शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

सिंधुदुर्गात वादळी पाऊस

By admin | Updated: June 19, 2015 00:18 IST

बांद्याला चक्रीवादळाचा फटका : बारा लाखांची हानी; विजेचे खांब उन्मळून पडले

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, गुरुवारी चक्रीवादळाचा बांदा शहराला फटका बसला आहे. अनेक झाडांबरोबरच विजेचे दहा खांब उन्मळून पडले आहेत, तर आचरा गाऊडवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे तसेच मातोंड येथील घरांचे व देवगड तालुक्यातील वाडा मुळबांध येथील गुरांच्या गोठ्याची अंशत: हानी झाली. जिल्हाभरात वादळी पावसामुळे सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले आहे. हा नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, समुद्र किनारपट्टीवर धोक्याची घंटा कायम असून, मच्छिमारांना हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ७७.३८ मि.मी.च्या सरासरीने ६१९ मि.मी. पाऊस पडला. मालवण तालुक्यातील आचरा गाऊडवाडी भागात बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळासह आलेल्या पावसाने कमलाकर पांगे यांच्या घराचे छप्पर उडून ६० हजारांचे नुकसान झाले. घरातील अन्नधान्य, किमती वस्तू भिजून मोठ्या प्रमाणात हानी झाली. समुद्राच्या दिशेने आलेले वादळी वारे डोंगरभागाकडे सरकल्याने मोठी हानी टळली. कमलाकर पांगे यांच्या घराशेजारी राहणारे प्रशांत पांगे यांच्या स्लॅबच्या घरावरही आंब्याचे झाड पडले, परंतु सुदैवाने हानी टळली. वादळाचा जोर कमी होताच वाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत कमलाकर पांगे यांच्या कुटुंबियांना धीर देत मदतकार्य केले. यावेळी नरेश तारकर, जगदीश पांगे, तानाजी पांगे, भाऊ गावकर, मोहन पांगे, जगदीश पडवळ, नारायण पडवळ यांनी पांगे कुटुंबियांचे अस्ताव्यस्त पडलेले सामान सुरक्षित जागेत हलविले.पांगे कुटुंबियांचा संसार पावसात भिजत होता. प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर, राजन पांगे, चंदन पांगे, जगदीश पांगे व जुबेर काझी यांनी पांगे कुटुंबियांचे घराचे छप्पर उभे करण्यासाठीचे काम हाती घेतले होते.यावेळी आचरा गावचे तलाठी बी. जे. मुंबरकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंचयादी केली. अनंत पांगे यांच्या घरावरही झाड पडून पडवीचे सुमारे २५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील आरती सामंत यांच्या घराचे पत्रे उडाल्याने ९३ हजारांचे तर मातोंड येथील सुजाता कुडव यांच्या घराचे पत्रे उडाल्याने ४ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद ओरोस येथील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नोंद झाली आहे. वाडा मुळबांध येथील जयवंत भिकाजी जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर आंबा कलमाचे झाड कोसळून सुमारे चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)बांद्याला चक्रीवादळाचा फटकाबांदा शहरातील लकरकोट, मिठगुळी परिसरात चक्रीवादळासह झालेल्या पावसाने कित्येक झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्यात. वीज वितरण कंपनीचे तब्बल दहा विद्युत खांब उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित झाला आहे. या चक्रीवादळाने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.