुरू आहे.झाडावरून आंबा काढल्यानंतर त्याची वर्गवारी केली जाते. त्यानुसार तो गवताचा थर टाकून आंबा लाकडी खोक्यात बंद केला जातो. पट्टी निखळू नये, यासाठी हल्ली प्लास्टिक पट्टीदेखील क्लिपच्या सहाय्याने बसवली जाते. जेणेकरून ट्रक, टेम्पोतून पेट्यांची वाहतूक सुरक्षित होते.लाकूड तोडण्यासाठी वन खात्याचा परवाना आवश्यक आहे. त्यासाठी जंगली झाडे तोडून त्याचा वापर लाकडी खोक्यासाठी केला जातो, तर काही ठिकाणी जीर्ण झाडेदेखील तोडली जातात. सॉ मिलवर लाकूड कापण्यासाठी नेले जाते. त्याठिकाणी लाकूड कापण्यासाठी वेगळा दर द्यावा लागतो. एका खोक्याच्या पट्टीसाठी २० रूपयेप्रमाणे चिरकामाचे पैसे द्यावे लागतात.काही शेतकरी खोक्याची सुटी पट्टी खरेदी करून खोका ठोकून घेतात. ही सुटी पटी एका खोक्यासाठी ७५ रूपये दराने विकण्यात येते. गतवर्षी सुटी पट्टी ६५ रूपये दराने विकण्यात येत होती.विशिष्ट आकाराच्या पट्ट्या चुकांव्दारे जोडून खोका तयार केला जातो. चुका ७५ रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत, तर एक खोका ठोकण्यासाठी ५ रूपये दराने मजुरी द्यावी लागते. सुट्या पट्टीमध्ये मोडक्या किंवा तकलादू पट्ट्यांचा समावेश असल्याने त्यामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे तयार खोका खरेदी करणे परवडते. मात्र, रिकाम्या खोक्यासाठी ९० रूपये मोजावे लागतात. तर गतवर्षी तयार खोका ७५ रूपये दराने विकण्यात येत होता. सुरूवातीला हा दर कमी असला तरी ऐन हंगामात हे दर वाढतात.एकूणच आंबा झाडावरून काढून मार्केटपर्यंत विक्रीला पाठविण्यासाठी प्रचंड खर्च येतो. झाडांना घातली जाणारी खते, फवारणीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके, फवारणीसाठी लागणारे इंधन, आंबा झाडावरून काढून त्याची वर्गवारी करणे, तद्नंतर पॅकिंग करून मार्केटमध्ये पाठवण्यासाठी येणारा वाहतूक खर्च, मजूरी, हमाली, दलाली आदी खर्च वजा जाता शिल्लक राहणारी बाकी शेतकऱ्यांची असते. त्यातच शेतकरी कराराने आंबा काढणीसाठी बागा घेत असेल तर तोही खर्च वजा करावा लागतो. (प्रतिनिधी) आंबा बाजारपेठेत जाईपर्यंत अनेक खर्च होत असतात. वाढत्या महागाईचा परिणाम संबंधित बाबींवर दिसून येत असल्याने आंब्याला योग्य भाव मिळणे अपेक्षित आहे. त्या प्रमाणात दर का वाढू शकत नाही. आंब्याची विक्री किंवा मार्केटिंगवर दलालांचा ‘व्यापाऱ्यांचा’ प्रभाव असल्याने कोकणी शेतकरी गरीब राहिला आहे. एकूण आंब्याचे मार्केटिंग होण्यासाठी योग्य प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे.- एम. एम. गुरव, शेतकरी