शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

येत्या २४ तासात वादळी पाऊस

By admin | Updated: September 1, 2014 23:07 IST

हवामान खाते : जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण ८८२ मिलिमीटर, तर सरासरी ९८.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात १४५ मिलिमीटर झाली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचे तसेच काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान उद्या मंगळवारी २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.चिपळूण तालुक्यात टेरव येथील भागुजी बारकू कदम ही ३१ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० पासून बेपत्ता असून, ती वाहून गेल्याचा अंदाज आहे. याबाबत तपास सुरू आहे. गुहागर - वेलदूर रस्त्यावरील बांध कोसळला. मात्र, वाहतूक सुरळीत आहे. राजापूर तालुक्यात कोदवली नदीची पातळी ५.५० मीटर झाल्याने नगरपरिषदेमार्फत नागरिकांना भोंगा वाजवून धोक्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु शहरात पाणी घुसल्याची नोंद करण्यात आलेली नाही. गुहागर तालुक्यातील ५ घरांमध्ये पाणी घुसल्याने १ लाख ६ हजार १२० रुपयांचे नुकसान झाले असून, घरतवाडी तर्फ वेलदूर या गावातील रस्त्याची संरक्षक भिंंत कोसळली आहे. मंडणगड तालुक्यातील मौजे घुमरी येथे ३१ रोजी सायंकाळी ७.२० वाजता दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती, ती आज सुरू करण्यात आली आहे. नांदिवडे - आंबूळवाडी येथे बोट बुडाली. या बोटीत असलेले सातही खलासी वाचले आहेत. संगमेश्वर तालुक्यात कोल्हापूर रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक काही वेळ बंद होती. खेड तालुक्यात मौजे उदय खुर्द येथे टेम्पो- एस. टी. -क्वालिसचा अपघात झाल्याने क्वालिसमधील दोघांचा मृत्यू झाला व दोन जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाने दिली आहे. (प्रतिनिधी)मच्छिमारांना इशारा...जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून पुढील २४ तासात अनेक ठिकाणी ७ ते १२ सेंटीमीटरपर्यंत पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. दक्षिण नैऋत्येकडून तासी सुमारे ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहील. तसेच दक्षिण नैऋत्येकडून मोठ्या लाटा समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी पुढील २४ तासांत मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान.पावसामुळे जिल्हाभरात पूरसदृश स्थिती निर्माण.सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात.जिल्ह्यात सरासरी ८८२ मिलिमीटर पावसाची नोंद.गुहागर तालुक्यातील पाच घरात पाणी घुसले.